शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

संडे स्पेशल मुलाखत_ आदिवासी साहित्याची भूमिका मानवता केंद्री_ आदिवासी, अहिराणी साहित्यिक सुनील गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 00:12 IST

मराठी साहित्य प्रवाहात आदिवासी साहित्याची भूमिका मानवता केंद्रि असून ते वास्तवाचे प्रश्न मांडण्यात व बोलीभाषा संवर्धनासाठी यशस्वी ठरत आहे

ठळक मुद्दे चर्चेतील व्यक्तीशी थेट संवादबोलीभाषा संवर्धनासाठी महत्वपूर्ण भूमिका

प्रमोद ललवाणीकजगाव, ता.भडगाव : मराठी साहित्य प्रवाहात आदिवासी साहित्याची भूमिका मानवता केंद्रि असून ते वास्तवाचे प्रश्न मांडण्यात व बोलीभाषा संवर्धनासाठी यशस्वी ठरत असल्याचे आदिवासी अहिराणी साहित्यिक सुनील गायकवाड यांनी ह्यलोकमतह्णला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.२०१९ हॆ संयुक्त राष्ट्र संघटना युनोने जागतिक आदिवासी बोली भाषा वर्षं जाहीर केले होते. कारण पृथ्वी तलावरील बऱ्याच बोली भाषा नष्ट झाल्या. विशेष करून आदिवासी बोली यात आपल्या खान्देशातील ३८ आदिवासी बोलींचा मृत भाषेत समावेश होतो. त्यामुळे गेल्या वर्षी "बाडगीनी धार" हॆ आत्मकथन भिलाऊ बोलीत प्रकाशन करण्याचे धाडस केले. या बोलीतील ते पहिले आत्मकथनात्मक पुस्तक आहे. सुनील गायकवाड हे ग्रामीण, आदिवासी साहित्यातील व बोलीभाषा साहित्यातील महत्वाचं नाव. त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : आदिवासी बोलीभाषा संवर्धनाविषयी काय सांगू शकाल?उत्तर : मी बोलीभाषा प्रमाणिकरण समिती म. रा .शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण समिती पुणे वर २०१४ ते २०१५ या कालावधीत काम केले. पण त्यानंतरही आजपर्यत मी वैयक्तिकरित्या काम करतोय. भिलाऊ, तडवी, अफाण बोली, पावरी, मावची, धानका, डोंगरी या बोलीचे संवर्धन सुरू आहे. त्याकरिता आदिवासी साहित्य संमेलन आम्ही ग्रामीण वस्ती, पाडा, गावं, मोहल्लापर्यत नेतोय.प्रश्न : आपल्या लिखानाची प्रेरणा कोणती सांगाल?उत्तर : मी ग्रामीण भागातील जीवन जगतोय आणि जगत आलोय. माझे साहित्य काल्पनिक नाही. वास्तव जीवन जगलो तेच साहित्याचे विषय ठरले. ग्रामीण भागातील माणसे मग आवडत्या म्हणजे सालदार असो शेतकरी वा ग्रामीण व्यवस्था त्यांची दुःख, वेदना, जखमा, चांगल्या बाजू माझे साहित्य बनतात तीच माझी लेखन प्रेरणा.प्रश्न : आपले साहित्यात व साहित्य संमेलनात काही योगदान?उत्तर : मला माझ्या साहित्याने ओळख निर्माण करून दिली. मी कोणत्याही लेखकाचे अणुकरण केले नाही आणि करणार नाही. यामुळे पाचवे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन वडजी, ता.भडगाव, जि. जळगाव संमेलनाध्यक्ष म्हणून २०१९ ला निवड झाली होती. तसेच खान्देश हित संग्राम आयोजित कल्याण येथील आहिराणी साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून योगदान देता आले. शिवाय आदिवासी बोलीकरिता जे. एन. यू. विद्यापीठ दिल्ली येथे कथाकार म्हणून कथाकथनाची भूमिका पार पाडली. ही कथा भारत सरकारच्या साहित्य अकादमी, नवी दिल्लीने आदिवासी कहानियां यात गेल्या वर्षी प्रकाशित केली.प्रश्न : बोलीभाषेसाठी सध्या काय काम सुरू आहे?उत्तर : आदिवासी व बोलीतील साहित्यिकांचे साहित्य एकत्रित करून बोलीतील आदिवासी साहित्य खंड तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच अखिल भारतीय पातळीवर आदिवासी साहित्यिकांची साहित्य सूची व साहित्य परिचय या ग्रंथाचे काम सुरू आहे. याशिवाय आदिवासी साहित्य अकादमीमार्फत दरवर्षी साहित्य संमेलन घेऊन बोलीभाषा टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.प्रश्न : आपण एक उत्तम शिक्षक आहात. यात या उपक्रमात विद्यार्थी असतो का? विद्यार्थी कवी निर्माण झाले?उत्तर : साहित्य हॆ अनुभवाने जन्म घेते. तरी माझ्या कजगाव शाळेतून किरण हिरे हा नवोदित कवी तयार झाला. तसेच लोकेश पाटील, रोहन खैरनार, राजेश पाटील हॆ विद्यार्थी राज्यस्तरीय विद्यार्थी संमेलनात गाजले.

 

 

 

 

टॅग्स :interviewमुलाखतBhadgaon भडगाव