शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

पाझर तलावाच्या पाण्यात चार एकर शेती पिकासह गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST

चाळीसगाव : ‘बँकेसह खासगी कर्ज घेऊन सहा एकर शेतात शेवगा लावला... मंगळवारची रात्र ‘काळरात्र’ ठरली. शेतालगत बांधलेल्या पाझर तलावाचा ...

चाळीसगाव : ‘बँकेसह खासगी कर्ज घेऊन सहा एकर शेतात शेवगा लावला... मंगळवारची रात्र ‘काळरात्र’ ठरली. शेतालगत बांधलेल्या पाझर तलावाचा सांडवा तसाच ठेवल्याने बुधवारी आलेल्या पुराने पिकासह शेतीच वाहून नेली. १५ फूट खोल शेतातील मातीही वाहून गेल्याने रस्त्यावर आलो आहे..’ अशी कैफियत मांडताना ६० वर्षीय पूरग्रस्त शेतकरी काशिनाथ सोनवणे ढसाढसा रडतात. गेल्या चार दिवसांपासून त्यांची चूल पेटली नाही. संपूर्ण कुटुंबावर जणू शोककळा पसरली आहे.

चाळीसगाव शहरापासून दक्षिणेला २० कि.मी. अंतरावर शिंदी हे गाव आहे. याच गावालगत पाच कि.मी. अंतरावर १० ते १५ घरांचे खराडी हे गाव असून याच शिवारात काशिनाथ सोनवणे यांची सहा एकर शेती आहे. चाळीसगाव परिसरात सातच दिवसाच्या अंतराने ६ रोजी दुसऱ्यांदा आभाळ फाटलं. यादिवशी घोडेगावसह शिंदी, खराडी, करजगाव आदी भागात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे काहीअंशी नुकसान झाले. बुधवारी सोनवणे यांच्या शेतालगतचा पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला. त्याचे पाणी शेतात शिरले. २०१९मध्ये जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने घोडगाव येथील मोरदऱ्या धरणाच्या उगमावर घोडेगाव रस्त्यालगत खराडी शिवारात हा पाझर तलाव बांधला. मात्र या तलावातील पाणी वाहून जाण्यासाठी काढलेला सांडवा तसाच ठेवल्याने बुधवारी आलेल्या पुराचे पाणी काशिनाथ सोनवणे यांच्या शेतात घुसले. यात त्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. नुकसान मोठे असल्याने त्यांच्यासह कुटुंबालाच याचा धक्का बसला आहे.

चौकट

जूनमध्ये लावला शेवगा

काशिनाथ सोनवणे यांना दोन मुले आहेत. तेही शेतातच राबतात. ६ एकर शेतात त्यांनी जून २०२१मध्ये शेवगा लावला. हे पीक सात महिन्यांचे असते. सद्य:स्थितीत शेवग्याच्या शेंगाना चांगला भाव आहे. एका हंगामात दोनदा उत्पन्न येते.

१..सहा एकर शेती तयार करण्यासाठी त्यांनी एकरी चार लाख रुपये खर्च केले.

२...ठिंबक सिंचनासाठी ९० रुपये खर्च आला. बुधवारी मात्र होत्याचे नव्हते झाले. सहा एकरापैकी चार एकर शेती पुरात नष्ट झाली. शेतात १५ फूट खोल खड्डा पडला असून अतोनात नुकसान झाले आहे. पुन्हा शेत तयार करण्यासाठी एकरी १० लाख रुपये खर्च येणार आहे.

.

चौकट

पाझर तलावाची मंजुरी

१९९६मध्ये काशिनाथ सोनवणे यांच्या शेतालगतचा पाझर तलाव त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरला आहे. १९९६मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत या तलावाचे काम सुरू झाले. मात्र नंतर बंद पडले. २०१९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ते मंजूर केले गेले. त्यामुळे १९९६च्या कृती आराखड्यानुसार तो तयार करण्यात आला. नैसर्गिक सांडव्यात त्याचे पाणी सोडण्यात आले.

इन्फो

पाझर तलाव बांधल्यानंतर त्याचे पाणी मूळ नदीत सोडणे आवश्यक होते. मात्र ते शेतालगतच सोडून दिले. याबाबत १० मार्च रोजी अर्जही केला होता. मी स्वतः जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागात गाऱ्हाणे मांडले होते. तथापि कोणतीही दखल घेतली नाही. वेळोवेळी भ्रमणध्वनीवरही उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली. अखेरीस माझे शेत आणि पीकदेखील वाहून गेले.

-काशिनाथ सोनवणे

नुकसानग्रस्त शेतकरी, शिंदी, ता. चाळीसगाव

इन्फो

१९९६मध्ये बंद पडलेल्या पाझर तलावाचे काम जलयुक्त शिवार योजनेतर्गंत २०१९मध्ये झाले. मंजूर झालेले काम नियमाप्रमाणे केले आहे. सांडव्याचे पाणी नैसर्गिक नाल्यात सोडले आहे.

-सी. के. शिंपी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जि.प. चाळीसगाव विभाग