शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

हरभरा डाळीचे भाव १४०० रुपयांनी वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 11:32 IST

आयात बंद

ठळक मुद्देहमी भावापर्यंत हरभरा नेण्याचा प्रयत्नसट्टा बाजारामुळे वाढ

विजयकुमार सैतवालजळगाव : खरेदी केंद्रांवर हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यानंतर तो माल सरकार बाहेर काढत नसल्याने व शेतकºयांकडील माल बाजारात येणे बंद झाल्याने हरभºयाची आवक कमी होऊन हरभºयाच्या भावात ९०० ते १००० रुपयांनी वाढ झाली आहे. या सोबतच हरभरा डाळीच्या भावात देखील १४०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे.आयात बंदयंदा सरकारने शासकीय खरेदी केंद्रावर हरभरा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. हा माल सध्या सरकारने शासकीय गोदामांमध्ये ठेवला असून तो बाजारपेठ अथवा दालमिलसाठी उपलब्ध होऊ शकत नसल्याचे चित्र आहे. त्यात आता शेतकºयांकडचाही माल येणे बंद झाला आहे. या सर्वांमध्ये शेतकºयांच्या मालाला भाव मिळावा म्हणून सरकारने विदेशातून आयात होणाºया मालावर बंदी घातली आहे. त्यामुळे बाजारात हरभºयाची आवक कमी झाली आहे.हमी भावापर्यंत हरभरा नेण्याचा प्रयत्नआयात बंदी केल्याने शेतकºयांच्या मालाला भाव मिळण्याची अपेक्षा असून त्यानुसार हळूहळू भाव वाढ होत आहे. त्यात सरकारने हमी भावात वाढ केल्याने हरभºयाचा भाव वाढीव हमीभावापर्यंत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारने खरेदी केलेला मालदेखील बाहेर काढला जात नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.भावात मोठी वाढमध्यंतरी हरभºयाची आवक वाढल्याने हरभरा ३००० रुपये प्रती क्विंटलपर्यंत खाली आला होता. मात्र त्यानंतर त्यात हळूहळू वाढ होऊन तो ३४०० ते ३५०० रुपयांवर आला. त्यानंतर आता आवक कमी झाल्याने आठवडाभरात हरभºयाच्या भावात थेट ९०० ते एक हजार रुपयांनी वाढ होऊन तो ४३०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचला. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने हरभरा डाळीच्याही भावात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ४००० ते ४४०० रुपये प्रती क्ंिवटल असलेली डाळ आज ५४०० ते ५८०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.सट्टा बाजारामुळे वाढएकतर शेतकºयांकडे माल नाही, त्यात जो माल होता तो सरकराने खरेदी केला आहे आणि तो गोदामात आहे. त्यामुळे हरभरा बाजारात आणणे अथवा न आणणे तसेच त्याची भाववाढ हे सर्व गणित सट्टाबाजारात ठरविले जात असल्याने हरभºयावरील या सट्ट्याने त्याचे भाव वाढत असल्याचेदेखील सांगितले जात आहे.हरभºयाची आयात बंद असण्यासह शेतकºयांच्या मालाला भाव मिळण्यासाठी शासकीय गोदामातील हरभराही बाजारात येत नसल्याने आवक कमी होऊन हरभºयासह डाळीच्याही भावात वाढ झाली आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.सरकारने खरेदी केलेला माल गोदामात असल्याने हरभºयाची आवक कमी झाली आहे. हा माल बाजारात आल्यास आवक सुधारून भाव स्थिर राहू शकतात.- शशी बियाणी, व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती.उत्पादीत माल सरकारी गोदामात असल्याने व शेतकºयांकडील माल येणे बंद असल्याने हरभºयासह डाळीच्या भावात वाढ झाली आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव