शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

दोन नायक, एक गायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST

लेखक - चंद्रकांत भंडारी शनिवारी सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचा ४१ वा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने देव आनंद ...

लेखक - चंद्रकांत भंडारी

शनिवारी सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचा ४१ वा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने देव आनंद व शम्मी कपूर या दोन नायकांना रफींबद्दल नेमकं काय वाटत होतं ते त्यांच्याच शब्दांत. मी फक्त निमित्त मात्र ... मुलाखतीच्या निमित्ताने!

मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया! रफींनी देव आनंदसाठी जेव्हा वरील गीत हम दोनो सिनेमासाठी म्हटलं तेव्हा तेच गीत आपल्या जीवनाचं खरंखुरं मन् फिलाॅसॉफी मांडणारं गीत असेल, हे देव आनंद यांना कळलं होतं. कारण दादरला एका हॉटेलात जेव्हा देव हे काही निमित्ताने आले होते, तेव्हा एका सिनेपत्रकार मित्राबरोबर मी तिथे सहजच म्हणून हजर होतो. नेहमीप्रमाणे स्टायलिश कपडे घातलेल्या देव यांनी छानसं स्मित करीत फक्त दहा मिनिटं.. असं म्हणून मुलाखतीसाठी परवानगी दिली. मित्राने देव आनंद यांच्या नव्या प्रोजेक्टबद्दल विचारलं, त्यांनी उत्तर दिलं. मध्येच त्यांना म्हणालो, मै जिंदगी का साथ निभाता चला गया हे गीत तुमच्या जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. ते तुम्हाला खूप प्रिय आहे..

देव आनंद हसले... म्हणाले, एक प्रोजेक्ट जेव्हा मी हाती घेतो, तेव्हा त्यात मी स्वत:ला झोकून देतो... तो प्रोजेक्ट संपला तरी दुसरा. पण दररोज मी दहा विषयांवर विचार करत त्यावर खूपसं वाचन करत, सिनेमांबद्दलचे आराखडे तयार करत असतो़. मी मागे वळून कधी पाहत नाही... आणि भविष्याची चिंता करत दु:खी होत नाही, म्हणूनच मी हर फ्रिक हो धुएं मे उडाता चला गया हे रफींचं गाणं गुणगुणत पुढे जात असतो. सकारात्मक विचार करत कायम आशावादी राहतो. पत्रकारांना मात्र माझे सिनेमे चालले, पडले याची चिंता मात्र सतत सतावते... त्याला माझा नाइलाज आहे.

भेटीदरम्यान देव आनंद यांनी आपण वर्तमानपत्रांसह दररोज रात्री काय काय वाचतो आणि जे वाचलं ते कसं संग्रही ठेवतो, हे सांगितलं अन् म्हणाले, रफींनी माझ्यासाठी जी शेकडो हिट गीत म्हटली, ती माझ्या हृदयात कोरली गेलीय; पण मै जिंदगी का साथ निभाता चला गया हे पहिल्या नंबरवरचं गाणं !

देव आनंद यांच्याकडून वळतोय शम्मी कपूर यांच्याकडे. रफी गेले तेव्हा शम्मी कपूर मुंबईपासून दूर होते. जेव्हा त्यांना रफी गेल्याचे कळले, तेव्हा ते भावुक होत म्हणाले होते, मी माझा फिल्मी आवाज कायमचा गमावलाय. माझं दुर्दैव मी त्यांचं शेवटंच दर्शनही घेऊ शकत नाहीय.

पुढे एका भेटीत शम्मी कपूर म्हणाले, गाण्यांसाठी संगीतकारांना जेव्हा मी रफींची आग्रही मागणी करायचो, तेव्हा ते गीत किती लोकप्रिय होईल व माझा सिनेमा किती गाजेल याचा मला खरंच अंदाज येत असे. मी तसं बोलूनही दाखवत असे. ज्या ‘याहू’ गाण्यात माझी रफींबरोबर गट्टी जमली, ती पुढे कित्येक वर्षं राजकपूर - मुकेश , राजेश खन्ना - किशोरकुमार याप्रमाणे कायम राहिली. माझी सारी मस्तीभरी गाणी रफींनी ज्या जोशाने गायली, त्याला तोड नाही अन्‌ म्हणूनच मी धुंद होत नाचलो.

बोलता बोलता शम्मी कपूर रफीमय झाले होते. कपूर घराण्याला जो नाचगाण्याचा सेन्स होता, तो या गायकांमुळे कसा पडद्यावर गाजला, हे सांगताना त्यांनी कित्येक गाण्यांचे दाखले दिले अन्‌ ‘तिसरी मंझिल’च एक गाणं म्हणत काही टेप्सही करून दाखवल्या.

देव, शम्मीच्या नजरेतून रफींची वैशिष्ट्ये सांगायची तर ते प्रत्येक गीत दिलसे गात. गाणं श्रवणीय होईल हे पाहत. संगीतकाराने जे गीत शिकवलेय त्यात कुठलाही बदल न करता तंतोतंत गात. गाणं ज्या ढंगाचं त्याच ढंगाचा आवाज ते लावत. उंच स्वरातलं गाणं खूप गात. असं वाटायचं, रफी किती रिलॅक्स मूडमध्ये गात आहेत. नव्या गायक, गायिकांना सांभाळून घेत त्यांना प्रोत्साहन देत. गाण्याचा अर्थ नीट समजावून घेत तळमळीने गात. प्रतिभावान गायक कसा असतो, जगतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रफी. भक्तिरसात सदा डुंबणारं, प्रत्येक क्षण समरसून जगणारं असं एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणजे मोहम्मद रफी.