शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

सात महिन्यात ८१ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST

जळगाव : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा या साऱ्याला कंटाळून सात महिन्यात तब्बल ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला ...

जळगाव : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा या साऱ्याला कंटाळून सात महिन्यात तब्बल ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आत्महत्येनंतर वारसांनी दाखल केलेल्या मदतीसाठीचे ११ प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले आहेत, तर ३५ प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने मृत्यूनंतरही वारसांची वणवण कायम आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे महिन्यात असलेल्या निर्बंध काळातही १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

निसर्गाची अवकृपा, महागडे बियाणे पेरणी करून न उगवलेले पीक, दुबार पेरणी या सर्व प्रकारात शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठा फटका बसला. त्यानंतर रब्बी हंगामातही दर महिन्याला अवकाळी पाऊस झाल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. खासगी सावकार व सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत बळीराजा पडला. यामुळे खचलेल्या ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.

११ शेतकऱ्यांच्या वारसाची मृत्यूनंतरही वणवण

शासनाने शेतकरी आत्महत्येनंतर वारसांना मदतीची घोषणा केली आहे. यासाठी जिल्हास्तरीय समिती असून, या समितीकडे आलेल्या ८१ मदतीच्या प्रस्तावांतून या समितीने ११ प्रस्ताव अपात्र ठरविले आहेत. त्यामुळे मृत्यूनंतरही या शेतकऱ्यांच्या वारसांची शासनाकडून उपेक्षा कायम आहे.

१०० टक्क्यांहून अधिक पाऊस होऊनही वाढल्या आत्महत्या

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. २०१९ व २०२० या वर्षात पावसाने सरासरी ओलांडली. मात्र, याच पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. यामध्ये २०१९मध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला कमी पाऊस व पिके काढणीच्या वेेळी अतिवृष्टी अशा स्थितीमुळे हंगाम हातचा गेला. यामुळे २०१९ या वर्षीच गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आत्महत्या वाढून ही संख्या १९६वर पोहोचली.

आठ वर्षात १,२६३ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

गेल्या आठ वर्षांपासूनची शेतकरी आत्महत्येची स्थिती पाहता २०१३नंतर ही संख्या वाढतच गेली आहे. २०१३मध्ये तब्बल ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. २०१४मध्ये त्यात वाढ होऊन हा आकडा १७४पर्यंत पोहोचला व २०१५मध्ये त्यात आणखी वाढ होऊन ही संख्या १९०वर पोहोचली. यावर्षी जानेवारी ते जुलै २०२१ या सात महिन्यात ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मन हेलावणारी आठ वर्षातील संख्या

वर्ष-शेतकरी आत्महत्या

२०१३-९२

२०१४-१७४

२०१५-१९०

२०१६-१७१

२०१७-१५१

२०१८-१४८

२०१९-१९६

२०२० - १४१

२०२१ - ८१ (जुलैअखेर)