शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Uddhav Thackeray: 'यांनी निवडणुकीसाठी आपले जवान मारले असतील तर...', उरी हल्ल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 20:59 IST

'सत्यपाल मलिक उरी हल्ल्याबाबत बोलले, त्यांच्या मागे CBI लावली.'

जळगाव: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जळगावातील पाचोऱ्यात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. आज सगळीकडे असं वातावरण तयार केलं जातंय, जसं काय लोकांना काही कळतंच नाही. मोदी पूर्वी म्हणायचे, महागाई कमी झाली की नाही झाली...पेट्रोलचे भाव कमी झाले की नाही झाले...आता 'अब की बार' बस झालं. यांना 'आपटी बार' दाखवावाच लागेल, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, यावेळी त्यांनी उरी हल्ला आणि सत्यपाल मलिकांच्या गौप्यस्फोटावरही प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी इथे आल्यावर काही जणांनी घोषणा दिल्या, कोण आला रे कोण आला, गद्दारांचा बाप आला. मी नाही रे बाबा त्यांचा बाप. असल्या गद्दार औलादी आपल्या असूच शकत नाहीत. यांना स्वतःचं काही नाही. बाप चोरणारे आहेत हे. ढेकणं मारायला तोफेची गरज नसते. हे ढेकणं तुमचं रक्त पिलेली ढेकणं आहेत. यांना मारायला फक्त एक बोट लागेल. आज माझ्याकडे काहीच नाही, त्यांनी शिवसेना नाव चोरले, धनु्ष्यबाण चोरले, माझे वडील चोरत आहेत. माझ्याकडे काहीच नसताना तुम्ही कसकाय आलात, तर तुम्ही काही घेणारे नाही, तर आशीर्वाद देणारे आहात. दोन-पाच इकडे तिकडे गेले असतील, पण हे लाखो लोक आमच्या बाजूने आहेत, असं ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणतात, तिकडे सत्यपाल मलिकांनी उरी हल्ल्याबाबत मोठी माहिती दिली. त्यांनी भ्रष्टाचाराची माहिती समोर आणली. त्यांच्या मागे सीबीआय लावली. काल-परवा काही जवान शहीद झाले. ते सोडून भाजप कर्नाटकच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. आज विरोधकांच्या मागे सीबीआय, ईडी लावली आहे. भाजपात येता की, तुरुंगात जाता. आमच्यात असले की, ते भ्रष्ट असतात आणि तुमच्यात आले की शुद्ध होतात. सत्यपाल मलिक म्हणाले तसं, यांनी निवडणुकीसाठी जवान मारले असतील, तर अशा लोकांसाठी आपण आपले सुपूत्र यांच्यावर ओपाळून टाकायचे का? यांना किती दिवस चालवून घेणार? या भगव्यावर त्या चोरांचा अधिकार नाही. खंडोजी खोपडेच्या हातात भगवा शोधून दिसत नाही. यांना स्वतःच काही नाही, दुसऱ्यांच चोरावं लागतं, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली. 

ते पुढे म्हणतात, राहुल गांधींनी अदानीवर प्रश्न विचारले, उत्तर कोण देणार? हा प्रश्न फक्त राहुल गांधांना नाही, तर देशातील प्रत्येकाला पडतोय. शेतकरी म्हणतोय, आम्ही दिवसभर राब-राब राबतो आणि हा मोदींचा मित्र लगेच इतका श्रीमंत होतो. मिंध्ये सरकार म्हणतात, आमचं सरकार घेणारं नाही, देणारं आहे. तुम्ही काय दिलं? मी घरात बसून सरकार चालवतो असं म्हणतात, हो आम्ही चालवलं. मी घरात राहून चांगलं सरकार चालवलं, तुम्ही बाहेर फिरुन चालवता येत नाही, असंही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेJalgaonजळगावEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी