शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

तंत्रज्ञान निर्मिती करताना ग्रामीण भागाचा विचार व्हावा : डॉ.अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:32 IST

शहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञान युगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण व शहरी ही दरी भरुन काढण्याचे आवाहन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी केले.

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित परिसंवादशेती व उद्योग युगानंतर ज्ञानप्रधान युगाची सुरूवाततंत्रज्ञान निर्मिती करताना ग्रामीण भागाचा विचार व्हावा

जळगाव : शहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञान युगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण व शहरी ही दरी भरुन काढण्याचे आवाहन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी केले.डॉ.काकोडकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवार, १४ रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संपत्तीनिर्मिती’ या विषयावर परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा.जे.बी.जोशी, सचिव डॉ.ए.पी.देशपांडे, कुलसचिव भ.भा.पाटील उपस्थित होते.जागतिकस्तरावर विक्रेते म्हणून मोठे व्हाडॉ.काकोडकर म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत भारतीयांची खरीददार म्हणून मोठी संख्या असली तरी विक्रेते म्हणून संख्या फार छोटी आहे. हे चित्र बदलण्यासाठी विक्रेते म्हणून आपण मोठे व्हायला हवे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित नवीन वस्तू आणि सुविधा आणायला हव्यात.शेती व उद्योग युगानंतर ज्ञानप्रधान युगाची सुरूवातपूर्वी शेतीमध्ये आपण जगाच्या पुढे होतो तो काळ आता मागे पडला. उद्योग युगात आपण मागे पडलो पण आता हळूहळू सावरत असलो तरी तळाला आहोत. शेती आणि उद्योग प्रधान ही दोन्ही युगे मागे पडून ज्ञानप्रधान युग सुरु आहे. या युगात मोठी आव्हाने उभी आहेत. प्रगत देश आणि भारतातील दरी या युगात भरुन काढावी लागणार आहे.तंत्रज्ञान निर्मिती करताना ग्रामीण भागाचा विचार व्हावाशहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञान युगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा लागेल असे त्यांनी सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण व शहरी ही दरी भरुन काढावी लागेल.

टॅग्स :North Maharashtra Universityउत्तर महाराष्ट्र विद्यापीठJalgaonजळगाव