शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

तंत्रज्ञान निर्मिती करताना ग्रामीण भागाचा विचार व्हावा : डॉ.अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:32 IST

शहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञान युगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण व शहरी ही दरी भरुन काढण्याचे आवाहन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी केले.

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित परिसंवादशेती व उद्योग युगानंतर ज्ञानप्रधान युगाची सुरूवाततंत्रज्ञान निर्मिती करताना ग्रामीण भागाचा विचार व्हावा

जळगाव : शहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञान युगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण व शहरी ही दरी भरुन काढण्याचे आवाहन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी केले.डॉ.काकोडकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवार, १४ रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संपत्तीनिर्मिती’ या विषयावर परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा.जे.बी.जोशी, सचिव डॉ.ए.पी.देशपांडे, कुलसचिव भ.भा.पाटील उपस्थित होते.जागतिकस्तरावर विक्रेते म्हणून मोठे व्हाडॉ.काकोडकर म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत भारतीयांची खरीददार म्हणून मोठी संख्या असली तरी विक्रेते म्हणून संख्या फार छोटी आहे. हे चित्र बदलण्यासाठी विक्रेते म्हणून आपण मोठे व्हायला हवे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित नवीन वस्तू आणि सुविधा आणायला हव्यात.शेती व उद्योग युगानंतर ज्ञानप्रधान युगाची सुरूवातपूर्वी शेतीमध्ये आपण जगाच्या पुढे होतो तो काळ आता मागे पडला. उद्योग युगात आपण मागे पडलो पण आता हळूहळू सावरत असलो तरी तळाला आहोत. शेती आणि उद्योग प्रधान ही दोन्ही युगे मागे पडून ज्ञानप्रधान युग सुरु आहे. या युगात मोठी आव्हाने उभी आहेत. प्रगत देश आणि भारतातील दरी या युगात भरुन काढावी लागणार आहे.तंत्रज्ञान निर्मिती करताना ग्रामीण भागाचा विचार व्हावाशहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञान युगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा लागेल असे त्यांनी सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण व शहरी ही दरी भरुन काढावी लागेल.

टॅग्स :North Maharashtra Universityउत्तर महाराष्ट्र विद्यापीठJalgaonजळगाव