शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

धर्मांतर थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 11:59 IST

भारतीय सिंधू सभेची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

जळगाव : पाकिस्तानातील सिंधी समाज संकटात असून सिंध प्रांतात मुलींचे अपहरण करून त्यांचा धर्म बळजबरीने बदलून त्यांच्याशी विवाह करणे आदी प्रकार होत आहेत. देशातही काही ठिकाणी हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना थांबवण्साठी कठोर पावले उचलावीत तसेच पाकिस्तान सरकारवरही यासाठी दबाव आणावा, अशी मागणी भारतीय सिंधू सभेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी हे निवेदन स्विकारले. त्यात म्हटले आहे की, भारतीय सिंधू सभा १९७९ पासून अखिल भारतीय स्तरावर कार्यरत आहे. ही संघटना सेवा, संघटन आणि उच्च मूल्याचे संस्कार या माध्यमातून सिंधी समाजात एकात्म भाव जपण्याचे, तो वृद्धिंगत करण्याचे काम करीत आहे. अखंड भारताच्या झालेल्या फाळणीत आपले सर्वस्व समर्पित करून सिंधी समाज आज भारतासह जगातील विविध भागात स्थिरावला आहे. या दरम्यान, सिंधी समाजाने आपल्यावरील सनातन धमार्चे पूवार्पार संस्कार जपले असून, त्यांना आपली ओळख बनवले आहे. परंतु, वर्तमानात पाकिस्तानातील सिंधी समाज संकटात आहे. तेथील काही तत्त्व समाजाची परंपरा छेदण्याचा प्रयत्न करीत आहेत. युवा पिढीची दिशाभूल करून त्यांचे धर्मांतर घडवून आणणे, मुलींचे अपहरण करून त्यांचा धर्म बळजबरीने बदलून त्यांच्याशी विवाह करणे आदी प्रकार होत आहेत. सिंध प्रांतात अशा घटनांची संख्या मोठी आहे.यामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समाजात भय आणि संतापाचे वातावरण आहे. भारतामधील काही वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या वृत्तांनुसार, ११ ते १५ वर्षे वयोगटातील हिंदू मुली अधिक संख्येने अशा घटनांच्या शिकार झाल्या असल्याचे आढळून आले आहे. पाकिस्तानच्या २० कोटी लोकसंख्येत हिंदू केवळ ३६ लाख आहेत. म्हणजेच १.६ टक्के. सन २०१८ ची ही आकडेवारी आहे.-भारतामध्येही काही भागात अशा घटना घडत असून, त्याबाबत भारत सरकारने गंभीर दखल घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून योग्य ती कारवाई करावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.-शिष्टमंडळात सिंधी अकादमीचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी, माजी नगरसेवक राजकुमार अडवाणी, भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष मनोहरलाल जाधवानी, शहराध्यक्ष डॉ.मुलचंद उदासी, डॉ.संजय हिराणी, रायसिंघानी आदींचा समावेश होता.-भारतीय सिंधू सभेची राष्ट्रीय चिंतन बैठक २७ व २८ जुलै रोजी, भोपाळ येथे झाली. देशभरातून ५१२ प्रतिनिधी उपस्थित होते.-भारतीय सिंधू सभेची राष्ट्रीय चिंतन बैठक २७ व २८ जुलै २०१९ रोजी, भोपाळ येथे झाली. यात देशभरातून ५१२ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी धर्मांतरण आणि लव्ह जिहादच्या घटना थांबाव्यात यासाठी कठोर पावले उचलली जावीत.-अशा घटनांची पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई संबंधितांवर करावी.यावेळी धर्मांतरण आणि लव्ह जिहादच्या घटना थांबाव्यात यासाठी कठोर पावले उचलली जावीत. अशा घटनांची पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई संबंधितांवर करावी.- ज्यामुळे भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात यावा, असा ठराव करण्यात आला आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव