शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

जातपंचायतींचे शोषक निवाडे थांबतील तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:34 IST

जळगाव शहरात मानसी बागडे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने २३ जानेवारी रोजी आत्महत्या केली. संबंधित समाजाच्या जातपंचांविरुद्ध सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात १ मार्च रोजी राज्यस्तरीय जातपंचायतीच्या मनमानीला मूठमाती संकल्प परिषद कांताई सभागृहात होत आहे. यानिमित्त जातपंचायत नेमक्या असतात तरी काय, आणि ते कसे शोषण करतात याविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत चळवळीतील कार्यकर्ते विश्वजीत चौधरी यांनी घेतलेला आढावा.

देशभरात महाराष्ट्र असे राज्य आहे की, येथे परिवर्तनवादी विचारसरणी मांडणारे आणि संघर्ष करणारे संत व समाजसुधारक जन्माला आलेले आहेत. त्यांच्या कार्याने जगभर महाराष्ट्राची ओळख पुरोगामी राज्य अशी झाली आहे. मात्र असे असूनही अनेक कुप्रथा राज्यात सुरू आहे हे ऐकून मन सुन्न होते. सहा वर्षांपूर्वी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होते, कारण त्यांचे विचार परिवर्तनवादी होते आणि त्यांनी धर्मांधता पसरविणाऱ्या सनातनी विचारांना आव्हान दिले होते. त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे यांना संपविले जाते. ही आजची महाराष्ट्राची अस्वस्थता आहे.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ.दाभोलकर यांच्या हत्येनंतर झालेला जादूटोणाविरोधी कायदा आणि २०१७ साली पारित झालेला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा असे दोन महत्वाचे कायदे राज्य शासनाकडून पारित करून घेण्यासाठी संघर्ष केला. डॉ.दाभोलकर असे म्हणाले होते की, जात ही मोठी अंधश्रद्धा आहे. खरे तर जात नष्ट करणे आवश्यक आहे. मात्र आमच्या क्षमता व मर्यादा यांचा विचार करता जातीचे अग्रदल असणाºया जातपंचायत आम्ही नष्ट करू शकलो तरी जातीला हादरे बसतील. होय, जातपंचायत हा प्रकार राज्यात अजूनही आहे, आणि तो जाचक स्वरुपात आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या ३० वर्षांपासून राज्यभरात व्यापक समाज परिवर्तनाचे काम करीत आहे. राज्यभरात जातपंचायतींच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र अंनिस गेली सात वर्षे संघर्ष करीत आहे. अंनिसने साधलेल्या सुसंवादातून आतापर्यंत १५ जातपंचायती बरखास्त झाल्या आहेत. आतापर्यंत जातपंचायतींनी छळलेली आणि बहिष्कृत केलेली पाचशेहून अधिक प्रकरणे गेल्या सात वर्षात अंनिसने हाताळली.काही समाजात पंचांना देवाचा अवतार समजला जातो किंबहुना तसा गैरसमज जाणीवपूर्वक करून दिला जातो. त्यामुळे त्यांचा शब्द अंतिम समजला जातो. पंच आपल्या जातीचे जीवनमान नियंत्रित करतात. जन्मापासून ते मरणापर्यंच्या महत्त्वाच्या घटनांवर ते नियंत्रण ठेवतात. ते कायदे बनवतात, स्वत: न्यायनिवाडे करतात व स्वत:च शिक्षा करतात. त्यांचे न्यायनिवाडे हे अंधश्रद्धेवर आधारित असतात. शोषक असतात. जातपंचायतच्या शिक्षा या अघोरी व अमानुष असतात. शारीरिक किंवा दंडाच्या स्वरुपात शिक्षा करून तर कधी समाजबांधवाचा जीव घेऊन किंवा मानसिक त्रास देत जीव देण्याची मानसिकता तयार करून पंच समाजबांधवांवर वचक निर्माण करतात. दंडाची बेहिशेबी रक्कम पंच स्वत: साठी वापरतात. शिक्षा करताना ते अनेकदा जात बहिष्कृत करण्याचे सर्वात मोठे शस्त्र उगारतात. अशा वाळीत टाकलेल्या व्यक्तींशी इतर जातबांधवांनी संबंध तोडण्याचा फतवा निघतो.सामाजिक बहिष्कार कायदा अंमलबजावणी होण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. त्यांनी सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी नेमणे आवश्यक असून जातपंचायतींच्या नोंदी ठेवल्या जाणे आवश्यक आहे. सोबत पोलीस दलानेदेखील अशा जातपंचायतींची माहिती मिळाल्यास तेथे कारवाई आणि कारवाईदेखील करणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक बळी जातील हे खेदाने सांगावेसे वाटते. जातपंचायती बरखास्त होण्यासाठी स्वत: जातपंचायतींनी पुढे येणे गरजेचे असून नागरिकांनी देखील जातपंचायतीविषयी तक्रारी देणे महत्वाचे आहे.- विश्वजीत चौधरी, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव