शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

महिला सहाय्य कक्षाची यशस्वी शिष्टाई, ३५१ जोडप्यांची बहरली संसारवेल !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 3:29 PM

संशय, वाद दूर करून त्यांना एकत्र आणण्याची किमया स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला सहाय्य कक्षाच्या ‘खाकी’ तील शिलेदारांनी करून दाखविली आहे.

- सुनील पाटीलजळगाव : संशय, शंका, गैरसमज व कौटुंबिक कलह यामुळे संसारात मिठाचा खडा पडला अन् काडीमोडपर्यंत आलेल्या जिल्ह्यातील ३५१ जोडप्यांच्या मनातील संशय, वाद दूर करून त्यांना एकत्र आणण्याची किमया स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला सहाय्य कक्षाच्या ‘खाकी’ तील शिलेदारांनी करून दाखविली आहे.एकमेकांचे तोंड पाहणार नाही, तू माझ्या डोळ्यासमोर नकोच असे म्हणणारे जोडपे एकमेकाला मिठी मारून तोंड गोड करत घरी एकत्रितपणे परतले. दु:खी मनाने आलेल्या या दाम्पत्यांच्या डोळ्यातून जेव्हा आनंदाश्रू तरळायला लागले तेव्हा ‘खाकी’ तील या शिलेदारांनाही आपल्या कामाचे सार्थक झाल्याचे समाधान लाभले. दरम्यान, अखेरपर्यंत दोन्ही गटांची समजूत घालूनही यश न आलेल्या ३२८ प्रकरणात मात्र पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले.महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या ४९८ या कलमाचा अनेक प्रकरणात महिलांकडून गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. त्याआधी पोलिसांकडून अशा प्रकरणात दोन्हीकडील म्हणणे ऐकून घेत समजोता घडवून आणण्याचे निर्देश असल्याने प्रत्येक जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र महिला सहाय कक्षाची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात महिला सहाय कक्ष स्थापन करण्यात आला आहे.शिफारशीनंतर होतो गुन्हा दाखलजळगाव येथील महिला सहाय कक्षात सहायक फौजदार अन्नपूर्णा बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल वंदना आंबिकार, सविता परदेशी, वैशाली पाटील व शैला धनगर या पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षाकडे दाखल असलेल्या प्रकरणात पती-पत्नीसह दोन्हीकडील कुटुंबाना एकत्र बोलावण्यात येते. त्यांच्यात समजूत घालून गैरसमज दूर केले जातात. ज्या प्रकरणात तडजोड शक्यच नाही किंवा कोणी दोषी आढळत असेल तर त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची शिफारस या कक्षाकडून केली जाते. त्यांच्या शिफारसीनंतरच गुन्हा दाखल होतो, मात्र या दोषी नसलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होत नाही, त्यामुळे कायद्याचा दुरुपयोग टाळला जातो. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या नियंत्रणात या शाखेचे कामकाज चालते. पोलीस अधीक्षक दर महिन्याला आढावा घेतात.चिमुरड्यांमुळे आयुष्याला कलाटणीअनेक प्रकरणांमध्ये दाम्पत्याला मुलबाळ झालेले असताना त्यांचा त्याग करुन अनेक जण घटस्फोटाची तयारी ठेवतात. अशा प्रसंगात महिला सहाय कक्षातील पथकाकडून काही घटनांचे बोलके उदाहरणे दिली जातात. त्यातून होणारे चांगले व वाईट परिणाम दृष्यस्वरुपात बघावयास मिळाल्यामुळे काडीमोड घेणारे दाम्पत्य दोन पावले मागे येतात व तेथेच या दाम्पत्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते.वृद्ध आई, वडिलांची फरफट...न्यायासाठी आलेल्या पती-पत्नींची समजूत घालताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. किरकोळ कारणे व गैरसमजुतीतून वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे पती-पत्नी तर वेगळे राहतातच, परंतु त्याचा फटका त्यांच्या निष्पाप बालकांनाही बसला आहे. काही प्रकरणात वृद्ध आई, वडिलांची फरफट झालेली आहे, असे निरागस चेहरे पाहून अंतकरण भरुन येते व त्यातून अश्रू आवरणे कठीण होते. मात्र अशा संवेदनशील प्रकरणात कुटुंब एकत्र आणण्यात यश येते तेव्हा आपोआपच आनंदाश्रू तरळतात, असे अनुभव या कक्षाच्या अन्नपूर्णा बनसोडे यांनी सांगितले.असे आहेत पती-पत्नीचे दाखल प्रकरणे (जानेवारी २०१७ ते जुलै २०१८)एकूण - १८३९समजोता - ३५१गुन्हे दाखल - ३२८न्यायालय - २९१अर्ज निकाली - ४२८प्रलंबित - ४४१समझोता करण्यासाठी आलेल्या प्रकरणांमध्ये ब-याच वेळा हाणामारीचे प्रसंग घडले आहेत. सासू-सास-यांपासून वेगळे रहाणे, मुलीच्या आईचा नको तितका हस्तक्षेप यामुळे वादाचे प्रसंग घडल्याचे प्रकरणे अधिक आहेत. अनेक कुटुंबाच्या वादाला मोबाईल हे एक मोठे कारण आहे. त्यातून गैरसमज होऊन टोकाचे मतभेद झाले आहेत. प्रत्येक सासूने सुनेला मुलीसारखे तर सुनेने सासूला आई मानले तर बहुतांश वाद जागेवर मिटतील.-अन्नपूर्णा बनसोडे, सहायक फौजदार, महिला सहाय कक्ष

टॅग्स :Jalgaonजळगाव