शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

चाळीसगावला स्टेशन रोडवरील व्यापारी धुळीने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 16:34 IST

रेल्वे स्टेशनरोडवरील सिग्नल पाॕईंट ते तहसील कार्यालयापर्यंतचे सर्व व्यापारी धुळीने त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदनमाल होतोय खराबआरोग्यावरही होतोय परिणाम

चाळीसगाव : रेल्वे स्टेशनरोडवरील सिग्नल पाॕईंट ते तहसील कार्यालयापर्यंतचे सर्व व्यापारी धुळीने त्रस्त झाले आहेत. गुरुवारी थेट व्यापाऱ्यांनी नगरपालिकेत धडक देऊन मुख्याधिका-यांनी होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचला. धुळीमुळे होणारे नुकसान आणि आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामातून सोडवणूक करावी, अशी मागणी करणारे निवेदनही दिले. निवेदनाच्या प्रती खासदार व आमदारांनाही देण्यात आल्या.सिग्नल पॉईंट ते तहसील कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या संख्येने व्यापारी संकुले व दुकाने आहेत. मध्यंतरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात नगरपालिकेने माती मिश्रीत मुरुम टाकल्याने वाहनांच्या वर्दळीने या परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा रस्ता डांबरी असताना खड्ड्यात माती मिश्रीत मुरुम टाकला गेला. वाहनांच्या वर्दळीने रस्त्यावरील माती हवेत उडते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणही निर्माण झाले आहे. धुळीमुळे दुकानांमधील माल खराब होत असून काही व्यापाऱ्यांना श्वसनाचे विकार जडले आहे. न.पा.चे स्वच्छता कर्मचारी सकाळी रस्ता झाडतानाही धूळ रस्त्याच्या दूभाजकाजवळच लावतात. हीच धूळ वाहनांच्या वर्दळीने पुन्हा दिवसभर उडत असते. याचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असून नागरिकही त्रस्त झाले आहे. ही समस्या निकालात काढावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. प्रीतेश कटारिया, जितेंद्र देशमुख, राहुल कारवा, आनंद बोरा, दीपक वासवानी, पंकज कोठारी, संदेश येवले यांच्यासह २० ते २५ व्यापारी उपस्थित होते.

टॅग्स :businessव्यवसायChalisgaonचाळीसगाव