शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शेंदुर्णी, धुळ्यातून ठरणार राजकीय दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:24 PM

लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम पाच राज्यांमधील निवडणुकांसोबतच शेंदुर्णी आणि धुळ्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये होत आहे. या निकालातून राजकीय दिशा आणि हवा निश्चित होणार असल्याने या निवडणुकांना महत्त्व आहे.

मिलिंद कुलकर्णीभाजपा आणि कॉंग्रेस-राष्टÑवादी आघाडीने या निवडणुकीत निश्चित रणनीती आखली आहे. या रणनीतीच्या यशापयशावर २०१९ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. काँग्रेस आघाडी दोन्ही ठिकाणी भक्कमपणे उतरली आहे. आघाडीला यश मिळाल्यास जागावाटपाविषयी समझोता होऊन आघाडी भाजपाला टक्कर देऊ शकते. जामनेर, जळगावच्या यशाची पुनरावृत्ती झाल्यास भाजपामध्ये गिरीश महाजन यांचा शब्द अंतिम मानला जाईल.२०१४ मध्ये एकनाथराव खडसे यांनी खान्देशातील भाजपाचे तिकीट वाटप केले होते. डॉ.सुभाष भामरे, डॉ.हिना गावीत, अनिल गोटे यांना भाजपामध्ये आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाने खडसे यांना दूर ठेवले. गोटे आणि त्यांचे असलेले ‘गुरुबंधू’चे नाते बहुदा आडवे आले असावे. त्याविषयी खडसेंनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. गोटे तर आता भाजपापासून दूर झालेच आहेत, पण खडसे समर्थक म्हटले जाणारे उदेसिंग पाडवी, संजय सावकारे काय भूमिका घेतात, हे बघायचे.पाच राज्यातील मतदानोत्तर ‘एक्झिट पोल’ हे भाजपाच्यादृष्टीने आनंददायी नाहीत. ‘एक्झिट पोल’च्या विश्वासार्हतेविषयी राजकीय पक्ष आणि सर्वसामान्यांच्या मनात शंका असल्याने मंगळवारी खरे चित्र समोर येईल. पण त्यापूर्वीच शेंदुर्णी नगरपंचायत आणि धुळे महापालिका निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर होतील. पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आणि खान्देशातील या दोन निवडणुकांमध्ये साम्य असे आहे की, या निवडणुकांकडे सगळ्याच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच पाहिले. भाजपाविरोधात एकत्र आल्याचा काय परिणाम होतो, तेही या निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे.खान्देशचा विचार केला तर काँग्रेस आघाडी बऱ्याच कालावधीनंतर एकसंघपणे निवडणुकांना सामोरे गेले. कारण नुकत्याच झालेल्या मुक्ताईनगर व जामनेर पालिकांच्या निवडणुकीत आघाडीत कुरबुरी राहिल्या. नंदुरबार पालिका निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेचे सहाय्य घेतले तर मुक्ताईनगरात राष्टÑवादीने शिवसेनेला सहकार्य केले. त्याचा फायदा भाजपाला झाला. परंतु, लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा दबाव आणि देश व राज्य पातळीवर दोन्ही कॉंग्रेसचे नेते एकत्र आले असल्याने स्थानिक नेत्यांना एकत्र येण्यास बाध्य व्हावे लागले.धुळ्यात लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री रोहिदास पाटील हे आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनीही दाजींच्या नावाला संमती दिली असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचे संयुक्त पॅनल विजयी झाले. त्यामुळे रोहिदास पाटील, अमरीशभाई पटेल, राजवर्धन कदमबांडे, डी.एस.अहिरे, दहिते, श्याम सनेर, युवराज करनकाळ या नेत्यांनी एकत्रित येत धुळे महापालिकेची निवडणूक लढवली. रणनीती आखली. सलग १० वर्षे सत्ता असलेल्या राष्टÑवादी काँग्रेसला ‘अँटीइनकम्बन्सी फॅक्टर’ आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नगरसेवकांनी भाजपामध्ये केलेला प्रवेश या दोन्ही बाबींवर मात करीत भाजपापुढे मोठे आव्हान उभे करण्यात यश आले.लोकसभा निवडणुकीत रोहिदास पाटील आणि भाजपाचे डॉ.सुभाष भामरे असा सामना रंगू शकतो, त्याची रंगीत तालीम या निवडणुकीत झाली. दाजी आणि बाबा, हे दोन्ही नेते या निवडणुकीत सक्रीय होते. सभा घेतल्या, प्रचार रॅलीत सहभागी झाले. डॉ.भामरे यांनी तर गोटेंच्या आरोपाला प्रथम जोरकसपणे प्रत्युत्तर दिले.कदमबांडे आणि गोटे यांच्या युतीची चर्चा आणि शिवसेनेने गोटेंच्या १३ उमेदवारांना पाठिंबा देऊन केलेली परतफेड हे धुळ्यातील नव्या समीकरणाच्या नांदी ठरणाºया घटना आहेत. रोहिदास पाटील आणि आमदार कुणाल पाटील यांच्याविषयी गोटे यांचा असलेला ‘सॉफ्ट कॉर्नर’ लक्षणीय ठरला. शेंदुर्णीत संजय गरुड यांच्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र आले.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील ही मोठी नगरपंचायत आहे. पूर्वी ग्रामपंचायत असताना गरुड यांच्या गटातील मतभेदाचा फायदा भाजपाने घेतला आणि सत्ता हस्तगत केली होती. पण यंदा गरुड यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महाजन यांच्यादृष्टीने ही निवडणूक तेवढीच महत्त्वाची आहे. या निवडणुकीमुळे दोन्ही कॉंग्रेसचे नेते एकत्र आले. एका व्यासपीठावर येऊन एकसंघतेची शपथ घेत आहे. पण या निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीचे जागावाटप कसे केले जाते, यावर सगळे भवितव्य अवलंबून राहणार आहे.भाजपाच्यादृष्टीने ही निवडणूक आव्हानात्मक ठरली. पाच राज्यात जसे भाजपाला विरोधासाठी सगळे पक्ष एकत्र आले, तसेच धुळे आणि शेंदुर्णी या दोन्ही ठिकाणी झाले. विरोधकांचे एकवेळ ठीक आहे, पण भाजपाला अंतर्गत विरोधाचाही सामना करावा लागला. धुळ्यात आमदार अनिल गोटे यांनी उघडपणे बंड पुकारले. या दोन्ही ठिकाणी जर भाजपाला यश मिळाले नाही, तर महाजन यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहील. एकनाथराव खडसे यांच्यासह नाराज गट उघडपणे समोर येईल.त्यामुळे निवडणूक जरी दोन ठिकाणची असली तरी त्याचा परिणाम व्यापक असणार आहे.दैवी शक्ती, आरती...शिवसेनेच्या मुखपत्रात आख्खा अग्रलेख लिहिला जातो, यावरुन गिरीश महाजन किती ‘पॉवरफूल’ झाले आहेत, हे सिध्द होते. अर्थात २५ वर्षांची तपश्चर्या त्यामागे आहे. मुख्यमंत्र्यांचा विश्वास जिंकलेला असला तरी ‘संकटमोचक’ म्हणून भूमिका निभावताना कौशल्य कमावले आहे, हे नाकारुन चालणार नाही. धुळ्यात गोटेंनी शिंगावर घेतले असल्याने महाजन आणखी मोठे झाले.जामनेरनंतर शेंदुर्णीत खरी कसोटी आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव