शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जळगाव तालुक्यात पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला तीन वर्षाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:37 IST

चार मुली झाल्या तरी मुलगा होत नाही म्हणून पत्नीचा सतत छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात पती शरीफ वहाब खाटीक (रा.वावडदे, ता.जळगाव) याला गुरुवारी न्यायालयाने दोन कलमाखाली अनुक्रमे दोन व तीन वर्षाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्दे जळगाव न्यायालयाचा निकाल मुलगा होत नसल्याने केला होता छळपत्नीने गळफास घेऊन केली होती आत्महत्या

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २२ : चार मुली झाल्या तरी मुलगा होत नाही म्हणून पत्नीचा सतत छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात पती शरीफ वहाब खाटीक (रा.वावडदे, ता.जळगाव) याला गुरुवारी न्यायालयाने दोन कलमाखाली अनुक्रमे दोन व तीन वर्षाची शिक्षा सुनावली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर येथील शाहीस्ता खाटीक यांचे वावडदे येथील शरीफ खाटीक याच्याशी २००७ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशासाठी शाहीस्ता यांच्याकडे तगादा लावला होता. ही मागणी पुर्ण केल्यानंतरही तिचा छळ सुरुच होता. या काळात शाहीस्ता व शरीफ यांना चार मुली झाल्या. मुलगा होत नसल्याने पतीसह सासरच्यांनी तिचा छळ केला. त्यामुळे शाहीस्ता यांनी अमळनेर येथील कौटुंबिक सल्ला केंद्राकडे तक्रार केली होती. तेथे पती-पत्नीत समेट घडवून आणला होता.भविष्यात पत्नीला त्रास देणार नाही असा करारनामाही झाला होता. त्यानंतरही पतीने तुला मुलगा जन्माला येत नाही तोपर्यंत तुझा छळ करतच राहिल असे सांगून छळ सुरु ठेवला. या छळाला कंटाळून शाहीस्ता यांनी ३० सप्टेबर २०१४ रोजी वावडदे येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.करारनामा ठरला महत्वाचा पुरावादरम्यान, शाीहस्ता यांची आई नसीनबी भिकन खाटीक यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरुन पती शरीफ खाटीक याच्याविरुध्द ४९८ अ व ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी अशोक अहिरे यांनी गुन्ह्याचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. न्या.चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. या खटल्यात अमळनेर येथील करारनामा महत्वपूर्ण ठरला. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.चारुलता बोरसे यांनी प्रभावीपणे युक्तीवाद केला. न्यायालयाने शरीफ याला कलम ४९८ अ नुसार २ वर्ष तर कलम ३०६ नुसार तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजाराचा दंड सुनावला. आरोपीतर्फे अ‍ॅड.सागर चित्रे यांनी काम पाहिले.