शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

हरभरा डाळीचे भाव १४०० रुपयांनी वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 11:32 IST

आयात बंद

ठळक मुद्देहमी भावापर्यंत हरभरा नेण्याचा प्रयत्नसट्टा बाजारामुळे वाढ

विजयकुमार सैतवालजळगाव : खरेदी केंद्रांवर हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यानंतर तो माल सरकार बाहेर काढत नसल्याने व शेतकºयांकडील माल बाजारात येणे बंद झाल्याने हरभºयाची आवक कमी होऊन हरभºयाच्या भावात ९०० ते १००० रुपयांनी वाढ झाली आहे. या सोबतच हरभरा डाळीच्या भावात देखील १४०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे.आयात बंदयंदा सरकारने शासकीय खरेदी केंद्रावर हरभरा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. हा माल सध्या सरकारने शासकीय गोदामांमध्ये ठेवला असून तो बाजारपेठ अथवा दालमिलसाठी उपलब्ध होऊ शकत नसल्याचे चित्र आहे. त्यात आता शेतकºयांकडचाही माल येणे बंद झाला आहे. या सर्वांमध्ये शेतकºयांच्या मालाला भाव मिळावा म्हणून सरकारने विदेशातून आयात होणाºया मालावर बंदी घातली आहे. त्यामुळे बाजारात हरभºयाची आवक कमी झाली आहे.हमी भावापर्यंत हरभरा नेण्याचा प्रयत्नआयात बंदी केल्याने शेतकºयांच्या मालाला भाव मिळण्याची अपेक्षा असून त्यानुसार हळूहळू भाव वाढ होत आहे. त्यात सरकारने हमी भावात वाढ केल्याने हरभºयाचा भाव वाढीव हमीभावापर्यंत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारने खरेदी केलेला मालदेखील बाहेर काढला जात नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.भावात मोठी वाढमध्यंतरी हरभºयाची आवक वाढल्याने हरभरा ३००० रुपये प्रती क्विंटलपर्यंत खाली आला होता. मात्र त्यानंतर त्यात हळूहळू वाढ होऊन तो ३४०० ते ३५०० रुपयांवर आला. त्यानंतर आता आवक कमी झाल्याने आठवडाभरात हरभºयाच्या भावात थेट ९०० ते एक हजार रुपयांनी वाढ होऊन तो ४३०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचला. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने हरभरा डाळीच्याही भावात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ४००० ते ४४०० रुपये प्रती क्ंिवटल असलेली डाळ आज ५४०० ते ५८०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.सट्टा बाजारामुळे वाढएकतर शेतकºयांकडे माल नाही, त्यात जो माल होता तो सरकराने खरेदी केला आहे आणि तो गोदामात आहे. त्यामुळे हरभरा बाजारात आणणे अथवा न आणणे तसेच त्याची भाववाढ हे सर्व गणित सट्टाबाजारात ठरविले जात असल्याने हरभºयावरील या सट्ट्याने त्याचे भाव वाढत असल्याचेदेखील सांगितले जात आहे.हरभºयाची आयात बंद असण्यासह शेतकºयांच्या मालाला भाव मिळण्यासाठी शासकीय गोदामातील हरभराही बाजारात येत नसल्याने आवक कमी होऊन हरभºयासह डाळीच्याही भावात वाढ झाली आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.सरकारने खरेदी केलेला माल गोदामात असल्याने हरभºयाची आवक कमी झाली आहे. हा माल बाजारात आल्यास आवक सुधारून भाव स्थिर राहू शकतात.- शशी बियाणी, व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती.उत्पादीत माल सरकारी गोदामात असल्याने व शेतकºयांकडील माल येणे बंद असल्याने हरभºयासह डाळीच्या भावात वाढ झाली आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव