शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत_ आदिवासी साहित्याची भूमिका मानवता केंद्री_ आदिवासी, अहिराणी साहित्यिक सुनील गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 00:12 IST

मराठी साहित्य प्रवाहात आदिवासी साहित्याची भूमिका मानवता केंद्रि असून ते वास्तवाचे प्रश्न मांडण्यात व बोलीभाषा संवर्धनासाठी यशस्वी ठरत आहे

ठळक मुद्दे चर्चेतील व्यक्तीशी थेट संवादबोलीभाषा संवर्धनासाठी महत्वपूर्ण भूमिका

प्रमोद ललवाणीकजगाव, ता.भडगाव : मराठी साहित्य प्रवाहात आदिवासी साहित्याची भूमिका मानवता केंद्रि असून ते वास्तवाचे प्रश्न मांडण्यात व बोलीभाषा संवर्धनासाठी यशस्वी ठरत असल्याचे आदिवासी अहिराणी साहित्यिक सुनील गायकवाड यांनी ह्यलोकमतह्णला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.२०१९ हॆ संयुक्त राष्ट्र संघटना युनोने जागतिक आदिवासी बोली भाषा वर्षं जाहीर केले होते. कारण पृथ्वी तलावरील बऱ्याच बोली भाषा नष्ट झाल्या. विशेष करून आदिवासी बोली यात आपल्या खान्देशातील ३८ आदिवासी बोलींचा मृत भाषेत समावेश होतो. त्यामुळे गेल्या वर्षी "बाडगीनी धार" हॆ आत्मकथन भिलाऊ बोलीत प्रकाशन करण्याचे धाडस केले. या बोलीतील ते पहिले आत्मकथनात्मक पुस्तक आहे. सुनील गायकवाड हे ग्रामीण, आदिवासी साहित्यातील व बोलीभाषा साहित्यातील महत्वाचं नाव. त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : आदिवासी बोलीभाषा संवर्धनाविषयी काय सांगू शकाल?उत्तर : मी बोलीभाषा प्रमाणिकरण समिती म. रा .शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण समिती पुणे वर २०१४ ते २०१५ या कालावधीत काम केले. पण त्यानंतरही आजपर्यत मी वैयक्तिकरित्या काम करतोय. भिलाऊ, तडवी, अफाण बोली, पावरी, मावची, धानका, डोंगरी या बोलीचे संवर्धन सुरू आहे. त्याकरिता आदिवासी साहित्य संमेलन आम्ही ग्रामीण वस्ती, पाडा, गावं, मोहल्लापर्यत नेतोय.प्रश्न : आपल्या लिखानाची प्रेरणा कोणती सांगाल?उत्तर : मी ग्रामीण भागातील जीवन जगतोय आणि जगत आलोय. माझे साहित्य काल्पनिक नाही. वास्तव जीवन जगलो तेच साहित्याचे विषय ठरले. ग्रामीण भागातील माणसे मग आवडत्या म्हणजे सालदार असो शेतकरी वा ग्रामीण व्यवस्था त्यांची दुःख, वेदना, जखमा, चांगल्या बाजू माझे साहित्य बनतात तीच माझी लेखन प्रेरणा.प्रश्न : आपले साहित्यात व साहित्य संमेलनात काही योगदान?उत्तर : मला माझ्या साहित्याने ओळख निर्माण करून दिली. मी कोणत्याही लेखकाचे अणुकरण केले नाही आणि करणार नाही. यामुळे पाचवे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन वडजी, ता.भडगाव, जि. जळगाव संमेलनाध्यक्ष म्हणून २०१९ ला निवड झाली होती. तसेच खान्देश हित संग्राम आयोजित कल्याण येथील आहिराणी साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून योगदान देता आले. शिवाय आदिवासी बोलीकरिता जे. एन. यू. विद्यापीठ दिल्ली येथे कथाकार म्हणून कथाकथनाची भूमिका पार पाडली. ही कथा भारत सरकारच्या साहित्य अकादमी, नवी दिल्लीने आदिवासी कहानियां यात गेल्या वर्षी प्रकाशित केली.प्रश्न : बोलीभाषेसाठी सध्या काय काम सुरू आहे?उत्तर : आदिवासी व बोलीतील साहित्यिकांचे साहित्य एकत्रित करून बोलीतील आदिवासी साहित्य खंड तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच अखिल भारतीय पातळीवर आदिवासी साहित्यिकांची साहित्य सूची व साहित्य परिचय या ग्रंथाचे काम सुरू आहे. याशिवाय आदिवासी साहित्य अकादमीमार्फत दरवर्षी साहित्य संमेलन घेऊन बोलीभाषा टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.प्रश्न : आपण एक उत्तम शिक्षक आहात. यात या उपक्रमात विद्यार्थी असतो का? विद्यार्थी कवी निर्माण झाले?उत्तर : साहित्य हॆ अनुभवाने जन्म घेते. तरी माझ्या कजगाव शाळेतून किरण हिरे हा नवोदित कवी तयार झाला. तसेच लोकेश पाटील, रोहन खैरनार, राजेश पाटील हॆ विद्यार्थी राज्यस्तरीय विद्यार्थी संमेलनात गाजले.

 

 

 

 

टॅग्स :interviewमुलाखतBhadgaon भडगाव