शहरं
Join us  
Trending Stories
1
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
2
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
3
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
4
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
5
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
6
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
7
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
8
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
9
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
10
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
11
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
12
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
13
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
14
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
15
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
16
Bigg Boss 19 Finale: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
17
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
18
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
19
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
20
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणीय व मानवजातीच्या शाश्वत विकासासाठी शिरीष बर्वे यांचे आठ दिवस अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 23:39 IST

चळवळ : सोशल मीडियावरून पर्यावरण रक्षणासाठी आवाहन  जळगाव : औद्योगिक प्रगतीमुळे  अंगिकारलेली जीवनशैली, त्यातून निर्माण होणाºया पर्यावरणविषयक समस्या, त्यातून ...

चळवळ : सोशल मीडियावरून पर्यावरण रक्षणासाठी आवाहन 

जळगाव : औद्योगिक प्रगतीमुळे  अंगिकारलेली जीवनशैली, त्यातून निर्माण होणाºया पर्यावरणविषयक समस्या, त्यातून पुढे येणारे गंभीर परिणाम व तरीदेखील न बदलणारी मानसिकता, हे सर्व प्रकार पर्यावरसाठी घातक ठरत असून  हे रोखणे गरजेचे असल्याने  याकडे लक्ष वेधण्यासाठी जळगावात चळवळ सुरू झाली आहे. यामध्ये आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी स्वातंत्र्य दिन, १५ आॅगस्ट ते २२ आॅगस्ट दरम्यान अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या चळवळीत सहभागीसाठी आवाहनही केले आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे संयम  आठ दिवस उपवास करून स्वत:चाच संयम व या गंभीर विषयाबाबत निर्धार तपासण्यासाठी आठ दिवस उपवास करीत असल्याचे बर्वे यांनी सांगितले.  भावी पिढीसाठी सहभागी व्हा४० वर्षांखालील सर्व तरुण पिढीने यात सक्रिय सहभाग नोंदवावा, ४० वर्षांवरील पिढी ज्यांना त्यांच्या भविष्यातील पिढ्यांची काळजी आहे त्यांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन बर्वे यांनी केले आहे.   या सोबतच सर्व पक्षांचे राजकारणी, जे हा बदल घडवून आणू शकतात त्यांनी मतांचे राजकारण बाजूला ठेऊन भविष्यातील पिढ्यांच्या चांगल्या आणि सुखी जीवनासाठी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या आठ दिवसात याविषयासाठी तयार केलेल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून  संदर्भातील महत्त्वाचे  विषय मांडून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे,  अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. योग्य प्रबोधन आवश्यकया समस्येचा सामना करण्यासाठी  मोदी सरकारने काही प्रमाणात पावले उचलत या बद्दल बोलायला सुरुवात केली आहे. मात्र प्रस्थापित गल्ली ते दिल्ली बहुतेक सर्व राजकारणी व सरकारी यंत्रणा याविषयी अशिक्षित असल्यामुळे त्यांना या समस्येच्या व्याप्तीचे गांभीर्य कळूच शकत नाही. समाज उदासीन आहे असे अजिबात नाही. त्यांचे योग्य प्रबोधन करून त्यांना जागृतच केलं जात नाही, ही खरी समस्या असून यासाठी हे प्रबोधन आवश्यक असल्याने ही चळवळ सुरू झाली आहे. तिसरे महायुद्ध पर्यावरण बदलाच्या विरुद्ध लढले जाणार असून हे दीर्घ काळ चालणारे युद्ध आहे, असे शिरीष बर्वे यांचे म्हणणे आहे. आता ही जागतिक आणीबाणीची परिस्थिती असून गेल्या ३०० वर्षात मानवाच्या अधिकाधिक प्रगतीच्या नादात केवळ ओरबाडण्याच्या हव्यासा पायी  मानव आपल्या ओझ्याने पृथ्वीवरील समस्त सजीव सृष्टीला काहीशे कोटी वर्षाच्या दरीत ढकलतो की आपले ओझे उलट बाजूला टाकून समस्त सजीव सृष्टी वाचवण्याचा निर्णय घेतो, यावर समस्त मानव जातीची प्रगल्भता सिद्ध होणार असल्याचे बर्वे यांचे म्हणणे आहे.  भावी पिढीसाठी सहभागी व्हा४० वर्षांखालील सर्व तरुण पिढीने यात सक्रिय सहभाग नोंदवावा, ४० वर्षांवरील पिढी ज्यांना त्यांच्या भविष्यातील पिढ्यांची काळजी आहे त्यांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन बर्वे यांनी केले आहे.   या सोबतच सर्व पक्षांचे राजकारणी, जे हा बदल घडवून आणू शकतात त्यांनी मतांचे राजकारण बाजूला ठेऊन भविष्यातील पिढ्यांच्या चांगल्या आणि सुखी जीवनासाठी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या आठ दिवसात याविषयासाठी तयार केलेल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून  संदर्भातील महत्त्वाचे  विषय मांडून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे,  अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.  सामाजिक चळवळ उभारण्याचा  प्रयत्नहा राजकीय विषय नसून समस्त मानवाच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे. आत्ता जन्माला आलेल्या बाळापासून ते ४० वर्षांखालील तरुण पिढीचे भविष्य चांगले व्हावे, त्यांची पर्यावरण पूरक जीवनशैलीची मूल्ये वाढीस लागावीत, त्यासाठी एक सामाजिक चळवळ उभारण्याचा हा प्रयत्न असल्याचे बर्वे यांचे म्हणणे आहे.  या समस्येबाबत आपण रोज ऐकतो, पण ती समस्या किती गंभीर आहे आणि या समस्येला आपण मानव समूह कसा जबाबदार आहे याचा आपण  विचारच करीत नाही.   औद्योगिक प्रगतीमुळे आपण अंगिकारलेल्या जीवनशैलीमुळेच ही समस्या उत्पन्न झालेली आहे. आपल्याला आपली जीवनशैली आमूलाग्र बदलावी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला आपली मानसिकता बदलाय आहे, असे आवाहन बर्वे यांनी केले असून यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली आहे. 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव