शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

‘गिरणा’तील जलसाठा ३३ टक्क्यांवर! दुसऱ्या आवर्तनामुळे घट, मार्च महिन्यात गाठणार पंचविशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 16:32 IST

गेल्या महिन्यात गिरणा धरणातील साठा ४२ टक्क्यांवर होता. दुसरे आवर्तन सोडण्याआधी हा साठा ३९ टक्क्यांवर होता.

जळगाव : दुसरे बिगर सिंचन आवर्तनामुळे गिरणा धरणातील जलसाठा ३३ टक्क्यांवर आला आहे. हा साठा ५ टक्क्यांनी घटला असून मार्च महिन्यात हा साठा पंचविशी गाठेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे एप्रिल ते जून या कालावधीत शेकडो गावांच्या जलतृप्तीसाठी गिरणातील पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.

गेल्या महिन्यात गिरणा धरणातील साठा ४२ टक्क्यांवर होता. दुसरे आवर्तन सोडण्याआधी हा साठा ३९ टक्क्यांवर होता. दि.२१ रोजी हा साठा ३३ टक्क्यांवर आल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यापाठोपाठ हतनूर व वाघूर धरणातील जलसाठा अनुक्रमे ८३ आणि ८२ टक्क्यांवर आला आहे.भोकरबारी धरणातील जलसाठा अवघ्या ७ टक्क्यांवर आला आहे. एरंडोलकरांना जलमाया देणाऱ्या अंजनी धरणातील जलसाठाही २५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे एरंडोलकरांनाही जपून पाणी वापरण्याची ‘एरंडोली’ करावी लागणार आहे.

या शहरांना चटका

मार्चनंतर एरंडोल, पारोळा, अमळनेर, धरणगाव, भडगाव, चाळीसगाव, बोदवड या शहरांना पाणीटंचाईचा सर्वाधिक चटका बसणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. गिरणा धरणातून एकीकडे चाळीसगाव, पाचोरा, मालेगाव एमआयडीसींना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. दुसरीकडे पिण्यासाठीही १९४ गावांसाठी पाणी राखीव ठेवावे लागणार आहे.त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाला यंदा मोठी कसरत करावी लागणार आहे.

प्रकल्पनिहाय गेल्यावर्षीचा व यंदाचा २१ फेब्रुवारीपर्यंतचा जलसाठा (टक्के)

प्रकल्प-२०२३-२०२४

हतनूर-८०.२९-८३.५३

गिरणा-५६.२१-३३.३७

वाघूर-८२.३६-८२.६२

सुकी-८०.७७-८६.५१

अभोरा-७८.५९-८६.६८

मंगरुळ-८०.१६-७६.५९

मोर-८३.६९-८३.२५

अग्नावती-५७.७०-१९.३६

हिवरा-५५.४२-३१.२७

बहुळा-६०.१३-५१.१८

तोंडापूर-६९.०३-७४.५८

अंजनी-४२.५२-२५.९३

गूळ-७९.४७-८०.५१

भोकरबारी-२३.३५-०७.३६

बोरी-५१.९५-२९.६१

मन्याड-५४.९०-०० 

टॅग्स :Jalgaonजळगावwater shortageपाणीकपात