शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

जामठीत पाणी टंचाईने घेतले गंभीर स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 6:46 PM

बोदवड तालुक्यातील जामठी येथे पाणी टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक स्त्रोत आणि पाणी योजनांनीही टाकल्या माना.महिन्यातून एक किंवा दोन वेळाच पाणीपुरवठा

जामठी ता.बोदवड : येथे असलेले पाण्याचे स्त्रोत तसेच जेथून पाणी पुरवठा होतो अशा योजनांनीही टाकलेली मान यामुळे भर हिवाळ्यात पाणीटंचाईने गंभीर स्वरुप धारण केले असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.जामठी हे गाव जवळपास तीन हजार लोकवस्तीचे असून गावातील तीन प्रभागांना पाण्याच्या वेगवेगळ्या तीन स्त्रोतांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. गावातील प्रभाग क्रमांक एक मधील काही गल्ल्यांना पॉवर हाऊसिंग योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक एक हा सरपंचांचा प्रभाग असल्याने या प्रभागास दोन ते तीन दिवसांमधून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येतो म्हणून या प्रभागातील नागरिकांना पाणी टंचाई भासत नाही असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. प्रभाग क्र तीन मधील नागरिकांना बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा कमी अधिक स्वरूपात होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या बोअरवेलची मोटार दुरूस्तीअभावी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे प्रभाग क्र एक व तीन मधील काही गल्ल्यांना व संपूर्ण प्रभाग क्र. दोन मधील नागरिकांना ओडिए योजनेद्वारे मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागते. गेल्या काही दिवसांपासून ओडिएचा वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुक्यासह जामठी गावास महिना उलटून ही पाणीपुरवठा न झाल्याने गावावर तिव्र पाणी टंचाईचे संकट कोसळले आहे. प्रत्येक घरात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिक टॅन्करव्दारे पाणी विकत घेतांना दिसत आहे. पाणीटंचाईची तिव्रता कमी व्हावी या करिता ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्यावर्षी तीन व या वर्षी तीन कुपनलिकांची निर्मिती केली. मात्र काही ठिकाणी चुकीचे ठिकाण (स्पॉट ) निवडल्याने या कुपनलिकांना पुरेसे पाणी लागू शकले नाही. त्यामुळे काही कुपनलिका पाण्या अभावी बंद अवस्थेत आहे. परिणामी या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे.विशेषत: (प्लॉट परिसर) दरम्यान पर्यायी व्यवस्था असतांनाही नियोजनाच्या अभावामुळे गावास टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे, असे ग्रा.पं.च्या विरोधी सदस्यांकडून सांगण्यात आले....मग पाणीपट्टी कशी भरणार?जामठी गावास वीस ते पंचवीस दिवस उलटूनही पाणीपुरवठा होत नसल्याने तसेच महिन्यातून दोन वेळा व वर्षातून फक्त चोवीस किंवा वीसच वेळा पाणीपुरवठा होतो. महिना - महिना उलटून ही पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीपट्टी कशी भरावी असा संतप्त सवाल नागरिकाकडून ग्रामपंचायतीच्या वसुली कर्मचाºयांना विचारला जात आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई