शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कजगावसह परिसरात चार वर्षांनंतर केटीवेयरला आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 17:04 IST

अवकाळी पावसाने सर्व दूर नद्या-नाले ओसंडून वाहिले. दि.१९ रोजी चाळीसगाव परिसरात झालेल्या पावसामुळे तितूर नदी दुथडी भरून वाहिल्याने तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कजगाव, उमरखेड, पासर्डीचे तिघे के.टी. वेयर ओसंडून वाहिल्याने ते पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती.

ठळक मुद्देकजगाव, उमरखेड, पासर्डी येथे आनंदकाही ठिकाणी पिके पाण्याखालीकही खुशी तो कही गमके.टी. वेयर ओसंडून वाहिल्याने ते पाहण्यासाठी तोबा गर्दी

प्रमोद ललवाणीकजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : अवकाळी पावसाने सर्व दूर नद्या-नाले ओसंडून वाहिले. दि.१९ रोजी चाळीसगाव परिसरात झालेल्या पावसामुळे तितूर नदी दुथडी भरून वाहिल्याने तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कजगाव, उमरखेड, पासर्डीचे तिघे के.टी. वेयर ओसंडून वाहिल्याने ते पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती.सप्टेंबरच्या २० तारखेपर्यंत कजगावची तितूर नदी कोरडीच होती. दरम्यान, दि.२० सप्टेंबर रोजी कोरड्या तितूर नदीला अनेक अडथळे पार करीत चक्क चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाण्याच्या धारीचे कजगावच्या तितूर नदीत आगमन झाले. या पाण्याचे स्वागताला सारेच आसूरलेले होते म्हणूनच भोरटेक येथे महिला व ग्रामस्थांनी जलपूजन केले तर कजगावच्या के.टी. वेयरमध्ये पाणी अडविण्यासाठी सारा गावच सरसावला. या दोघ गावात नदीवर तोबा गर्दी झाली होती. पाटणादेवीजवळ उगम असलेल्या तितूर नदीस कजगाव परिसरात गेल्या चार वर्षांपासून पाणीच आलेले नव्हते. यामुळे तितूर किनाऱ्यावरील बागायती संपुष्टात आली होती. पाणी प्रश्नदेखील बिकट झाला होता. चार वर्षांत नदीचे रूपांतर ओसाड जमिनीसारखे झाले होते.याआधी लोकवर्गणीतून नदी नांगरलीकजगाव येथे तितूर नदीचे रूपांतर ओसाड जमिनीसारखे झाले होते. यामुळे सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील व ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणी गोळा करून संपूर्ण नदीचे खोलीकरण करत पूर्ण नदी नांगरली होती. मात्र चक्क पावसाळा संपण्याच्या शेवटच्या टप्प्यातदेखील या नदीला पाणी न आल्याने या नदीने हिरव्या रानात रूप परिवर्तन केले होते. सर्व दूर हिरवेगार गवत नजरेस पडत होते.अनेक अडथळेतितूर नदीवर अनेक किकाणी सिमेंटचे पक्के बंधारे बनविण्यात आले आहेत. यामुळे या नदीचे पाणी पुढे सरकतच नसल्याने कजगावसह सात खेडे हे तितूरच्या पाण्यापासून वंचित होते. दि.१९ आॅक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे तसेच इतर सिमेंट बंधारे तुडुंब भरल्याने तितूरची धार कजगावपर्यंत पोहचली होती. जेमतेम आलेल्या या पाण्याचा साठोबा कजगावच्या के.टी. वेयरमध्ये व्हावा त्याला गळती लागू नये यासाठी ते पाणी कजगावात पोहचण्याच्या आधीच कजगावच्या युवकांनी या के.टी. वेयरच्या प्लेटांना प्लास्टिक कागदाचे आवरण चढवत पाणी गळतीपासून बचाव करण्यात आला. काही प्रमाणात या के.टी.मध्ये पाणी अडकले.दरम्यान, अवकाळी पाऊस सुरू झाला नि वातावरणदेखील बदलले. ज्वारी, बाजरी, मका आदी पीक काढण्याची लगबग शेतकऱ्यांची सुरू झाली. महिन्याच्या ब्रेकनंतर दि.१९ रोजी माघारी परतलेल्या पावसाचे दमदार आगमन झाले. धुवांधार झालेल्या पावसाने नद्या-नाले वाहिले. चाळीसगाव परिसरात झालेल्या पावसामुळे तितूर नदी दुथडी भरून वाहिल्याने या नदीवरील सारेच सिमेंट बंधारे ओसांडून वाहिले. परिणामी कजगाव, उमरखेड व पासर्डी येथील तिघे के.टी. वेयर तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ओसांडून वाहिल्याने या भागाचा पाणी प्रश्न मिटणार आहे तर पुन्हा या भागातली लोप पावणाºया बागाईतला अच्छे दिन येणार अशी आशा शेतकºयांना वाटू लागली आहे.कही खुशी कही गमपरतीच्या पावसाचे दमदार आगमन झाल्याने काही शेतकºयांची चांगलीच फजिती झाली. कारण शेतकºयांनी ज्वारी, बाजरी, मका आदी पिके कापून ठेवली होती.दरम्यान, झालेल्या दमदार पावसामुळेही सारी पिके पाण्यात तरंगत आहेत. यामुळे शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे, तर दुसरीकडे या पावसामुळे कोरडवाहू शेतातील कपाशीला या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. कपाशीचे उत्पन्न वाढू शकते तर फुटलेल्या, वेचणीवर आलेल्या बागाईत कपाशीचे या पावसामुळे नुकसान होईल. एकंदरीतच ‘कही खुशी कही गम’ असेच काहीसे चित्र या भागात पहावयास मिळत आहे.

टॅग्स :RainपाऊसBhadgaon भडगाव