शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

कजगावसह परिसरात चार वर्षांनंतर केटीवेयरला आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 17:04 IST

अवकाळी पावसाने सर्व दूर नद्या-नाले ओसंडून वाहिले. दि.१९ रोजी चाळीसगाव परिसरात झालेल्या पावसामुळे तितूर नदी दुथडी भरून वाहिल्याने तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कजगाव, उमरखेड, पासर्डीचे तिघे के.टी. वेयर ओसंडून वाहिल्याने ते पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती.

ठळक मुद्देकजगाव, उमरखेड, पासर्डी येथे आनंदकाही ठिकाणी पिके पाण्याखालीकही खुशी तो कही गमके.टी. वेयर ओसंडून वाहिल्याने ते पाहण्यासाठी तोबा गर्दी

प्रमोद ललवाणीकजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : अवकाळी पावसाने सर्व दूर नद्या-नाले ओसंडून वाहिले. दि.१९ रोजी चाळीसगाव परिसरात झालेल्या पावसामुळे तितूर नदी दुथडी भरून वाहिल्याने तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कजगाव, उमरखेड, पासर्डीचे तिघे के.टी. वेयर ओसंडून वाहिल्याने ते पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती.सप्टेंबरच्या २० तारखेपर्यंत कजगावची तितूर नदी कोरडीच होती. दरम्यान, दि.२० सप्टेंबर रोजी कोरड्या तितूर नदीला अनेक अडथळे पार करीत चक्क चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाण्याच्या धारीचे कजगावच्या तितूर नदीत आगमन झाले. या पाण्याचे स्वागताला सारेच आसूरलेले होते म्हणूनच भोरटेक येथे महिला व ग्रामस्थांनी जलपूजन केले तर कजगावच्या के.टी. वेयरमध्ये पाणी अडविण्यासाठी सारा गावच सरसावला. या दोघ गावात नदीवर तोबा गर्दी झाली होती. पाटणादेवीजवळ उगम असलेल्या तितूर नदीस कजगाव परिसरात गेल्या चार वर्षांपासून पाणीच आलेले नव्हते. यामुळे तितूर किनाऱ्यावरील बागायती संपुष्टात आली होती. पाणी प्रश्नदेखील बिकट झाला होता. चार वर्षांत नदीचे रूपांतर ओसाड जमिनीसारखे झाले होते.याआधी लोकवर्गणीतून नदी नांगरलीकजगाव येथे तितूर नदीचे रूपांतर ओसाड जमिनीसारखे झाले होते. यामुळे सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील व ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणी गोळा करून संपूर्ण नदीचे खोलीकरण करत पूर्ण नदी नांगरली होती. मात्र चक्क पावसाळा संपण्याच्या शेवटच्या टप्प्यातदेखील या नदीला पाणी न आल्याने या नदीने हिरव्या रानात रूप परिवर्तन केले होते. सर्व दूर हिरवेगार गवत नजरेस पडत होते.अनेक अडथळेतितूर नदीवर अनेक किकाणी सिमेंटचे पक्के बंधारे बनविण्यात आले आहेत. यामुळे या नदीचे पाणी पुढे सरकतच नसल्याने कजगावसह सात खेडे हे तितूरच्या पाण्यापासून वंचित होते. दि.१९ आॅक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे तसेच इतर सिमेंट बंधारे तुडुंब भरल्याने तितूरची धार कजगावपर्यंत पोहचली होती. जेमतेम आलेल्या या पाण्याचा साठोबा कजगावच्या के.टी. वेयरमध्ये व्हावा त्याला गळती लागू नये यासाठी ते पाणी कजगावात पोहचण्याच्या आधीच कजगावच्या युवकांनी या के.टी. वेयरच्या प्लेटांना प्लास्टिक कागदाचे आवरण चढवत पाणी गळतीपासून बचाव करण्यात आला. काही प्रमाणात या के.टी.मध्ये पाणी अडकले.दरम्यान, अवकाळी पाऊस सुरू झाला नि वातावरणदेखील बदलले. ज्वारी, बाजरी, मका आदी पीक काढण्याची लगबग शेतकऱ्यांची सुरू झाली. महिन्याच्या ब्रेकनंतर दि.१९ रोजी माघारी परतलेल्या पावसाचे दमदार आगमन झाले. धुवांधार झालेल्या पावसाने नद्या-नाले वाहिले. चाळीसगाव परिसरात झालेल्या पावसामुळे तितूर नदी दुथडी भरून वाहिल्याने या नदीवरील सारेच सिमेंट बंधारे ओसांडून वाहिले. परिणामी कजगाव, उमरखेड व पासर्डी येथील तिघे के.टी. वेयर तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ओसांडून वाहिल्याने या भागाचा पाणी प्रश्न मिटणार आहे तर पुन्हा या भागातली लोप पावणाºया बागाईतला अच्छे दिन येणार अशी आशा शेतकºयांना वाटू लागली आहे.कही खुशी कही गमपरतीच्या पावसाचे दमदार आगमन झाल्याने काही शेतकºयांची चांगलीच फजिती झाली. कारण शेतकºयांनी ज्वारी, बाजरी, मका आदी पिके कापून ठेवली होती.दरम्यान, झालेल्या दमदार पावसामुळेही सारी पिके पाण्यात तरंगत आहेत. यामुळे शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे, तर दुसरीकडे या पावसामुळे कोरडवाहू शेतातील कपाशीला या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. कपाशीचे उत्पन्न वाढू शकते तर फुटलेल्या, वेचणीवर आलेल्या बागाईत कपाशीचे या पावसामुळे नुकसान होईल. एकंदरीतच ‘कही खुशी कही गम’ असेच काहीसे चित्र या भागात पहावयास मिळत आहे.

टॅग्स :RainपाऊसBhadgaon भडगाव