शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

शासनाच्या नव्हे तर दिलीप पाटलांच्या त्रासाला कंटाळून कुलगुरूंचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 9:13 PM

देवेंद्र मराठेंचा आरोप : विविध संघटनांची आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी राज्य शासन व विद्यार्थी संघटनांच्या त्रासाला नव्हे तर केवळ आणि केवळ सिनेट सदस्य दिलीप रामू पाटील यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला असल्याचा खळबळजनक आरोप जिल्हा एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला आहे.प्रा. पी.पी.पाटील यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला. ही विद्यापीठ इतिहासातील दुर्देवी घटना आहे. त्यांच्यावर पहिल्या दिवसापासून दबाव होता़ परिणामी, त्यांना कधीही खुलेआम निर्णय घेता येत नव्हता. दिलीप पाटीले हे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य झाल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवसापासून कुलगुरूंच्या दालनात बसणे सुरू केले होते, असाही आरोप मराठे यांनी केला आहे. कुलगुरूंना प्रत्येक निर्णयाआधी दिलीप पाटील यांचा सल्ला घ्यावा लागत होते. त्यामुळे कुलगुरू यांच्यावर त्यांचा दबाव होता. याच त्रासाला कंटाळून कुलगुरूंनी राजीनामा दिला असल्याचा आरोप मराठे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हीडिओतून केला आहे. दरम्यान, कुलगुरूंनी आधीच त्यांच्या दालनात झालेले अतिक्रमण काढले असते, तर राजीनामा देण्याची वेळ आली नसती, असेही मराठे त्या व्हीडिओतून बोलत होते.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव