शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

हतनूरमधील साठा निम्म्यावर भुसावळ परिसरावर पाणी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 4:20 PM

सिंचनासह भुसावळ तालुक्यातील पाणी योजना येणार अडचणीत

ठळक मुद्देमागील वर्षी जून महिन्याच्या प्रारंभी हतनूर धरणातील पाणीसाठा संपला होतामार्च महिन्याच्या मध्यातच हतनूर धरणातील पाणी साठा ४५ टक्क्यावरधरणातील चाचणीत गेले १.८ दशलक्ष पाणी वाया

आॅनलाईन लोकमतवरणगाव,ता.भुसावळ, दि.३१ : जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी तापीनदीवरील हतनूर धरणातील पाणीसाठा निम्म्या पेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे काही महिन्यातच पाणी संकटाचा सामना करावा लागणार आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या प्रारंभी हतनूर धरणातील पाणीसाठा संपला होता.दरवर्षी प्रमाणे पावसाळ्या नंतर हतनूर धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु धरण पूर्ण भरल्याची आकडेवारी फसवी ठरत आहे.धरणात साठलेल्या गाळामुळे धरणातील पाण्याचा बराचसा भाग गाळाने व्यापला असल्यामुळे वरवर धरण १०० टक्के भरलेले दिसत असल्या वरही प्रत्यक्षात पाणीसाठा ३० टक्क्याहूनही कमीच असतो. मार्च महिन्याच्या मध्यातच हतनूर धरणातील पाणी साठा ४५ टक्क्यावर आला आहे. त्यामुळे कृषी सिंचन आणि धरणावर अवलंबून पाणी पुरवठा योजनेसह औद्योगिक प्रकल्पांना पाणी संकटाचा मोठा सामना करावा लागेल, अशी सध्याची स्थिती आहे.हतनूर धरणातील साचलेल्या गाळाचे सर्वेक्षण ‘मेरी’ने २००७ साली केले होते. त्यावेळीच धरणात सुमारे २० टक्के गाळ साचला होता. त्यानंतर १५ वर्ष उलटून गेली आहेत. धरणात प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साठ्याची क्षमता घटली आहे. परंतु धरणातील गाळ काढण्याबाबत शासनाचा पाटबंधारे विभाग उदासिन असल्याने भुसावळ संकटाची स्थिती निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.उपसा योजनेव्दारे तापी नदीतून वाहून जाणारे पुराचे पाणी ओझरखेडा साठवण तलावात साठविण्यासाठी उपसा योजना पूर्णत्वास आली आहे. त्या योजनेची चाचणी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. त्या चाचणीत धरणातील १.८ दशलक्ष पाणी वाया गेले. ही चाचणी पावसाळ्यात घेणे अपेक्षित असताना ती हिवाळ्यात घेण्यात आल्याने धरणातील पाणीसाठा घटण्यास कारणीभूत ठरत आहे.हतनूर धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी आणि उद्योगासाठी अवलंबून असलेले महत्त्वाचे उद्योग वरणगाव आणि भुसावळ आॅर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर वीज निर्मिती प्रकल्प, भुसावळ रेल्वे यासह लष्कर डेपो आणि विविध ठिकाणच्या पाणी पुरवठा योजना, भुसावळ शहर या सर्वांना जास्त पाणी लागते.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळ