शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

धरण, धबधब्यासोबत सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST

स्टार - ११६७ सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीचा पाऊस चांगला झाल्याने जवळपास जळगाव ...

स्टार - ११६७

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीचा पाऊस चांगला झाल्याने जवळपास जळगाव जिल्ह्यातील सर्वच धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे धबधबे व ओसंडून वाहणारे धरणे पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, धबधबा पाहण्यापेक्षा आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे, मोबाईलवर सेल्फी काढण्याचं फॅड गेल्या काही वर्षांमध्ये बरंच वाढलं आहे. पण त्यासोबतच दुर्दैवाने सेल्फी काढताना झालेल्या दुर्घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे. तसाच प्रकार सध्या पहायला मिळत आहे़ त्यामुळे पर्यटकांनी संपूर्ण काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी शहरात आणि जिल्ह्यात पावसाने धुवाधार बॅटिंग केली. त्यामुळे यावल तालुक्यातील मनुदेवी येथील व चाळीसगावातील पाटणादेवी येथील धबधबाही खळाळून वाहू लागला आहे. दुसरीकडे जळगावातील कांताई धरणातसुद्धा पाण्याची पातळी वाढली आहे. तर जळगावपासून ६० किमी अंतरावर असलेल्या अजिंठा लेणी येथील धबधबा खळाळून वाहू लागला आहे. धबधब्याचे हे रूप पाहण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची या ठिकाणी गर्दी होत आहे. धबधब्याचा परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला असून उंचावरून कोसळणारा धबधबा पाहतानाच तेथे सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना अनावर होत आहे. स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालून सेल्फी काढणारे नागरिक येथे पहावयाला मिळत आहेत. वनविभाग, स्थानिक संस्था तसेच पोलिसांकडून होत असलेल्या विरोधाला तसेच सुरक्षेबाबतच्या सूचनांना न जुमानता तरुणाई सेल्फीला प्राधान्य देत असल्याचे पहावयास मिळत होते.

पर्यटनाला जा, पण काळजी घ्या

धबधबे, धरण तसेच तलावांच्या ठिकाणी पर्यटकांनी सतर्क राहण्याचे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा जिवावर बेतू शकते़ धबधबा खळाळून वाहत असताना त्याच्या जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. तसेच धरण व तलावांमध्ये पोहणे टाळावे. अनेकजण ज्या भागात मनाई असते, त्या भागात फिरण्यासाठी जातात किंवा पोहण्यासाठी जातात. त्यामुळे अनेकांचा बुडून मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे ज्या भागात मनाई आहे, अशा ठिकाणी जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

तरीही जुमानत नाहीत !

मनुदेवी येथील धबधब्याच्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आले असून धबधब्याच्या पन्नास ते साठ फूट अंतरावर कंपाऊंड बांधण्यात आले आहे, जेणेकरून कुणालाही धबधब्याकडे जाता येणार नाही. दुसरीकडे पाटणादेवी येथेही धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात आले आहे. जळगावातील कांताई धरण येथे कर्मचारी नेमण्यात आले आहेत़ मात्र, तरीही सूचनांना न जुमानता नागरिक गर्दी करीत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी दोन ते तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.