शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले, त्याचे परिणामही भोगले", पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 19:18 IST

प्रशांत भदाणे, जळगाव - "मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले गेले, त्याचे परिणामही मला भोगावे लागले. पण श्वेतपत्रिका म्हणजे ...

प्रशांत भदाणे,जळगाव"मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले गेले, त्याचे परिणामही मला भोगावे लागले. पण श्वेतपत्रिका म्हणजे राज्याच्या जनतेशी साधलेला संवाद असतो. ती सरकारची कामाची एक दिशा, स्ट्रॅटेजी आणि ब्लू प्रिंट असते", असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी रविवारी दुपारी जळगावात केलं.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खिरोदा येथे आयोजित माजीमंत्री स्व. मधुकरराव चौधरी यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात मुख्य सत्कारार्थी म्हणून भाषण करतांना ते बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारमध्ये श्वेतपत्रिकेच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. त्याच विषयाला चव्हाणांनी आज पुन्हा हात घालत राष्ट्रवादीला डिवचल्याचं बोललं जातंय. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्या काळात त्यांनी सिंचन क्षेत्रातील गैरव्यवहारासंदर्भात, तसेच या क्षेत्रात काय भरीव कामगिरी करता येईल, या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची आग्रही मागणी केली होती. त्याच मुद्द्यावरून त्याकाळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याचा इतिहास आहे. याच विषयाला अनुसरून पृथ्वीराज चव्हाण यांनी जळगावात हे वक्तव्य केलं. माजीमंत्री स्व. मधुकरराव चौधरी यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रात भरीव काम केलं. शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी काढलेली श्वेतपत्रिका राज्याला मार्गदर्शक ठरली. हाच दाखला देत त्यांनी श्वेतपत्रिकेच्या मुद्द्याला हात घातला.

तर आज पक्षही फुटले नसते...

आजच्या या पाच वर्षांच्या घडामोडींमध्ये जर बाळासाहेब चौधरींसारखा सभापती असता, तर हे राजकारण घडलंच नसतं. पक्षही फुटले नसते, राज्याला न्याय मिळाला असता. पण नाही मिळाला. हरकत नाही. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने आम्हाला न्याय दिला. विधानसभेच्या निवडणुकीत पण जनता आम्हाला न्याय देईल, असंही चव्हाण यावेळी म्हणाले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणJalgaonजळगाव