शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

जिल्ह्यात मृगाची जोरदार सलामी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 10:02 PM

जिल्ह्याच्या अनेक भागात मृगाने जोरदार सलामी दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

ठळक मुद्देतळईत अंगावर वीज पडून शेतकऱ्यासह दोन जण ठार 

लोकमत न्यूज नेटवर्क

कासोदा ता. एरंडोल/मुक्ताईनगर : जिल्ह्याच्या अनेक भागात मृगाने जोरदार सलामी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. दुसरीकडे  या सलामीसोबत दोन बळीही गेले. झाडाखाली आश्रयासाठी थांबलेल्या लोकांच्या अंगावर वीज पडून त्यातील शेतकरी  व तरुण असे दोन जण ठार झाले.  ही घटना तळई ता. एरंडोल येथे बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एका शेतात घडली.

विक्रम दौलत चौधरी (५२) व भूषण अनिल पाटील (१८) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. बुधवारी दुपारी तळई परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला.  गावाजवळील पांढरीच्या शेतातील काही लोक झाडाखाली थांबले होते. याच झाडावर अचानक वीज कोसळली आणि त्यात  शेतकरी  जागीच ठार झाला तर भूषण हा जखमी झाला.   त्याला जळगावकडे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तळईचे माजी सरपंच अशोक महाजन यांनी दिली. भूषण हा ११ वीत शिक्षण घेत होता.  पाऊस सुरु झाल्याने या शेतातील झाडाखाली सात जण थांबून होते. इतर पाच जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

वीज पडून १० जण जखमी

दुसरीकडे जीन्सी ता. रावेर येथे एका शेतात ठिबक नळया पसरवित असताना अचानक वीज पडून दहा जण जखमी झाले आहेत.  त्यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  त्यांची तब्येत सुधारत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुक्ताईनगर : तालुक्यातील अनेक भागाला बुधवारी पहाटे दोन ते पाच दरम्यान जोरदार पावसाने झोडपून काढले. कुऱ्हा परिसरात अनेक नदी नाल्याना पूर आला. यात सुळे येथील पार्थ नदीला पूर आल्याने नदी काठावर उभी असलेली चारचाकी वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेली.  सुदैवाने काही अंतरावर याच नदीवर असलेल्या लहान पुलात हे वाहन अडकून थांबली. पहाटेच्या पावसाने  परिसरात अनेक लहान मोठे नाल्याना पूर आला.

टॅग्स :JalgaonजळगावErandolएरंडोलMuktainagarमुक्ताईनगरRainपाऊस