शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

भुसावळात बेमोसमी पावसामुळे साथीचे आजार बळावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 15:43 IST

मान्सुनोत्तर पावसाने गेल्या पंधरवड्यात थैमान घातल्यानंतर आता नागरिकांना साथीच्या रोगाने ग्रासले आहे.

ठळक मुद्देरुग्णांमध्ये दिवसागणिक वाढउपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : मान्सुनोत्तर पावसाने गेल्या पंधरवड्यात थैमान घातल्यानंतर आता नागरिकांना साथीच्या रोगाने ग्रासले आहे. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालये, परिसरातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सद्य:स्थितीत टायफाईड, मलेरिया, डेंग्यू यासारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण आढळून येत आहे. रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. अशा परिस्थितीत नगरपालिका व आरोग्य विभागाच्या वतीने तत्काळ खबरदारीचे उपाय योजना करण्याची गरज आहे.अवकाळी पावसाने पावसाळ्यानंतरही थैमान घातले. यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जगाच्या पोशिंद्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावरदेखील पावसाचा परिणाम झाला आहे. भुसावळ शहरासह तालुक्यात टायफाईड, मलेरिया, डेंग्यू यासारख्या साथीच्या रोगाने नागरिक त्रस्त झाले आहेत.दिवसागणिक या रोगांच्या रुग्णांची संख्या वाढतच आह.े लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना साथीच्या आजारांनी ग्रासले आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. मात्र नगरपालिका व आरोग्य विभाग नागरिकांचे आरोग्य धोक्यात असूनसुद्धा तत्पर दिसत नसल्याची नागरिकांची व्यथा आहे.शहरातील अनेक नगरसेवकांनी स्व-खर्चाने आपल्या प्रभागांमध्ये धुरळणी केली आहे. या आजारांवर नियंत्रण न मिळाल्यास रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस थांबून येत असला तरी वातावरणाच्या बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेषत: लहान मुले व वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. जीव घेणे साथीचे आजार थांबवण्याच्या दृष्टीने नगरपालिका व आरोग्य विभागातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, याकरिता विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी उपाययोजना कराव्या याकरिता प्रशासनाला निवेदन दिले आहे.आमदारांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठकशहरात साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. गल्ली-बोळात नागरिक साथीच्या आजारांनी बेजार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार संजय सावकारे यांनी पालिका प्रशासन व आरोग्य े अधिकारी यांना बोलावून तातडीने उपायोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच शहरातील इतर गंभीर समस्यांविषयीही तत्काळ मार्ग काढण्यात यावा यासाठी आधीच अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यBhusawalभुसावळ