शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

समाजातील रावण जाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:00 AM

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत प्रासंगिक या सदरात लिहिताहेत जळगाव येथील लेखिका प्रिया सफळे...

पौराणिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, आधुनिक काळ हा स्त्रियांच्या विविध पैलूंनी, गुणांनी, कर्तृत्वाने समृद्ध झाला आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा उंच झोका आभाळाकडे झेपावतोय.यत्र नार्यस्तु पूज्यनते रमनते तत्र देवता:।साफ खोटं, खोटं आहे हे मनुवचन, किती, किती निरागस, निष्पाप, मुली अशा अमानुष कृत्यांचा बळी होणार आहेत? कधी होणार असे कायदे की या नराधम फासावर लगेच लटकावले जातील? घटना घडते, आपण सुन्न होतो, संताप व्यक्त करतो, गुन्हेगार सापडतात, कधी नाही सापडत, पोलीस यंत्रणा शोध घेत रहाते, मग न्याययंत्रणा सुरू होते. तारीख पे तारीख पडत रहाते. काळ पुढे जात असतो. ज्या कुटुंबावर हा आघात झाला असतो, ते वाट पहात राहतं की या नराधमांना कधी कठोर शिक्षा होईल, म्हणजे त्या कोवळ्या जीवाच्या आत्म्यास शांती मिळेल. भाबड्या आशेवर जगत रहातात. बरेच पुराव्याअभावी राजरोसपणे फिरतात, काहींना शिक्षा होते पण खूप काळ जातो.मुलींना आईवडील सक्षम करताहेत, बुद्धिमत्तेच्या जोरावर यशोशिखरावर या लेकी विराजमान होताहेत आणि आणि समाजातले, मानवजातीला काळिमा फासणारे हे आसूर त्यांच्यावर अत्याचार करून या लेकींना कधी जाळतात. कधी तुकडे करतात, कधी दरीत फेकून देतात. का यांना आई, बहीण, पत्नी, मुलगी नाही? परिवारात स्त्रिया नाहीत की दुसऱ्यांच्या मुली कस्पटासमान आहेत?बंद करा दरवर्षी त्या रावणाला जाळणं. समाजातील हे रावण जाळा. जे रामाचे मुखवटे घालून राजरोसपणे फिरताहेत आणि स्त्रियांवर अत्याचार करताहेत. रोजच्या बातम्या आहेत. अगदी दोन-तीन वर्षाच्या चिमुरड्यांना हे राक्षस चिरडून टाकताहेत. कधी कधी थांबणार हे दुष्टचक्र?नोटाबंदी एका रात्रीत घडली, सर्जिकल स्ट्राईक एका रात्रीत झालं, काश्मीरमधील ३७० कलम हटवलं गेलं, तहेरी तलाक विधेयक मंजूर झालं. १३४ वर्षे बहुचर्चित अयोध्या मंदिर-मशीद वाद संपला. असे कितीतरी प्रश्न, समस्या आपण प्रगल्भ बुद्धिमतेच्या जोरावर सोडवित आहोत. स्त्रियांना निर्भयपणे जगण्यासाठीचा कायदा लवकरात लवकर यावा. नराधमांना अशी शिक्षा सुनावली जावी की वाईट कृत्य करताना व्यक्ती विचार करेल, की त्याचा मृत्यू अटळ आहे. याचा आता न्याय व्यवस्थेने गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.-प्रिया सफळे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव