शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

ठेवी परत मिळत नसल्याने जळगाव जिल्हा उपनिबंधकांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:50 AM

ठेवीदार संतप्त : ठेवी का मिळत नाही?

जळगाव - जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवी दहा-बारा वर्षे होऊनही परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी गुरुवारी जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांना त्यांच्याच दालनात गाठून घेराव घातला. तसेच ठेवी का मिळत नाही? असा सवाल उपस्थित करून ठेवीदारांनी उपनिबंधकांना धारेवर धरले.जिल्ह्यातील ठेवीदारांना गेल्या दहा-बारा वर्षापासून त्यांच्या ठेवी परत मिळत नसल्याचे चित्र असून सहकार विभागाकडून ठेवीदारांची घोर निराशा झाली आहे. अनेक ठेवीदार तर मयत झाले तरीदेखील त्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळाला नाही. यासंदर्भात जळगाव जिल्हा महिला ठेवीदार समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्ह्यातील ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा संध्या चित्ते, प्रवीणसिंग पाटील यांनी ठेवीदारांच्या ठेवींसंदर्भात उपनिबंधकांना धारेवर धरले.अ?क्शन प्लॅनची अंमलबजावणी नाहीतत्कालीन सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरविण्यात आलेल्या अ‍ॅक्शन प्लॅनवर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी का करण्यात आली नाही? ठेवीदारांना निव्वळ आश्वासने देऊन वेळ का मारून नेली जात आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती ठेवीदारांकडून करण्यात आली.सहकार आयुक्तांना आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर उपनिबंधकांनी बैठकीचे आश्वासन दिले होते. ते का पाळले जात नाही? असा सवालही ठेवीदारांना उपनिबंधकांना केला.यावेळी लक्ष्मण कोल्हे, ताराबाई माळी, मीराबाई नारखेडे, कल्पना बढे, शारदा चौधरी, मधुकर बढे, नारायण चौधरी, चित्रकला फेगडे, योगीता घोराडे, स्वाती फेगडे, वैशाली नेहते, निलीमा पाटील, लता लोखंडे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव