शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

स्वाक्षरी अस्पष्ट असल्याने जळगावात महावितरणच्या ११ परीक्षार्थींना प्रवेश नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:31 PM

महावितरणच्या ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनिअरपदाच्या परीक्षेत गोंधळ

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा संतापअन् परीक्षार्र्थींना अश्रू अनावर

जळगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनिअरपदासाठी शनिवारी आयबीपीएसच्या वतीने परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेदरम्यान शहरातील गुलाबराव देवकर इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला़ केंद्र प्रमुखाकडील परीक्षार्थींच्या यादीत सही अस्पष्ट असल्याच्या कारणावरून पर्यवेक्षकाने ११ परीक्षार्थींना हॉलबाहेर काढले. ओळखीचा पुरावा असतानासुद्धा परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे परीक्षार्र्थींनी तीव्र संताप व्यक्त केला.गुलाबराव देवकर अभियांत्रिकीच्या केंद्रावरील घटनामहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत ट्रेनी इंजिनिअरपदाच्या ६३ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत शनिवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेदरम्यान १५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी आयबीपीएसतर्फे एका खासगी कंपनीला देण्यात आली होती. त्यानुसार शहरातील गुलाबराव देवकर इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी सकाळी ८़३० वाजेपासून परीक्षार्थी जमले होते. महिला परीक्षा केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकाकडून परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रासह अन्य कागदपत्रांची तपासणी करून त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जात होता. मात्र, काही परीक्षार्थींची केंद्र प्रमुखाकडे असलेल्या यादीत सही अस्पष्ट होती़ त्यांना सही अस्पष्ट असल्याने ११ परीक्षार्र्थींना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश का नाकारला याची विचारणा त्या ११ परीक्षार्थींनी केली असता परीक्षा केंद्राप्रमुखाकडून कोणतेही उत्तर त्यांना मिळाले नाही़ फक्त या संकेतस्थळावर तक्रार करा एवढेच सांगून त्या निघून गेल्या़ तसेच परीक्षार्थींनी विनंती करूनही त्यांचे म्हणणे ऐकून न घेता परीक्षा हॉलचा दरवाजा बंद केला़ त्यानंतर आपले कुणीही ऐकून घेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलच्या बाहेरच ठिय्या मांडला़अन् परीक्षार्र्थींना अश्रू अनावरस्वत:ची चूक नसताना फक्त आॅनलाइन घोळामुळे सही अस्पष्ट आल्याच्या कारणावरून परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे ११ परीक्षार्थींपैकी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे परीक्षार्थींची समस्या जाणून घेण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केंद्र गाठले़ परीक्षार्र्थींचे म्हणणे समजून घेतले. त्यामुळे ते शांत झाले़सन २०१५ पासून परीक्षेसाठी तयारी करीत होतो. सही अस्पष्ट असल्याच्या कारणावरून परीक्षा हॉलच्या बाहेर काढण्यात आले़ कुणीही आमचे ऐकून घेतले नाही़-संदेश पाटील, परीक्षार्थी

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalgaonजळगाव