शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सद्गुरु वाचोनि सापडेना सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:22 PM

मनुष्य जीवन अमूल्य आहे याची तुलना दुसऱ्या कुठल्याही जीवनाची होऊ शकत नाही. मानवी शरीराची महिमा संत आणि ग्रंथांनी गायली ...

मनुष्य जीवन अमूल्य आहे याची तुलना दुसऱ्या कुठल्याही जीवनाची होऊ शकत नाही. मानवी शरीराची महिमा संत आणि ग्रंथांनी गायली आहे. त्याचे तात्पर्य पाच तत्वांनी बनलेल्या शरीराचे नाही. कारण शरीर नाशवंत आहे. परंतु प्राप्त असलेल्या विवेकबुद्धी आणि विचारशक्तीमुळे ते श्रेष्ठ आहे.विवेक बुद्धीचा सदुपयोग करुन आपण मानव जीवनाचे कल्याण करु शकतो. पण देवदुर्लभ मानवी शरीर प्राप्त होऊनही आम्ही अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आणि सांसारिक लोभातच जीवन व्यर्थ घालवितो. या मायामोहाच्या जंजाळात एवढं गुरफटून गेलो की यातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे.दु:खाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती! हा मनुष्य जीवनाचा खरा उद्देश असला पाहिजे. त्यासाठी गरज आहे ज्ञानाची. जसे सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो तसेच प्रभुचे ज्ञान झाले की, अज्ञान नाहीसे होते. या प्रभुला पाहिल्यावरच याच्याशी प्रेम करता येईल. म्हणूनच आवश्यकता आहे गुरुची. गुरु म्हणजे मनुष्य नव्हे तर मनुष्य रुपातील सगुण - साकार ईश्वरच होत.संत तुकाराम महाराज म्हणतातसद्गुरू वाचोनि सापडेना सोय,धरावे ते पाय, आधी आधी.मनुष्य जीवनाला सकारात्मक बदल करण्याचे कार्य सद्गुरू करतात. आणि यासाठीच सदगुरूंनी नितांत आवश्यकता आहे. संत नामदेव बालपणी विठ्ठलाशी बोलायचे-खेळायचे... भरवायचे परंतु त्या भक्तीला पूर्णत्व लाभले नाही. ज्यावेळी संत विसोबा खेचर स्वामींकडून त्यांना ज्ञान प्राप्त झाले, त्याचवेळी खºया देवाची ओळख झाली, मग संत नामदेवांनी ही भागवत पताका पंजाबात नेली.नामदेव महाराज म्हणतात आधी देवाशी ओळखावे...मग त्याशी अनन्यभावे भजावे....अखंडची ध्यान धरावे, सर्वोत्तमाचे ।सर्वोत्तम असणारा परमेश्वर याला अगोदर ओळखणे गरजेचे आहे. म्हणून निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज नेहमी म्हणायचे... एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा. विश्वबंधुत्व निर्माण होण्यासाठी एका प्रभू परमात्म्याची ओळख होणे गरजेचे आहे. संत मिराबाई म्हणतात त्याप्रमाणे पायो जी मैने राम रतन धन पायो। अशीच अवस्था होत असते.संकलन- राजकुमार वाणी, ज्ञानप्रचारक.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव