शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

धर्मांतर थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 11:59 IST

भारतीय सिंधू सभेची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

जळगाव : पाकिस्तानातील सिंधी समाज संकटात असून सिंध प्रांतात मुलींचे अपहरण करून त्यांचा धर्म बळजबरीने बदलून त्यांच्याशी विवाह करणे आदी प्रकार होत आहेत. देशातही काही ठिकाणी हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना थांबवण्साठी कठोर पावले उचलावीत तसेच पाकिस्तान सरकारवरही यासाठी दबाव आणावा, अशी मागणी भारतीय सिंधू सभेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी हे निवेदन स्विकारले. त्यात म्हटले आहे की, भारतीय सिंधू सभा १९७९ पासून अखिल भारतीय स्तरावर कार्यरत आहे. ही संघटना सेवा, संघटन आणि उच्च मूल्याचे संस्कार या माध्यमातून सिंधी समाजात एकात्म भाव जपण्याचे, तो वृद्धिंगत करण्याचे काम करीत आहे. अखंड भारताच्या झालेल्या फाळणीत आपले सर्वस्व समर्पित करून सिंधी समाज आज भारतासह जगातील विविध भागात स्थिरावला आहे. या दरम्यान, सिंधी समाजाने आपल्यावरील सनातन धमार्चे पूवार्पार संस्कार जपले असून, त्यांना आपली ओळख बनवले आहे. परंतु, वर्तमानात पाकिस्तानातील सिंधी समाज संकटात आहे. तेथील काही तत्त्व समाजाची परंपरा छेदण्याचा प्रयत्न करीत आहेत. युवा पिढीची दिशाभूल करून त्यांचे धर्मांतर घडवून आणणे, मुलींचे अपहरण करून त्यांचा धर्म बळजबरीने बदलून त्यांच्याशी विवाह करणे आदी प्रकार होत आहेत. सिंध प्रांतात अशा घटनांची संख्या मोठी आहे.यामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समाजात भय आणि संतापाचे वातावरण आहे. भारतामधील काही वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या वृत्तांनुसार, ११ ते १५ वर्षे वयोगटातील हिंदू मुली अधिक संख्येने अशा घटनांच्या शिकार झाल्या असल्याचे आढळून आले आहे. पाकिस्तानच्या २० कोटी लोकसंख्येत हिंदू केवळ ३६ लाख आहेत. म्हणजेच १.६ टक्के. सन २०१८ ची ही आकडेवारी आहे.-भारतामध्येही काही भागात अशा घटना घडत असून, त्याबाबत भारत सरकारने गंभीर दखल घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून योग्य ती कारवाई करावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.-शिष्टमंडळात सिंधी अकादमीचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी, माजी नगरसेवक राजकुमार अडवाणी, भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष मनोहरलाल जाधवानी, शहराध्यक्ष डॉ.मुलचंद उदासी, डॉ.संजय हिराणी, रायसिंघानी आदींचा समावेश होता.-भारतीय सिंधू सभेची राष्ट्रीय चिंतन बैठक २७ व २८ जुलै रोजी, भोपाळ येथे झाली. देशभरातून ५१२ प्रतिनिधी उपस्थित होते.-भारतीय सिंधू सभेची राष्ट्रीय चिंतन बैठक २७ व २८ जुलै २०१९ रोजी, भोपाळ येथे झाली. यात देशभरातून ५१२ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी धर्मांतरण आणि लव्ह जिहादच्या घटना थांबाव्यात यासाठी कठोर पावले उचलली जावीत.-अशा घटनांची पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई संबंधितांवर करावी.यावेळी धर्मांतरण आणि लव्ह जिहादच्या घटना थांबाव्यात यासाठी कठोर पावले उचलली जावीत. अशा घटनांची पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई संबंधितांवर करावी.- ज्यामुळे भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात यावा, असा ठराव करण्यात आला आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव