शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नको अनुदान आणि कर्जमाफी; फक्त शेतात जायला रस्ता करून द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 08:36 IST

या परिसरात शेतकरी केळी, कापूस, पपई अशी बागायती पिके घेतात

संजय पाटील

अमळनेर : आम्हाला शासनाची कर्जमाफी नको, अनुदान नको, पीकविमा नको; पण आमच्या शेतातून माल काढण्यासाठी रस्ता तरी द्या, एवढीच मागणी कलाली परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. कलाली शिवारात सुमारे १०० शेतकऱ्यांची ४०० एकर बागायती शेती आहे. तापी नदीकाठावर खोऱ्यात ही शेती असल्याने उत्पन्न चांगले येते; मात्र या शेतातून  माल ने-आण करण्यासाठी एकच रस्ता आहे. 

तीन किमी रस्त्यात ‘खैऱ्या’ आणि ‘लेंढ्या’ असे दोन मोठे आणि  आणखी आठ लहान नाले आहेत. त्यातच तापी काळावर चिकण माती आहे. त्यामुळे जून ते डिसेंबर या महिन्यांत या ठिकाणी दोन ते तीन फुटांचा चिखल असतो.  शेतातून माल काढून आणण्यासाठी दोन ट्रॅक्टर एकत्रच जोडावे लागतात. तरी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. विशेष म्हणजे या रस्त्यावरून एकच वाहन जाऊ शकत असल्याने शेतकऱ्यांना शेतात वाहने ने-आण करण्यासाठी रस्त्यात सूचना देण्यासाठी माणसे ठेवावी लागतात. एकीकडून वाहन येत असताना समोरून वाहन आले तर वाहन मागे घेणे अवघड असते, त्यामुळे पूर्वसूचना देण्यासाठी आवाज द्यावा लागतो की, एकीकडून वाहन येत आहे.      

या परिसरात शेतकरी केळी, कापूस, पपई अशी बागायती पिके घेतात; मात्र सप्टेंबरपूर्वी माल ने-आण करताना हाल  होऊ नयेत म्हणून ते उशिरा लागवड करतात; परंतु त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतात; तसेच मालाला उशिरा भाव मिळत नाही. काढलेला माल शेतातून घरी किंवा बाजारात नेण्यासाठी ३० ते ३५ टक्के फक्त वाहतूक खर्च येतो. मालाने भरलेले ट्रॅक्टर अनेकवेळा चिखलात फसतात  आणि बाहेर काढण्यासाठी इतर दोन तीन ट्रॅक्टरचा सहारा घ्यावा लागतो. डिसेंबरनंतर रस्त्यावर धूळ साचलेली असते. या परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकवेळा शेतरस्त्याची मागणी केली; मात्र गाव  निम्न तापी प्रकल्पात अंशतः  बुडीत होणार असल्याने शासन रस्ता करून देत नाही. हा रस्ता केला असता तर सात्री गावाला देखील पर्यायी रस्ता  उपलब्ध झाला असता. राजकीय नेते व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाने कुठलेही अनुदान, पीकविमा अथवा कर्जमाफी देऊ नका; मात्र आम्हाला शेतातील माल ने-आण करण्यासाठी रस्ता द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

अवघ्या १०० मीटर अंतरावर तापी नदी असल्याने या रस्त्यावरील नाल्यातून शालिग्राम दशरथ देशमुख वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह देखील सापडला नव्हता. तीन जणांना वाहून जाताना वाचविण्यात आले. तर याच पावसाळ्यात १० गुरे वाहून गेली  आहेत. हा रस्ता झाला असता तरी सात्री गावालाही पर्यायी रस्ता मिळाला असता.

   अमळनेर नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना कलाली येथून सुरू करण्यासाठी पम्प हाऊसला  स्वतःची जागा मोफत दिली.   त्यावेळी शेतकऱ्यांसाठी पर्यायी रस्ता बनवून देण्याचे  आश्वासन देण्यात आले होते. ते आजपर्यंत पाळण्यात आले नाही.    - राहुल भागवत पाटील, शेतकरी, कलाली, ता. अमळनेर

४०० एकर शेतीसाठी असलेला तीन किमीचा रस्ता बुडीत क्षेत्रात येणार आहे. आणि गाव जसेच्या तसे राहणार आहे. हा रस्ताही गेला तर शेती कशी करावी?    - विनोद गुलाबराव पाटील, चेअरमन, विकासो., कलाली  

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी