शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे नद्यांना पाणी, तर दुसरीकडे कजगावला तितूर नदीपात्रात हिरवे रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 19:23 IST

अर्धा पावसाळा संपला आहे. श्रावणाच्या सरी रीमझीम बरसत पिकांना केवळ आधार मिळत आहे. या परिसरातील तितूर नदी मात्र अद्यापही कोरडीच आहे. भर पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहायला पाहिजे तिथे मात्र हिरवे रान फुलले आहे.

ठळक मुद्देतितूर नदीस अनेक अडथळेतीन वर्षांपासून नदी कोरडीच

कजगाव ता.भडगाव, जि.जळगाव : अर्धा पावसाळा संपला आहे. श्रावणाच्या सरी रीमझीम बरसत पिकांना केवळ आधार मिळत आहे. या परिसरातील तितूर नदी मात्र अद्यापही कोरडीच आहे. भर पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहायला पाहिजे तिथे मात्र हिरवे रान फुलले आहे. येथे चक्क गुरे चारली जात असल्याने तितूर नदी परिसरातील नागरिक दमदार पावसाची व तितूर नदी दुथडी भरून वाहण्याची वाट पहात आहेत.राज्यात अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. अनेक नद्यांना महापूर आले आहेत. काहींनी धोक्याच्या पातळ्या ओलांडल्या आहेत. मात्र चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तीन तालुक्यातून वाहणारी तसेच पाटणादेवी उगमस्थान असलेल्या या नदीस अर्धा पावसाळा संपल्यानंतरही एक थेंब पाणी नाही. चक्क पावसाळ्यात या नदीचे पात्र कोरडे पडले आहे. भर पावसाळ्यात या नदीची जागा पाण्याऐवजी चक्क हिरव्यागार गवताने घेतली आहे. नदी पात्र हिरव्यागार रानाने फुलले आहे. गुरे चराईसाठी याचा उपयोग होत आहे.तीन वर्षांपासून नदी कोरडीचगेल्या तीन वर्षांपासून या नदीस एकही पूर गेलेला नसल्याने बागाईत शेतीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. नदी काठावरील पाणीपुरवठा योजना निकामी होऊ पहात आहे. परिसरातील जल पातळ्या दरवर्षी खोल जात असल्याने गेल्या तीन वर्षांपासून तितूर नदी परिसरात चिंताग्रस्त वातावरण आहेतितूर नदीस अनेक अडथळेपाटणादेवी उगमस्थान असलेल्या या नदीच्या उगमस्थानी पडणाऱ्या जेमतेम पावसामुळे नदीसदेखील जेमतेम पाण्याची धार येते. ती धार चाळीसगाव तालुक्याच्या हद्दीपर्यंत पोहचते नी तितूरचीही धार आटते. कारण गेल्या दोन वर्षांपूर्वी या नदीवर चाळीसगाव तालुका हद्दीपर्यंत अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे (विना गेट) चे बनविण्यात आले आहेत. या बंधाºयात जेमतेम येणारे पाणी पूर्णपणे जिरते. यामुळे नदीचे पाणी पुढे सरकत नाही. परिणामी भडगाव व पाचोरा तालुक्यातील सात गाव तितूरच्या पाण्यापासून वंचित आहे. यात भडगाव तालुक्यातील उमरखेड, तांदूळवाडी, भोरटेक, कजगाव, पासर्डी तर पाचोरा तालुक्यातील पिंप्री, घुसर्डी या गावात गेल्या तीन वर्षात तितूर नदीला पाणीच आले नाही. यामुळे या सात गावातील पीक परस्थिती, पाणी प्रश्न भेडसावत आहे.विनागेटच्या बनविलेल्या सिमेंट बंधाºयास तत्काळ गेट बसवून यात अडकणारे पाणी पुढील गावासाठी मार्गस्थ करावे. जेणेकरून सात गाव तितूरच्या पाण्यापासून वंचित रहाणार नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहेभडगाव तालुक्यात सरासरी पाऊस ४४.४ दाखविण्यात आला आहे. ६३ गावांची पावसाची सरासरी केवळ चार गावातील पर्जन्यमापकाने करत तालुक्याची सरासरी काढली जाते. ती कितपत योग्य आहे कारण कजगाव परिसरात आतापर्यंत केवळ रिमझिम पाऊस झाला आहे. आजही नदी, नाले सारेच कोरडे आहेत. तरीदेखील तालुक्यात पाऊस ४४.४ टक्के कसा हिच चर्चा कजगाव परिसरात चर्चिली जात आह.े 

टॅग्स :water shortageपाणीकपातBhadgaon भडगाव