शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

धर्मांतर थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 11:59 IST

भारतीय सिंधू सभेची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

जळगाव : पाकिस्तानातील सिंधी समाज संकटात असून सिंध प्रांतात मुलींचे अपहरण करून त्यांचा धर्म बळजबरीने बदलून त्यांच्याशी विवाह करणे आदी प्रकार होत आहेत. देशातही काही ठिकाणी हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना थांबवण्साठी कठोर पावले उचलावीत तसेच पाकिस्तान सरकारवरही यासाठी दबाव आणावा, अशी मागणी भारतीय सिंधू सभेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी हे निवेदन स्विकारले. त्यात म्हटले आहे की, भारतीय सिंधू सभा १९७९ पासून अखिल भारतीय स्तरावर कार्यरत आहे. ही संघटना सेवा, संघटन आणि उच्च मूल्याचे संस्कार या माध्यमातून सिंधी समाजात एकात्म भाव जपण्याचे, तो वृद्धिंगत करण्याचे काम करीत आहे. अखंड भारताच्या झालेल्या फाळणीत आपले सर्वस्व समर्पित करून सिंधी समाज आज भारतासह जगातील विविध भागात स्थिरावला आहे. या दरम्यान, सिंधी समाजाने आपल्यावरील सनातन धमार्चे पूवार्पार संस्कार जपले असून, त्यांना आपली ओळख बनवले आहे. परंतु, वर्तमानात पाकिस्तानातील सिंधी समाज संकटात आहे. तेथील काही तत्त्व समाजाची परंपरा छेदण्याचा प्रयत्न करीत आहेत. युवा पिढीची दिशाभूल करून त्यांचे धर्मांतर घडवून आणणे, मुलींचे अपहरण करून त्यांचा धर्म बळजबरीने बदलून त्यांच्याशी विवाह करणे आदी प्रकार होत आहेत. सिंध प्रांतात अशा घटनांची संख्या मोठी आहे.यामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समाजात भय आणि संतापाचे वातावरण आहे. भारतामधील काही वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या वृत्तांनुसार, ११ ते १५ वर्षे वयोगटातील हिंदू मुली अधिक संख्येने अशा घटनांच्या शिकार झाल्या असल्याचे आढळून आले आहे. पाकिस्तानच्या २० कोटी लोकसंख्येत हिंदू केवळ ३६ लाख आहेत. म्हणजेच १.६ टक्के. सन २०१८ ची ही आकडेवारी आहे.-भारतामध्येही काही भागात अशा घटना घडत असून, त्याबाबत भारत सरकारने गंभीर दखल घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून योग्य ती कारवाई करावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.-शिष्टमंडळात सिंधी अकादमीचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी, माजी नगरसेवक राजकुमार अडवाणी, भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष मनोहरलाल जाधवानी, शहराध्यक्ष डॉ.मुलचंद उदासी, डॉ.संजय हिराणी, रायसिंघानी आदींचा समावेश होता.-भारतीय सिंधू सभेची राष्ट्रीय चिंतन बैठक २७ व २८ जुलै रोजी, भोपाळ येथे झाली. देशभरातून ५१२ प्रतिनिधी उपस्थित होते.-भारतीय सिंधू सभेची राष्ट्रीय चिंतन बैठक २७ व २८ जुलै २०१९ रोजी, भोपाळ येथे झाली. यात देशभरातून ५१२ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी धर्मांतरण आणि लव्ह जिहादच्या घटना थांबाव्यात यासाठी कठोर पावले उचलली जावीत.-अशा घटनांची पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई संबंधितांवर करावी.यावेळी धर्मांतरण आणि लव्ह जिहादच्या घटना थांबाव्यात यासाठी कठोर पावले उचलली जावीत. अशा घटनांची पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई संबंधितांवर करावी.- ज्यामुळे भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात यावा, असा ठराव करण्यात आला आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव