शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यात ८१ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST

जळगाव : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा या साऱ्याला कंटाळून सात महिन्यात तब्बल ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला ...

जळगाव : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा या साऱ्याला कंटाळून सात महिन्यात तब्बल ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आत्महत्येनंतर वारसांनी दाखल केलेल्या मदतीसाठीचे ११ प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले आहेत, तर ३५ प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने मृत्यूनंतरही वारसांची वणवण कायम आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे महिन्यात असलेल्या निर्बंध काळातही १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

निसर्गाची अवकृपा, महागडे बियाणे पेरणी करून न उगवलेले पीक, दुबार पेरणी या सर्व प्रकारात शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठा फटका बसला. त्यानंतर रब्बी हंगामातही दर महिन्याला अवकाळी पाऊस झाल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. खासगी सावकार व सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत बळीराजा पडला. यामुळे खचलेल्या ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.

११ शेतकऱ्यांच्या वारसाची मृत्यूनंतरही वणवण

शासनाने शेतकरी आत्महत्येनंतर वारसांना मदतीची घोषणा केली आहे. यासाठी जिल्हास्तरीय समिती असून, या समितीकडे आलेल्या ८१ मदतीच्या प्रस्तावांतून या समितीने ११ प्रस्ताव अपात्र ठरविले आहेत. त्यामुळे मृत्यूनंतरही या शेतकऱ्यांच्या वारसांची शासनाकडून उपेक्षा कायम आहे.

१०० टक्क्यांहून अधिक पाऊस होऊनही वाढल्या आत्महत्या

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. २०१९ व २०२० या वर्षात पावसाने सरासरी ओलांडली. मात्र, याच पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. यामध्ये २०१९मध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला कमी पाऊस व पिके काढणीच्या वेेळी अतिवृष्टी अशा स्थितीमुळे हंगाम हातचा गेला. यामुळे २०१९ या वर्षीच गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आत्महत्या वाढून ही संख्या १९६वर पोहोचली.

आठ वर्षात १,२६३ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

गेल्या आठ वर्षांपासूनची शेतकरी आत्महत्येची स्थिती पाहता २०१३नंतर ही संख्या वाढतच गेली आहे. २०१३मध्ये तब्बल ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. २०१४मध्ये त्यात वाढ होऊन हा आकडा १७४पर्यंत पोहोचला व २०१५मध्ये त्यात आणखी वाढ होऊन ही संख्या १९०वर पोहोचली. यावर्षी जानेवारी ते जुलै २०२१ या सात महिन्यात ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मन हेलावणारी आठ वर्षातील संख्या

वर्ष-शेतकरी आत्महत्या

२०१३-९२

२०१४-१७४

२०१५-१९०

२०१६-१७१

२०१७-१५१

२०१८-१४८

२०१९-१९६

२०२० - १४१

२०२१ - ८१ (जुलैअखेर)