शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
3
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
4
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
5
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
6
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
8
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
9
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
10
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
11
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
12
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
13
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
14
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
15
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
16
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
17
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
18
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
19
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
20
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!

वाघूर धरणाची शंभरीची हॅट्ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST

सलग तिसऱ्या वर्षी वाघूर भरले १०० टक्के : जळगावकरांची दोन वर्षांची पाण्याची चिंता मिटली लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

सलग तिसऱ्या वर्षी वाघूर भरले १०० टक्के : जळगावकरांची दोन वर्षांची पाण्याची चिंता मिटली

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे वाघूर धरण सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के भरले आहे. धरण तयार झाल्यापासून १३ वर्षांत हे धरण सातव्यांदा १०० टक्के भरले आहे. यावर्षी देखील धरण १०० टक्के भरल्यामुळे जळगाव शहराचा दोन वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून, भुसावळ व जामनेर तालुक्यातील सिंचनाला देखील यामुळे मोठा फयदा होणार आहे.

२०१७ व २०१८ मध्ये वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे धरणातील जलसाठा २० टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे २०१९-२०२० मध्ये उन्हाळ्यात जळगावकरांना चार ते सहा दिवसांआड पाणी मिळत होते. अनेक ठिकाणी पाणीटंचाई होती; मात्र, सलग तीन वर्षांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे सलग तिसऱ्या वर्षी वाघूर धरण १०० टक्के भरले आहे. हे धरण भरल्यामुळे आगामी उन्हाळ्यात मात्र जळगावकरांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे. वाघूर धरणात दोन वर्षे पुरेल एवढे पाणी त्यात आहे. जिल्ह्यात आजअखेर पर्यंत ९८ टक्के पाऊस झाला आहे. पावसाची एकूण सरासरी ६३२ मिलिमीटर आहे. आतापर्यंत ६०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. अजूनही पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे पावसाची टक्केवारी सप्टेंबर अखेरपर्यंत शंभरी पार करण्याची शक्यता आहे.

सातवेळा १०० टक्के भरले धरण

२००८

२०१०

२०११

२०१५

२०१९

२०२०

२०२१

वाघूर धरण - क्षमता व आजची स्थिती

पाणी क्षमता - २४८.५५ दलघमी

टीएमसी - ८.७७६

पाणी पातळी - २३४.१० मीटर

टक्केवारी १००

एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन

शहराला पाणीपुरवठा होत असलेले वाघूर धरण पूर्ण भरले असल्याने शहराचा दोन वर्षांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. दरम्यान, शहरात काही महिन्यात अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होणार असून, नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांमुळे शहराला एका दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. जुन्या जलवाहिन्यांच्या प्रणालीमुळे धरण १०० टक्के जरी भरले तरी एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य नव्हते मात्र आता अमृत योजनेमुळे व धरण १०० टक्के भरल्याने शहराला भविष्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.