शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

रोहिणीच्या भीषण अपघातात गावकऱ्यांनी दाखवली एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST

चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील भगवान नगराज पाटील यांच्या शेतात तांदूळवाडी (ता. कन्नड) येथील विलास वसंत ठाकरे हे कुटुंबासह राहत ...

चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील भगवान नगराज पाटील यांच्या शेतात तांदूळवाडी (ता. कन्नड) येथील विलास वसंत ठाकरे हे कुटुंबासह राहत होते. ते या परिसरात शेतमजुरी करीत असत. ठाकरे यांच्या गर्भवती पत्नीला प्रसूतीला आपल्या गावी सोडवण्यासाठी भगवान पाटील यांच्या दुचाकीने तांदूळवाडीकडे जात असताना ही घटना घडली.

चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील रोहिणी गावाजवळ सकाळपासून या रस्त्यावर छोटा हत्ती या वाहनाचे टायर फुटल्यामुळे रस्त्यात उभा होते. या वाहनांच्या काही अंतरावर कार व मोटारसायकलची समोरासमोर जोरदारपणे धडक झाली. त्याचा परिणाम इतका तीव्र होता की, जखमी दूरवर फेकले गेले व चार जणांचा बळी गेला. वाहनाचेही नुकसान झाले आहे. या घटनास्थळापासून काही अंतरावर आदल्या दिवशी सायंकाळी पाच वाजता समोरासमोर मोटारसायकलची धडक झाली. त्यात दोघे जण जखमी झाले होते.

ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी हॉटेल नक्षत्रचे मालक भिका दराडे व त्यांचा मुलगा, संजय घुगे, संजय सानप, संजय गिरे, लक्ष्मीवाडीतील आबा पाटील, नितीन दराडे तसेच तळेगाव येथील ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य केले. या गावकऱ्यांनी सर्वप्रथम जवळच असलेल्या तळेगाव येथील आरोग्य केंद्राचे वाहन बोलविले. नंतर चाळीसगावशी संपर्क साधून वाहनाची मागणी केली. तळेगावच्या वाहनातून गर्भवती महिला व एकाला तर चाळीसगावच्या वाहनातून अन्य जणांना उपचारासाठी पाठविले. तांदूळवाडी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाला धुळे येथे घेऊन जाण्यास १०८ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांनी वेळ न दवडता लगेच खाजगी रुग्णवाहिका स्वखर्चाने करून उपलब्ध करून जखमी मुलाला धुळे येथे हलविले.