शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
4
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
5
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
6
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
7
पति निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्र किनाऱ्यावर दिसला रोमॅन्टिक अंदाज; बघा लेटेस्ट VIDEO
8
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
9
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
10
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
11
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
12
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
13
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
14
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
15
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
16
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
17
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
18
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
19
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
20
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...

धरण, धबधब्यासोबत सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST

स्टार - ११६७ सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीचा पाऊस चांगला झाल्याने जवळपास जळगाव ...

स्टार - ११६७

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीचा पाऊस चांगला झाल्याने जवळपास जळगाव जिल्ह्यातील सर्वच धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे धबधबे व ओसंडून वाहणारे धरणे पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, धबधबा पाहण्यापेक्षा आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे, मोबाईलवर सेल्फी काढण्याचं फॅड गेल्या काही वर्षांमध्ये बरंच वाढलं आहे. पण त्यासोबतच दुर्दैवाने सेल्फी काढताना झालेल्या दुर्घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे. तसाच प्रकार सध्या पहायला मिळत आहे़ त्यामुळे पर्यटकांनी संपूर्ण काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी शहरात आणि जिल्ह्यात पावसाने धुवाधार बॅटिंग केली. त्यामुळे यावल तालुक्यातील मनुदेवी येथील व चाळीसगावातील पाटणादेवी येथील धबधबाही खळाळून वाहू लागला आहे. दुसरीकडे जळगावातील कांताई धरणातसुद्धा पाण्याची पातळी वाढली आहे. तर जळगावपासून ६० किमी अंतरावर असलेल्या अजिंठा लेणी येथील धबधबा खळाळून वाहू लागला आहे. धबधब्याचे हे रूप पाहण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची या ठिकाणी गर्दी होत आहे. धबधब्याचा परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला असून उंचावरून कोसळणारा धबधबा पाहतानाच तेथे सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना अनावर होत आहे. स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालून सेल्फी काढणारे नागरिक येथे पहावयाला मिळत आहेत. वनविभाग, स्थानिक संस्था तसेच पोलिसांकडून होत असलेल्या विरोधाला तसेच सुरक्षेबाबतच्या सूचनांना न जुमानता तरुणाई सेल्फीला प्राधान्य देत असल्याचे पहावयास मिळत होते.

पर्यटनाला जा, पण काळजी घ्या

धबधबे, धरण तसेच तलावांच्या ठिकाणी पर्यटकांनी सतर्क राहण्याचे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा जिवावर बेतू शकते़ धबधबा खळाळून वाहत असताना त्याच्या जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. तसेच धरण व तलावांमध्ये पोहणे टाळावे. अनेकजण ज्या भागात मनाई असते, त्या भागात फिरण्यासाठी जातात किंवा पोहण्यासाठी जातात. त्यामुळे अनेकांचा बुडून मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे ज्या भागात मनाई आहे, अशा ठिकाणी जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

तरीही जुमानत नाहीत !

मनुदेवी येथील धबधब्याच्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आले असून धबधब्याच्या पन्नास ते साठ फूट अंतरावर कंपाऊंड बांधण्यात आले आहे, जेणेकरून कुणालाही धबधब्याकडे जाता येणार नाही. दुसरीकडे पाटणादेवी येथेही धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात आले आहे. जळगावातील कांताई धरण येथे कर्मचारी नेमण्यात आले आहेत़ मात्र, तरीही सूचनांना न जुमानता नागरिक गर्दी करीत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी दोन ते तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.