शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

दिवसभरात ५० वेळा रेल्वे गेट होते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 10:17 PM

पिंप्राळा रेल्वे गेट : दर दहा मिनिटाला गेट बंद होते, जळगावकर अनेक वर्षांपासून करताहेत गैरसोयीचा सामना

जळगाव : दर पाच ते दहा मिनिटाला रेल्वेगाडी जात असल्यामुळे पिंप्राळा रेल्वे गेट बंद करण्यात येते. दिवसभरात ५० ते ६० वेळा हे गेट बंद होत असून, कितीही घाई असली अन् आपत्कालीन परिस्थिती असली तरी वाहनधारकांना गाडी निघेपर्यंत ताटकळतच थांबावे लागते. मात्र, कित्येक वर्षापासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे अद्याप याठिकाणी उड्डाणपुल न झाल्यामुळे वाहनधारकांकडून तीव्र नाराजी अन् संताप व्यक्त होत आहे.मध्य रेल्वेच्या मुंबई ते दिल्ली या मार्गावर हे पिंप्राळा गेट असून, या ठिकाणाहून दररोज २४ तास गाड्यांची वर्दळ सुरु असते. शहराची निम्मेवस्ती पिंप्राळा गेटच्या त्या बाजूला ये-जा करीत असल्याने दिवस-रात्र लाखो नागरिक या गेटवरुन ये-जा करित असतात. त्यातच २४ रेल्वेगाड्या येथून जात असल्याने हे गेट जवळपास ५० ते ६०वेळा बंद करावे लागते. गाडी गेल्यानंतर गेटमनतर्फे लगेच गेट उघडण्यात येते. मात्र, दुसरी गाडी येणार असल्याने पाच ते दहा मिनिटांत पुन्हा गेट बंद करण्यात येते. गेल्या ५० ते ६० वर्षांहून अधिक काळापासून हा नित्यक्रम आहे. परंतु, अलीकडील काही वर्षांत भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढल्यामुळे, या परिसरातील रहिवाशांना दर दहा मिनिटाला होणारा गेट बंदचा त्रास नकोसा झाला आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी उड्डाणपुलाची चर्चा ऐकण्यात येत असून, अद्याप या ठिकाणी एक वीटही रचण्यात न आल्यामुळे जळगावकरांतर्फे याबाबत तीव्र नाराजी अन् संताप व्यक्त करण्यात येत आहे.५ किलोमीटर अंतरावर गाडी असतांना गेट होते बंददर पाच ते दहा मिनिटाला होणाऱ्या गेट बंदबाबत येथील रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता, त्यांनी अप किंवा डाऊन मार्गावरुन गाडी येत असतांना, नियंत्रण कक्षातून सावधान राहण्याची सूचना येते. रेल्वेगाडी साधारणत: पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असतांना, लगेच गेट बंद करण्यात येते. गेट बंद केल्यावर कुठलीही आपत्कालीन परिस्थती असली तरी, रेल्वेगाडी गेल्यानंतरच गेट उगडले जाते. रेल्वे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेच्या नियमानुसारच हे काम चालत असल्याचे येथील गेटवर काम करणाºया कर्मचाºयांनी सांगितले.त्रास सहन करण्याची आम्हाला सवयच‘लोकमत’ प्रतिनिधीने पिंप्राळा गेटवर गाडी निघण्याची वाट पाहत असलेल्या वाहनधारकांशी संवाद साधला असता, अनेकांनी कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या त्रासाचा कंटाळा आला असल्याचे सांगितले. मात्र, कायं करणार? त्रास सहन करण्याची आम्हाला सवयच झाली असल्याचेही या वाहनधारकांनी सांगितले. कितीही घाई आणि आपत्कालीन परिस्थती असली तरी, या ठिकाणी थाबांवेच लागते. कधीकाळी गेट उघडे राहिले तर बरे वाटते अन्यथा दररोज या ठिकाणी दहा मिनिटांचा वेळ वाया जातोच. वाहनधारकांचा हा त्रास नवीन नसून, अनेक वर्षांपासून आहे. मात्र, तरीदेखील मनपा प्रशासनाने वा कुठल्याही राजकीय नेत्याने याकडे लक्ष दिले नसल्याबद्दल वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव