शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

एकीकडे नद्यांना पाणी, तर दुसरीकडे कजगावला तितूर नदीपात्रात हिरवे रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 19:23 IST

अर्धा पावसाळा संपला आहे. श्रावणाच्या सरी रीमझीम बरसत पिकांना केवळ आधार मिळत आहे. या परिसरातील तितूर नदी मात्र अद्यापही कोरडीच आहे. भर पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहायला पाहिजे तिथे मात्र हिरवे रान फुलले आहे.

ठळक मुद्देतितूर नदीस अनेक अडथळेतीन वर्षांपासून नदी कोरडीच

कजगाव ता.भडगाव, जि.जळगाव : अर्धा पावसाळा संपला आहे. श्रावणाच्या सरी रीमझीम बरसत पिकांना केवळ आधार मिळत आहे. या परिसरातील तितूर नदी मात्र अद्यापही कोरडीच आहे. भर पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहायला पाहिजे तिथे मात्र हिरवे रान फुलले आहे. येथे चक्क गुरे चारली जात असल्याने तितूर नदी परिसरातील नागरिक दमदार पावसाची व तितूर नदी दुथडी भरून वाहण्याची वाट पहात आहेत.राज्यात अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. अनेक नद्यांना महापूर आले आहेत. काहींनी धोक्याच्या पातळ्या ओलांडल्या आहेत. मात्र चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तीन तालुक्यातून वाहणारी तसेच पाटणादेवी उगमस्थान असलेल्या या नदीस अर्धा पावसाळा संपल्यानंतरही एक थेंब पाणी नाही. चक्क पावसाळ्यात या नदीचे पात्र कोरडे पडले आहे. भर पावसाळ्यात या नदीची जागा पाण्याऐवजी चक्क हिरव्यागार गवताने घेतली आहे. नदी पात्र हिरव्यागार रानाने फुलले आहे. गुरे चराईसाठी याचा उपयोग होत आहे.तीन वर्षांपासून नदी कोरडीचगेल्या तीन वर्षांपासून या नदीस एकही पूर गेलेला नसल्याने बागाईत शेतीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. नदी काठावरील पाणीपुरवठा योजना निकामी होऊ पहात आहे. परिसरातील जल पातळ्या दरवर्षी खोल जात असल्याने गेल्या तीन वर्षांपासून तितूर नदी परिसरात चिंताग्रस्त वातावरण आहेतितूर नदीस अनेक अडथळेपाटणादेवी उगमस्थान असलेल्या या नदीच्या उगमस्थानी पडणाऱ्या जेमतेम पावसामुळे नदीसदेखील जेमतेम पाण्याची धार येते. ती धार चाळीसगाव तालुक्याच्या हद्दीपर्यंत पोहचते नी तितूरचीही धार आटते. कारण गेल्या दोन वर्षांपूर्वी या नदीवर चाळीसगाव तालुका हद्दीपर्यंत अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे (विना गेट) चे बनविण्यात आले आहेत. या बंधाºयात जेमतेम येणारे पाणी पूर्णपणे जिरते. यामुळे नदीचे पाणी पुढे सरकत नाही. परिणामी भडगाव व पाचोरा तालुक्यातील सात गाव तितूरच्या पाण्यापासून वंचित आहे. यात भडगाव तालुक्यातील उमरखेड, तांदूळवाडी, भोरटेक, कजगाव, पासर्डी तर पाचोरा तालुक्यातील पिंप्री, घुसर्डी या गावात गेल्या तीन वर्षात तितूर नदीला पाणीच आले नाही. यामुळे या सात गावातील पीक परस्थिती, पाणी प्रश्न भेडसावत आहे.विनागेटच्या बनविलेल्या सिमेंट बंधाºयास तत्काळ गेट बसवून यात अडकणारे पाणी पुढील गावासाठी मार्गस्थ करावे. जेणेकरून सात गाव तितूरच्या पाण्यापासून वंचित रहाणार नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहेभडगाव तालुक्यात सरासरी पाऊस ४४.४ दाखविण्यात आला आहे. ६३ गावांची पावसाची सरासरी केवळ चार गावातील पर्जन्यमापकाने करत तालुक्याची सरासरी काढली जाते. ती कितपत योग्य आहे कारण कजगाव परिसरात आतापर्यंत केवळ रिमझिम पाऊस झाला आहे. आजही नदी, नाले सारेच कोरडे आहेत. तरीदेखील तालुक्यात पाऊस ४४.४ टक्के कसा हिच चर्चा कजगाव परिसरात चर्चिली जात आह.े 

टॅग्स :water shortageपाणीकपातBhadgaon भडगाव