शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

"मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले, त्याचे परिणामही भोगले", पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 19:18 IST

प्रशांत भदाणे, जळगाव - "मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले गेले, त्याचे परिणामही मला भोगावे लागले. पण श्वेतपत्रिका म्हणजे ...

प्रशांत भदाणे,जळगाव"मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले गेले, त्याचे परिणामही मला भोगावे लागले. पण श्वेतपत्रिका म्हणजे राज्याच्या जनतेशी साधलेला संवाद असतो. ती सरकारची कामाची एक दिशा, स्ट्रॅटेजी आणि ब्लू प्रिंट असते", असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी रविवारी दुपारी जळगावात केलं.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खिरोदा येथे आयोजित माजीमंत्री स्व. मधुकरराव चौधरी यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात मुख्य सत्कारार्थी म्हणून भाषण करतांना ते बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारमध्ये श्वेतपत्रिकेच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. त्याच विषयाला चव्हाणांनी आज पुन्हा हात घालत राष्ट्रवादीला डिवचल्याचं बोललं जातंय. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्या काळात त्यांनी सिंचन क्षेत्रातील गैरव्यवहारासंदर्भात, तसेच या क्षेत्रात काय भरीव कामगिरी करता येईल, या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची आग्रही मागणी केली होती. त्याच मुद्द्यावरून त्याकाळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याचा इतिहास आहे. याच विषयाला अनुसरून पृथ्वीराज चव्हाण यांनी जळगावात हे वक्तव्य केलं. माजीमंत्री स्व. मधुकरराव चौधरी यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रात भरीव काम केलं. शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी काढलेली श्वेतपत्रिका राज्याला मार्गदर्शक ठरली. हाच दाखला देत त्यांनी श्वेतपत्रिकेच्या मुद्द्याला हात घातला.

तर आज पक्षही फुटले नसते...

आजच्या या पाच वर्षांच्या घडामोडींमध्ये जर बाळासाहेब चौधरींसारखा सभापती असता, तर हे राजकारण घडलंच नसतं. पक्षही फुटले नसते, राज्याला न्याय मिळाला असता. पण नाही मिळाला. हरकत नाही. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने आम्हाला न्याय दिला. विधानसभेच्या निवडणुकीत पण जनता आम्हाला न्याय देईल, असंही चव्हाण यावेळी म्हणाले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणJalgaonजळगाव