शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

दुष्काळग्रस्त परिसरात रेन पाईप ठिबक संचाद्वारे कांदा लावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 09:33 IST

माळमाथ्यावर शेतीत उपलब्ध अल्प पाणी असल्याने काही शेतकऱ्यांनी पाण्याचा काटेकोर व पिकांना पुरेपूर उपयोगासाठी ‘रेन पाईप ठिबक सिंचन’ संच बसविले असून त्याद्वारे सध्या कांदा लावणी केली जात आहे.

ठळक मुद्देमाळमाथ्यावर शेतीत उपलब्ध अल्प पाणी असल्याने काही शेतकऱ्यांनी पाण्याचा काटेकोर व पिकांना पुरेपूर उपयोगासाठी ‘रेन पाईप ठिबक सिंचन’ संच बसविले असून त्याद्वारे सध्या कांदा लावणी केली जात आहे.गहू लावून उत्पन्न येते त्यापेक्षा कांद्यापासून मिळणारे उत्पन्न जास्त असल्याने शेतकरी गव्हापेक्षा केव्हाही कांदा लावणे पसंत करतात.डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसांत त्यांनी टप्प्याटप्प्याने शेतात रांगडा कांदा लावणी केली आहे.

हर्षद गांधी 

निजामपूर : माळमाथ्यावर शेतीत उपलब्ध अल्प पाणी असल्याने काही शेतकऱ्यांनी पाण्याचा काटेकोर व पिकांना पुरेपूर उपयोगासाठी ‘रेन पाईप ठिबक सिंचन’ संच बसविले असून त्याद्वारे सध्या कांदा लावणी केली जात आहे.

यंदा वर्षभरात केवळ एक पाऊस झाला. परिणामी निजामपूर, जैताणे परिसरात भीषण दुष्काळ पसरला आहे. शेतांमधील विहिरी, बोअर आटलेत. जे थोडे फार पाणी आहे त्यात कांदा लावणे कठीण असल्याचे शेतकरी म्हणतात. परिणामी या भागात कांदा लावणीचे प्रमाण तुलनेने फारच कमी झाले आहे.

जेवढ्या क्षेत्रात गहू लावून उत्पन्न येते त्यापेक्षा कांद्यापासून मिळणारे उत्पन्न जास्त असल्याने शेतकरी गव्हापेक्षा केव्हाही कांदा लावणे पसंत करतात. पाणी नाही ही अडचण आता पुढे येते आहे. परंतु अल्प प्रमाणातील पाण्याचा रेन पाईप ठिबक सिंचन पद्धतीने वापर करून उपलब्ध पाण्यात कांद्याचे पीक घेता येते, हे सिद्ध झाल्याने शेतकरी त्याकडे वळत आहे.

निजामपूर, उमरांडी, जैताणे शिवारात काही शेतकऱ्यांकडून इतरत्र बसविले जातात तसे ‘रेन पाईप ठिबक संच’ लावून कांदा लावणी करण्यात येत आहे. या ठिबक सिंचन संचाद्वारे उभ्या पाईपमधून 14 फुटाच्या गोल परिसरात पावसासारखे फवारे उडतात. त्यामुळे पुरेसे पाणी मिळून पिकाची चांगली वाढ होते. यामुळे पाणी सुद्धा कमी लागत असल्याची माहिती रुपेश श्रीधर राणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसांत त्यांनी टप्प्याटप्प्याने शेतात रांगडा कांदा लावणी केली आहे. त्यांनी अपेक्षिल्याप्रमाणे ही लावणी झाली आहे. हा प्रयोग या क्षेत्रात नवीन असून साधारणत: 20 ते 25 टक्के शेतकऱ्यांनी हे ठिबक संच बसविले असल्याचे शेतकरी राणे यांनी नमूद केले. त्यासाठी शेतकऱ्यांना एकरी 12 ते 13 हजार रुपये खर्च आला आहे. या पद्धतीने उपलब्ध पाण्यावर कांदे लावणीचे क्षेत्र दुप्पटीने वाढू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. या ठिबक पद्धतीने पाइपाच्या दोन्ही बाजूस 7-7 फूट अंतरापर्यंत स्प्रेच्या सहाय्याने पिकांना पावसाप्रमाणे पाणी मिळते. त्याचा पिकांच्या वाढीसाठी चांगला उपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

साक्री तालुक्यातील यंदा दुष्काळग्रस्त घोषित निजामपूर, जैताणे व पश्चिमेकडील कोकणपट्टीत यंदा भीषण दुष्काळामुळे पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी हे ‘रेन पाईप ठिबक संच’ बसवून उपलब्ध अल्प पाण्यावर कांद्याची लावणी केली आहे.

- रूपेश श्रीधर राणे,शेतकरी, निजामपूर, ता.साक्री

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरीonionकांदाWaterपाणी