शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

आता बाजार समिती शुल्क हद्दपारसाठी लढा - प्रवीण पगारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:05 PM

गाळे प्रश्न सोडविण्यासाठीही करणार पाठपुरावा

जळगाव : अनेक कर कालबाह्य झाले असले तरी ते व्यापाऱ्यांच्या मानगुटीवर कायम असल्याने त्यामुळे व्यापारी वर्ग त्रस्त आहे. त्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजार शुल्क हद्दपार करण्यासाठी सर्वप्रथम लढा राहणार आहे, असा मनोदय कॉन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्सचे (कैट) राज्य सचिव प्रवीण पगारिया यांनी व्यक्त केला.व्यापारी बांधवांच्या कॉन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्स (कैट) या देशपातळीवरील संघटनेच्या राज्य सचिवपदी प्रवीण पगारिया यांची नुकतीच निवड झाली. देशपातळीवरील हे पद जळगावला मिळाल्याने त्या माध्यमातून व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वास व्यापारी बांधवांना आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने पगारिया यांच्याशी बातचीत केली. त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद....प्रश्न - राष्ट्रीय पातळीवरील हे पद मिळाल्यानंतर आपले प्रथम प्राधान्य कशाला असेल?उत्तर - कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजार शुल्क ज्या उद्देशाने आकारले जात होते, तो उद्देश आता राहिलेला नाही. सोबतच विधानसभा निवडणुकीपूर्वी कृउबा कर्मचाºयांना सरकारमध्ये सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही सरकारकडून मिळाली आहे. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवून बाजार समिती शुल्कातून व्यापाºयांना मुक्तता मिळण्यासाठी प्राधान्य राहणार आहे.प्रश्न - व्यापाºयांचे प्रश्न सुटण्यासाठी सरकारकडून कोणती अपेक्षा आहे ?उत्तर - व्यापाºयांविषयी कोणतेही निर्णय घेताना त्यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यासाठी उद्योग मंत्रालयाप्रमाणे स्वतंत्र्य व्यापारी मंत्रालयदेखील असावे व विधानपरिषद तसेच राज्यसभेवर एक-एक व्यापारी प्रतिनिधीची निवड केली जावी.प्रश्न - व्यापारी दृष्टीने शहरातील कोणता प्रश्न मार्गी लागल्यास अधिक भरभराट येऊ शकते ?उत्तर - शहरातील गाळे प्रश्न हा महत्त्वाचा असून अनेक वर्षांपासून तो मार्गी लागत नसल्याने व्यापारी बांधवांवर ती एक प्रकारे टांगती तलवार आहे. यामुळे व्यापारी आपला व्यापार व्यवस्थित करू शकत नसल्याने त्यांच्यासमोर अनेक अडचणींचा डोंगर आहे. त्यासाठी हा प्रश्न मार्गी लागणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.प्रश्न - व्यापारी धोरणाबाबत काय नियोजन आहे ?उत्तर - देशपातळीवर महत्त्वाचे पद मिळाल्याने त्याचा शहरातील व्यापारी धोरणास जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी आपले प्रयत्न आहे. मी केवळ एक प्रतिनिधी आहे. कोणतीही भूमिका मांडताना तत्पूर्वी व्यापारी बांधवांच्या विविध संघटना, पदाधिकारी तसेच सर्वच व्यापाºयांशी चर्चा करून सर्वांच्यासल्ल्यानुसार व मार्गदर्शनानेव्यापारीपेठजळगावच्याभरभराटीसाठीआणखीप्रयत्नकेलेजातील.शहरातील मिश्रीलाल चोपडा, शिवनारायण झवर, चंद्रकांत कोठारी, जयंतीभाई दोशी यांनी व्यापारक्षेत्रात देशभरात जळगावचे नाव झळकविले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व्यापारी महामंडळाची वाटचाल सुरू आहे. आताही महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, उपाध्यक्ष युसुफ मकरा, सचिव ललित बरडिया व सर्वच पदाधिकाºयांच्या सहकार्याने तसेच सर्वच संघटनांच्या एकजुटीने जळगावचे प्रश्न मांडले जातात. आताही सर्वांना सोबत घेऊन वाटचाल सुरू राहील.- प्रवीण पगारिया, राज्य सचिव, ‘कैट’.

टॅग्स :Jalgaonजळगाव