शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Ramdas Athawale : केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवलेंची मोठी मागणी, ‘धनुष्यबाण’चिन्हावर जळगावात म्हणाले...

By अमित महाबळ | Updated: October 3, 2022 17:06 IST

Ramdas Athawale : "आम्ही शिंदे सरकार कोसळू देणार नाही. सर्वांना मंत्री करता येत नाही पण मंत्री केले नाही म्हणून कुणीही आमदार शिंदे यांना सोडून परत जाणार नाही."

जळगाव - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या दोन तृतीयांश सदस्य संख्येचे बहुमत आहे. त्यामुळे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह त्यांनाच मिळायला हवे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली. पण याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असेही त्यांनी सांगितले. ते अजिंठा विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

आठवले म्हणाले, की लोक मोठ्या प्रमाणांत शिंदेंसोबत जात आहेत. शिंदेंनी मॅच जिंकली असून, उद्धव ठाकरे यांचा पराभव झाला आहे. ठाकरेंना आपले आमदार, खासदार टिकवता आलेले नाहीत. फडणवीस व शिंदे यांचे सरकार गतिशील आहे. येत्या निवडणुकीत रिपाइं (आ.) पक्ष भाजपा व शिंदे यांच्या पाठिशी उभा राहणार आहे. रिपाइंला दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद, एक आमदारकी हवी आहे. याची चर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झाली आहे. पक्षाचा प्रभाव असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व मनपांमध्ये जागांची मागणी केली आहे. या संदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली आहे.

शिंदे सरकार कोसळू देणार नाही

आम्ही शिंदे सरकार कोसळू देणार नाही. सर्वांना मंत्री करता येत नाही पण मंत्री केले नाही म्हणून कुणीही आमदार शिंदे यांना सोडून परत जाणार नाही. अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीची सवय आहे. ते इकडे येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असेही आठवले एका प्रश्नावर बोलताना म्हणाले.

दोघांचेही मेळावे पाहणार

दसऱ्याला एकनाथ शिंदे यांचा मेळावा बघायला आवडेल. पण उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहण्यासाठी त्यांचाही मेळावा बघायला आवडेल. शिवतीर्थावरील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यापेक्षा एकनाथ शिंदे यांचा मेळावा अधिक सरस ठरेल. शिवसेनेने गद्दार, पानटपरीवाला अशा वैयक्तिक टीका आता करू नयेत. 

तो विषय भाजपाचा अंतर्गत मामला

आ. एकनाथ खडसे माझे चांगले मित्र आहेत. ते भाजपामध्ये परत येणार की नाही हे माहीत नाही. हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे, असेही आठवले म्हणाले.

खा. राहुल गांधींकडे ते बळ नाही

खा. राहुल गांधी यांनी पावसात भिजत सभा घेतली. त्यांनी खा. शरद पवार यांची कॉपी केली. पवारांनी पक्षाचा उमेदवार निवडून आणला पण राहुल गांधी काँग्रेसला बळ देऊ शकत नाहीत.

रिपाइंला करणार व्यापक

रिपाइंला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेनुसार व्यापक करणार असून, सर्व समाजाला पक्षात एकत्र आणणार आहेत. त्यासाठी विविध आघाड्या स्थापन केल्या आहेत. असे आठवले यांनी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे