शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

केटी वेअर असूनही नसल्यासारखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:02 IST

कजगाव : केटी वेअरच्या प्लेटांचे रबर खराब झाल्याने होते पाण्याची गळती, बंधाऱ्याच्या पायावर स्लॅबची गरज

आॅनलाई लोकमतकजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव, दि. २१ : कजगाव, उमरखेड व पासर्डी या तीन गावालगत तितूर नदीपात्रात साधारण पावणेतीन कोटी रुपये खर्चाचे तीन के.टी.वेअर सन २००७ मध्ये बनविण्यात आले. या तिघे के.टी.वेअरचे काही काम निधीअभावी अपूर्ण पडले तर के.टी.वेअरच्या प्लेटांचे रबर खराब झाल्याने गळती थांबत नसल्याने यात पाण्याचा साठा होत नाही.या तिघा के.टी. वेअरची स्थिती ही ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशीच काहीशी झाली आहे. या महत्त्वपूर्ण बाबीकडे आमदार किशोर पाटील यांनी लक्ष देऊन अपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करावा. या के.टी.वेअरच्या पायावर एक ते दीड मीटरच्या स्लॅबची पडदी ओतण्याची गरज आहे. जेणेकरून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी येथे अडेल व पाण्याचा साठा येथे होणार आहे.सन २००६ मध्ये कजगाव, उमरखेड, पासर्डी या तीन गावांसाठी तीन के.टी. वेअर मंजूर करण्यात आले. यात कजगावच्या के.टी. वेअरसाठी अंदाजे एक कोटी तेरा लाख रुपये खर्च झाले.याची पाणी अडविण्याची क्षमता अंदाजे ३८ दशलक्ष घनफुट तसेच बुडीत क्षेत्र साधारण अडीच ते तीन किलोमीटर, उमरखेड येथील के.टी. वेअरसाठी अंदाजे ७९ लाख रुपये खर्च झाले. याची पाणी अडविण्याची क्षमता १९ दशलक्ष घनफुट तसेच बुडीत क्षेत्र साधारण दोन ते अडीच किलोमीटर, तर पासर्डी येथील के.टी. वेअरसाठी अंदाजे ८२ लाख रुपये खर्च झाले.याची पाणी अडविण्याची क्षमता अंदाजे १८.५ दशलक्ष घनफुट तसेच बुडीत क्षेत्र दोन ते अडीच किलोमीटर असे हे अंदाजे पावणेतीन कोटी रुपयांचे भव्य के.टी. वेअर या भागात उभे झाल्याने हा परिसर सुजलाम सुफलाम होईल, पुन्हा या भागात केळी बहरेल, पासर्डी ते उमरखेड या दरम्यानची शेती मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येईल, या आशेवर सारेच होते.मात्र के.टी. वेअरच्या अपूर्ण कामामुळे पाहिजे त्या प्रमाणात या के.टी. वेअरमध्ये पाणी अडविता येत नव्हते, तर काही प्रमाणात अडकलेल्या पाण्यास प्लेटांच्या गळतीमुळे अडकलेले पाणी वाहून जात असल्याने के.टी. वेअर कोरडा पडत असतो. यामुळे हे के.टी.वेअर असूनही नसल्यासारखेच झाले आहे.आठ गावांना मोठ्या प्रमाणात पाणी समस्येला तोंड द्यावे लागणारकजगाव, उमरखेड, तांदुळवाडी, पिंप्री, भोरटेक, घुसर्डी, पासर्डी, मळगाव या गावांना केवळ तितूर नदीचा सहारा आहे. कारण गिरणेच्या लाभ क्षेत्रामध्ये जरी ही गावे मोडली जातात तरी मात्र कोणताही लाभ या गावांना गिरणेचा नाही. सारी दारोमदार तितूर नदीवर आहे आणि या नदीच्या प्रवाहात अनेक सिमेंट बंधारे बनत असल्याने प्रत्येक गावाचे पाणी त्या-त्या बंधाºयात अडकत असल्याने पाणी खालच्या गावापर्यंत पोहचत नसल्याने या आठ गावांची स्थिती भविष्यात फार बिकट होऊ शकते. कारण या नदीवर अनेक ठिकाणी विनागेटचे सिमेंट बंधारे बनविण्यात आले असल्याने या नदीचे पाणी भडगाव व पाचोरा तालुक्यातील या आठ गावात पोहचणार नाही. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बागायत शेतीचा प्रश्न उभा राहू शकतो. यासाठी ठोस अशी उपाययोजना होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Bhadgaon भडगाव