शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

CoronaVirus Live Updates : आर्सेनिक अल्बम ३० नव्हे; आता आर्सेनिक अल्बम २००; जाणून घ्या का बदलल्या गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 12:49 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: आधी प्रतिबंधात्मक म्हणून दिले जात असलेले आर्सेनिक अल्बम ३० च्या ऐवजी आता आर्सेनिक अल्बम २०० हे रुग्णांना उपचारादरम्यान दिले जात असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

जळगाव - गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाची पहिली लाट आली होती. त्यावेळी कोरोनापासून बचाव व्हावा, म्हणून सर्वत्र आर्सेनिक अल्बम ३० हे होमियोपॅथीचे औषध दिले जात होते. त्याच काळात व्हिटॅमिन सी आणि प्रोटीनयुक्त आहार रुग्णांना दिला जात होता. मात्र यावेळी दुसऱ्या लाटेत कोविड-१९ ची लक्षणे काही प्रमाणात बदलली आहेत. आधी प्रतिबंधात्मक म्हणून दिले जात असलेले आर्सेनिक अल्बम ३० च्या ऐवजी आता आर्सेनिक अल्बम २०० हे रुग्णांना उपचारादरम्यान दिले जात असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

लोकमतने होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. रितेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात आर्सेनिक अल्बम ३० हे औषध कोरोनापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिले जात होते. मात्र आता जे रुग्ण समोर येत आहेत. त्यांची लक्षणे देखील वेगवेगळी आहेत. त्यामुळे आता रुग्णांना आर्सेनिक अल्बम ३० देण्यापेक्षा आर्सेनिक अल्बम २०० हे दिले पाहिजे. अगदी गंभीर स्थितीतही या औषधामुळे रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी स्थिर होते. इतर रुग्णांना त्याच्या गोळ्या दिल्या तरी व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना त्याचे थेंब दिले गेले पाहिजे. त्यामुळे रुग्णांची ऑक्सिजन पातळी स्थिर राहते. त्यासोबतच कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटर हे मशीनदेखील फायदेशीर ठरेल. या मशीनने घरीच एकाच वेळी दोन रुग्णांना ऑक्सिजन देता येतो, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आहारतज्ज्ञ डॉ. अश्विनी धताते यांनी सांगितले की, ‘कोरोना रुग्णांमध्ये व्हिटॅमिन सी हे महत्त्वाचे ठरते. त्यावर रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. लिंबू आणि संत्राचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. रुग्णालयात आम्ही रुग्णांना काढा देतो. त्यात लिंबू असते तसेच फळांमध्ये संत्री देण्यावर आमचा भर असतो. रुग्णांना प्रोटीनची जास्त गरज असते. त्यामुळे दररोज एक उकडलेले अंडे दिले जाते. त्यासोबतच कडधान्याची उसळ, दाळींचे वरण यातूनही रुग्णांची प्रोटीनची गरज भागते. रुग्णांना आम्ही सकाळी गरम पाणी देतो. त्यानंतर काढा, एक उकडलेले अंडे दिले जाते. नाश्त्यात पोहे, उपमा, उसळ यांचा समावेश असतो. जेवणात वरण- भात, भाजी पोळी दिली जाते. मधल्या वेळेत रुग्णांना फळे देणे फायदेशीर ठरते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगावdoctorडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्र