शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दोन दिवसात निर्णय न झाल्यास गंभीर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 1:05 PM

जळगाव : ज्या तीन महिन्यांच्या व्यवसायातून आमचा नऊ महिन्यांचा खर्च निघत होता. त्या तीन महिन्यात एकाही पैशाची कमाई झाली ...

जळगाव : ज्या तीन महिन्यांच्या व्यवसायातून आमचा नऊ महिन्यांचा खर्च निघत होता. त्या तीन महिन्यात एकाही पैशाची कमाई झाली नाही. कोरोना केवळ व्यापारी संकुलातील दुकानांमुळेच होत आहे का? दाणाबाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, त्यामुळे कोरोनाचा फैलाव होत नाही का? असे प्रश्न उपस्थित करून व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.११६ दिवस बंदीस्त असलेल्या व्यापारी संकुलासंदर्भात पुढील दोन दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास जे काही परिमाण होतील, त्याची जबाबदारी प्रशासन अन् शासनाची राहिल, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून आजतागायत दुकान बंद राहिल्यामुळे नाही तर भुकेने मरण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे या व्यापाºयांनी सांगितले. ‘आम्ही जळगावात राहतो, हे आमचे दुर्भाग्य आहे का?’ या बॅनरखाली आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यापाºयांनी संताप व्यक्त केला.शासनाच्या धोरणामुळे शहरातील व्यापारी संतप्त झाले असून यातून मार्ग काढण्याची मागणी करीत आहेत.नाकर्तेपणा व्यापाºयांच्या माथी का मारला ?नटवर कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष सपन झुनझुनवाला यांनी ‘आपला नाकर्तेपणा व्यापाºयांच्या माथी का मारला? ११६ दिवस झाले, आमची दुकाने बंद आहेत, तरी जळगावमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे का? असा सवाल त्यांनी केला. फुले मार्केटचे कार्याध्यक्ष राजेश वरयानी यांनी ११६ दिवसात लग्नसराई, रमजान महिना, शालेय युनिफॉर्म अशा स्वरुपाचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. त्यामुळे आमचे संपूर्ण भाडे, घरपट्टी माफ करण्याची मागणी केली. सेंट्रल फुले मार्केटचे माजी अध्यक्ष प्रदीप जैन यांनी उपायुक्तांना केवळ कारवाईसाठी फुले मार्केट व बळीराम पेठेतील दुकानेच दिसतात का? असा सवाल करून आपण कोणत्या कायद्यानुसार दुकाने सील करता अन् पाच, दहा हजार दंड आकारता? असा प्रश्न केला.यावेळी सराफ व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष स्वरूप लुंकड, सेंट्रल फुले मार्केटचे अध्यक्ष रमेश मताणी, नटवर कॉम्प्लेक्सचे कोषाध्यक्ष विजय अग्रवाल, नाथ प्लाझाचे अध्यक्ष नितीन वाणी, व्यापारी प्रदीप जैन, भास्कर मार्केटचे राजेश पिंगळे, स्टेडियम कॉम्प्लेक्समधील ललित पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय हिराणी यांनी केले.व्यापारीही उतरले रस्त्यावरअनलॉक झाले असले तरी महापालिकेने केवळ रस्त्यावरील दुकानांना सम-विषम पद्धतीने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली असून संकुलांमधील दुकाने उघडण्यास अजूनही परवानगी दिलेली नाही. मंगळवारी सात दिवसांच्या लॉकडाऊननंतर दुकाने उघडतील या आशेने बी.जे.मार्केट, महात्मा फुले, गोलाणी, महात्मा गांधी मार्केटबाहेर संकुलामधील दुकानदारांनी मोठी गर्दी केली होती. १२० दिवसांपासून दुकाने बंद असल्याने प्रशासनाने आता संकुलामधील दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापाºयांनी केली.सरकारी कर्मचाºयांना पगार नाही, मग..?शासनाकडे विविध मार्गांनी महसूल येतो. तरीही मुख्यमंत्री आरोग्य कर्मचारी, पोलिस यांचे पगार देऊ शकत नाही. म्हणे, शासनाकडे पैसा नाही. मुख्यमंत्री आम्हाला सांगतात की, कोणत्याही कर्मचाºयाचा पगार कापू नका. शासनाकडे पगार द्यायला पैसे नसतील तर आमच्याकडे सोन्याचे हंडे भरून ठेवलेत का? असा सवाल सराफ व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष स्वरुप लुंकड यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव