शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

CoronaVirus Live Updates : आर्सेनिक अल्बम ३० नव्हे; आता आर्सेनिक अल्बम २००; जाणून घ्या का बदलल्या गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 12:49 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: आधी प्रतिबंधात्मक म्हणून दिले जात असलेले आर्सेनिक अल्बम ३० च्या ऐवजी आता आर्सेनिक अल्बम २०० हे रुग्णांना उपचारादरम्यान दिले जात असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

जळगाव - गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाची पहिली लाट आली होती. त्यावेळी कोरोनापासून बचाव व्हावा, म्हणून सर्वत्र आर्सेनिक अल्बम ३० हे होमियोपॅथीचे औषध दिले जात होते. त्याच काळात व्हिटॅमिन सी आणि प्रोटीनयुक्त आहार रुग्णांना दिला जात होता. मात्र यावेळी दुसऱ्या लाटेत कोविड-१९ ची लक्षणे काही प्रमाणात बदलली आहेत. आधी प्रतिबंधात्मक म्हणून दिले जात असलेले आर्सेनिक अल्बम ३० च्या ऐवजी आता आर्सेनिक अल्बम २०० हे रुग्णांना उपचारादरम्यान दिले जात असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

लोकमतने होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. रितेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात आर्सेनिक अल्बम ३० हे औषध कोरोनापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिले जात होते. मात्र आता जे रुग्ण समोर येत आहेत. त्यांची लक्षणे देखील वेगवेगळी आहेत. त्यामुळे आता रुग्णांना आर्सेनिक अल्बम ३० देण्यापेक्षा आर्सेनिक अल्बम २०० हे दिले पाहिजे. अगदी गंभीर स्थितीतही या औषधामुळे रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी स्थिर होते. इतर रुग्णांना त्याच्या गोळ्या दिल्या तरी व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना त्याचे थेंब दिले गेले पाहिजे. त्यामुळे रुग्णांची ऑक्सिजन पातळी स्थिर राहते. त्यासोबतच कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटर हे मशीनदेखील फायदेशीर ठरेल. या मशीनने घरीच एकाच वेळी दोन रुग्णांना ऑक्सिजन देता येतो, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आहारतज्ज्ञ डॉ. अश्विनी धताते यांनी सांगितले की, ‘कोरोना रुग्णांमध्ये व्हिटॅमिन सी हे महत्त्वाचे ठरते. त्यावर रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. लिंबू आणि संत्राचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. रुग्णालयात आम्ही रुग्णांना काढा देतो. त्यात लिंबू असते तसेच फळांमध्ये संत्री देण्यावर आमचा भर असतो. रुग्णांना प्रोटीनची जास्त गरज असते. त्यामुळे दररोज एक उकडलेले अंडे दिले जाते. त्यासोबतच कडधान्याची उसळ, दाळींचे वरण यातूनही रुग्णांची प्रोटीनची गरज भागते. रुग्णांना आम्ही सकाळी गरम पाणी देतो. त्यानंतर काढा, एक उकडलेले अंडे दिले जाते. नाश्त्यात पोहे, उपमा, उसळ यांचा समावेश असतो. जेवणात वरण- भात, भाजी पोळी दिली जाते. मधल्या वेळेत रुग्णांना फळे देणे फायदेशीर ठरते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगावdoctorडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्र