शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पर्यावरणीय व मानवजातीच्या शाश्वत विकासासाठी शिरीष बर्वे यांचे आठ दिवस अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 23:39 IST

चळवळ : सोशल मीडियावरून पर्यावरण रक्षणासाठी आवाहन  जळगाव : औद्योगिक प्रगतीमुळे  अंगिकारलेली जीवनशैली, त्यातून निर्माण होणाºया पर्यावरणविषयक समस्या, त्यातून ...

चळवळ : सोशल मीडियावरून पर्यावरण रक्षणासाठी आवाहन 

जळगाव : औद्योगिक प्रगतीमुळे  अंगिकारलेली जीवनशैली, त्यातून निर्माण होणाºया पर्यावरणविषयक समस्या, त्यातून पुढे येणारे गंभीर परिणाम व तरीदेखील न बदलणारी मानसिकता, हे सर्व प्रकार पर्यावरसाठी घातक ठरत असून  हे रोखणे गरजेचे असल्याने  याकडे लक्ष वेधण्यासाठी जळगावात चळवळ सुरू झाली आहे. यामध्ये आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी स्वातंत्र्य दिन, १५ आॅगस्ट ते २२ आॅगस्ट दरम्यान अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या चळवळीत सहभागीसाठी आवाहनही केले आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे संयम  आठ दिवस उपवास करून स्वत:चाच संयम व या गंभीर विषयाबाबत निर्धार तपासण्यासाठी आठ दिवस उपवास करीत असल्याचे बर्वे यांनी सांगितले.  भावी पिढीसाठी सहभागी व्हा४० वर्षांखालील सर्व तरुण पिढीने यात सक्रिय सहभाग नोंदवावा, ४० वर्षांवरील पिढी ज्यांना त्यांच्या भविष्यातील पिढ्यांची काळजी आहे त्यांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन बर्वे यांनी केले आहे.   या सोबतच सर्व पक्षांचे राजकारणी, जे हा बदल घडवून आणू शकतात त्यांनी मतांचे राजकारण बाजूला ठेऊन भविष्यातील पिढ्यांच्या चांगल्या आणि सुखी जीवनासाठी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या आठ दिवसात याविषयासाठी तयार केलेल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून  संदर्भातील महत्त्वाचे  विषय मांडून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे,  अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. योग्य प्रबोधन आवश्यकया समस्येचा सामना करण्यासाठी  मोदी सरकारने काही प्रमाणात पावले उचलत या बद्दल बोलायला सुरुवात केली आहे. मात्र प्रस्थापित गल्ली ते दिल्ली बहुतेक सर्व राजकारणी व सरकारी यंत्रणा याविषयी अशिक्षित असल्यामुळे त्यांना या समस्येच्या व्याप्तीचे गांभीर्य कळूच शकत नाही. समाज उदासीन आहे असे अजिबात नाही. त्यांचे योग्य प्रबोधन करून त्यांना जागृतच केलं जात नाही, ही खरी समस्या असून यासाठी हे प्रबोधन आवश्यक असल्याने ही चळवळ सुरू झाली आहे. तिसरे महायुद्ध पर्यावरण बदलाच्या विरुद्ध लढले जाणार असून हे दीर्घ काळ चालणारे युद्ध आहे, असे शिरीष बर्वे यांचे म्हणणे आहे. आता ही जागतिक आणीबाणीची परिस्थिती असून गेल्या ३०० वर्षात मानवाच्या अधिकाधिक प्रगतीच्या नादात केवळ ओरबाडण्याच्या हव्यासा पायी  मानव आपल्या ओझ्याने पृथ्वीवरील समस्त सजीव सृष्टीला काहीशे कोटी वर्षाच्या दरीत ढकलतो की आपले ओझे उलट बाजूला टाकून समस्त सजीव सृष्टी वाचवण्याचा निर्णय घेतो, यावर समस्त मानव जातीची प्रगल्भता सिद्ध होणार असल्याचे बर्वे यांचे म्हणणे आहे.  भावी पिढीसाठी सहभागी व्हा४० वर्षांखालील सर्व तरुण पिढीने यात सक्रिय सहभाग नोंदवावा, ४० वर्षांवरील पिढी ज्यांना त्यांच्या भविष्यातील पिढ्यांची काळजी आहे त्यांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन बर्वे यांनी केले आहे.   या सोबतच सर्व पक्षांचे राजकारणी, जे हा बदल घडवून आणू शकतात त्यांनी मतांचे राजकारण बाजूला ठेऊन भविष्यातील पिढ्यांच्या चांगल्या आणि सुखी जीवनासाठी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या आठ दिवसात याविषयासाठी तयार केलेल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून  संदर्भातील महत्त्वाचे  विषय मांडून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे,  अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.  सामाजिक चळवळ उभारण्याचा  प्रयत्नहा राजकीय विषय नसून समस्त मानवाच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे. आत्ता जन्माला आलेल्या बाळापासून ते ४० वर्षांखालील तरुण पिढीचे भविष्य चांगले व्हावे, त्यांची पर्यावरण पूरक जीवनशैलीची मूल्ये वाढीस लागावीत, त्यासाठी एक सामाजिक चळवळ उभारण्याचा हा प्रयत्न असल्याचे बर्वे यांचे म्हणणे आहे.  या समस्येबाबत आपण रोज ऐकतो, पण ती समस्या किती गंभीर आहे आणि या समस्येला आपण मानव समूह कसा जबाबदार आहे याचा आपण  विचारच करीत नाही.   औद्योगिक प्रगतीमुळे आपण अंगिकारलेल्या जीवनशैलीमुळेच ही समस्या उत्पन्न झालेली आहे. आपल्याला आपली जीवनशैली आमूलाग्र बदलावी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला आपली मानसिकता बदलाय आहे, असे आवाहन बर्वे यांनी केले असून यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली आहे. 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव