शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दुतोंडीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:29 IST

मिलिंद कुलकर्णीसामान्य नागरिकांचे जीवन उन्नत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करीत कल्याणकारी राज्य करण्याची भाषा एकीकडे करायची आणि दुसरीकडे सामान्य नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा पुरविणाऱ्या पालिकांची आर्थिक कोंडी करण्याची एकही संधी दवडायची नाही, असा दुतोंडीपणा सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करीत आहे. पक्षीय राजकारणातून असे प्रकार घडत असल्याचे स्वच्छ आणि स्पष्ट चित्र ...

मिलिंद कुलकर्णीसामान्य नागरिकांचे जीवन उन्नत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करीत कल्याणकारी राज्य करण्याची भाषा एकीकडे करायची आणि दुसरीकडे सामान्य नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा पुरविणाऱ्या पालिकांची आर्थिक कोंडी करण्याची एकही संधी दवडायची नाही, असा दुतोंडीपणा सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करीत आहे. पक्षीय राजकारणातून असे प्रकार घडत असल्याचे स्वच्छ आणि स्पष्ट चित्र असल्याने सत्ताधारी पक्ष भाजपा आणि राज्य सरकारचा हेतू दूषित असण्याविषयी शिक्कामोर्तब होत आहे. जळगाव महापालिका आर्थिक संकटात आहे. घरकुलांसाठी हुडकोकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते आणि २०१२ मध्ये महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलांची मुदत संपूनही गाळेकराराचे नुतनीकरण व भाडे वसुली प्रलंबित असणे ही आर्थिक संकटाची दोन प्रमुख कारणे आहेत. हुडकोकडून घेतलेल्या कर्जाची २००१ पर्यंत नियमितपणे परतफेड सुरु होती. परंतु भाजपाच्याच लोकनियुक्त नगराध्यक्षांनी सत्तेवर आल्यानंतर कर्जहप्ते भरणे बंद केल्याने कर्जाचे नियमित चक्र बिघडले. मुद्दलापेक्षा अधिक कर्जफेड करुनही महापालिकेवर कर्जाचा बोजा कायम आहे. न्यायालय, लवाद या पातळीवर कैफीयत मांडली गेली आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाची या कर्जाला हमी आहे. दुसºया विषयात गाळेधारकांच्या कराराची मुदत संपल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी खान्देश विकास आघाडीने १९ डिसेंबर २०१३ रोजी गाळेधारक व महापालिकेच्या हिताचा ठराव केला. परंतु भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी गाळेधारकांचा कळवळा दाखवत या ठरावाला राज्य शासनाकडून स्थगिती आणली. सुमारे साडेचार वर्षे गाळेधारकांचा प्रश्न प्रलंबित आहे. हजार गाळेधारक साडेपाच लाख नागरिकांना वेठीस धरत आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने लिलाव करण्याचे सुस्पष्ट निर्देश दिले. खंडपीठाच्या निकालानंतर नऊ महिन्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याची अंमलबजाणी केलेली नाही. या दोन्ही घटनांमधून राज्य सरकारची पक्षपाती भूमिका दिसून येते. पक्षीय राजकारणाला सत्ताधारी भाजपा कसे प्रोत्साहन देत आहे, त्याचे हे मासलेवाईक उदाहरण आहे. याच जळगावकरांनी लोकसभा निवडणुकीत २०१४ मध्ये भाजपाच्या उमेदवाराला ८० हजारांचे मताधिक्य दिले; विधानसभा निवडणुकीत ४० हजारांचे मताधिक्य दिले. तरीही जळगावकरांच्या नशिबी हे भोग आहेत, याचे कारण असे की, भाजपाला आता महापालिकेवर झेंडा फडकवायचा आहे. गेल्या सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गाळेधारकांच्या शिष्टमंडळाला सांगतात की, तुमचा प्रश्न सोडविण्यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेत आहोत. तुम्ही निर्धास्त रहा, सरकार तुमच्यासोबत आहे. या आश्वासनाच्या दोन दिवस आधी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास विभागाचे उपसचिव महापालिकेला पत्र पाठवून कळवितात की, गाळ्यांविषयीच्या ठरावावरील स्थगिती राज्य शासनाने १८ डिसेंबर २०१७ रोजी उठविली आहे. सध्या याविषयी कोणतीही बाब शासनाकडे प्रलंबित नाही. खंडपीठाच्या निकालानुसार आता महापालिकेने कार्यवाही करणे अभिप्रेत आहे. दुतोंडीपणाला आणखी वेगळे काय परिमाण असायला हवे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव