शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नको अनुदान आणि कर्जमाफी; फक्त शेतात जायला रस्ता करून द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 08:36 IST

या परिसरात शेतकरी केळी, कापूस, पपई अशी बागायती पिके घेतात

संजय पाटील

अमळनेर : आम्हाला शासनाची कर्जमाफी नको, अनुदान नको, पीकविमा नको; पण आमच्या शेतातून माल काढण्यासाठी रस्ता तरी द्या, एवढीच मागणी कलाली परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. कलाली शिवारात सुमारे १०० शेतकऱ्यांची ४०० एकर बागायती शेती आहे. तापी नदीकाठावर खोऱ्यात ही शेती असल्याने उत्पन्न चांगले येते; मात्र या शेतातून  माल ने-आण करण्यासाठी एकच रस्ता आहे. 

तीन किमी रस्त्यात ‘खैऱ्या’ आणि ‘लेंढ्या’ असे दोन मोठे आणि  आणखी आठ लहान नाले आहेत. त्यातच तापी काळावर चिकण माती आहे. त्यामुळे जून ते डिसेंबर या महिन्यांत या ठिकाणी दोन ते तीन फुटांचा चिखल असतो.  शेतातून माल काढून आणण्यासाठी दोन ट्रॅक्टर एकत्रच जोडावे लागतात. तरी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. विशेष म्हणजे या रस्त्यावरून एकच वाहन जाऊ शकत असल्याने शेतकऱ्यांना शेतात वाहने ने-आण करण्यासाठी रस्त्यात सूचना देण्यासाठी माणसे ठेवावी लागतात. एकीकडून वाहन येत असताना समोरून वाहन आले तर वाहन मागे घेणे अवघड असते, त्यामुळे पूर्वसूचना देण्यासाठी आवाज द्यावा लागतो की, एकीकडून वाहन येत आहे.      

या परिसरात शेतकरी केळी, कापूस, पपई अशी बागायती पिके घेतात; मात्र सप्टेंबरपूर्वी माल ने-आण करताना हाल  होऊ नयेत म्हणून ते उशिरा लागवड करतात; परंतु त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतात; तसेच मालाला उशिरा भाव मिळत नाही. काढलेला माल शेतातून घरी किंवा बाजारात नेण्यासाठी ३० ते ३५ टक्के फक्त वाहतूक खर्च येतो. मालाने भरलेले ट्रॅक्टर अनेकवेळा चिखलात फसतात  आणि बाहेर काढण्यासाठी इतर दोन तीन ट्रॅक्टरचा सहारा घ्यावा लागतो. डिसेंबरनंतर रस्त्यावर धूळ साचलेली असते. या परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकवेळा शेतरस्त्याची मागणी केली; मात्र गाव  निम्न तापी प्रकल्पात अंशतः  बुडीत होणार असल्याने शासन रस्ता करून देत नाही. हा रस्ता केला असता तर सात्री गावाला देखील पर्यायी रस्ता  उपलब्ध झाला असता. राजकीय नेते व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाने कुठलेही अनुदान, पीकविमा अथवा कर्जमाफी देऊ नका; मात्र आम्हाला शेतातील माल ने-आण करण्यासाठी रस्ता द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

अवघ्या १०० मीटर अंतरावर तापी नदी असल्याने या रस्त्यावरील नाल्यातून शालिग्राम दशरथ देशमुख वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह देखील सापडला नव्हता. तीन जणांना वाहून जाताना वाचविण्यात आले. तर याच पावसाळ्यात १० गुरे वाहून गेली  आहेत. हा रस्ता झाला असता तरी सात्री गावालाही पर्यायी रस्ता मिळाला असता.

   अमळनेर नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना कलाली येथून सुरू करण्यासाठी पम्प हाऊसला  स्वतःची जागा मोफत दिली.   त्यावेळी शेतकऱ्यांसाठी पर्यायी रस्ता बनवून देण्याचे  आश्वासन देण्यात आले होते. ते आजपर्यंत पाळण्यात आले नाही.    - राहुल भागवत पाटील, शेतकरी, कलाली, ता. अमळनेर

४०० एकर शेतीसाठी असलेला तीन किमीचा रस्ता बुडीत क्षेत्रात येणार आहे. आणि गाव जसेच्या तसे राहणार आहे. हा रस्ताही गेला तर शेती कशी करावी?    - विनोद गुलाबराव पाटील, चेअरमन, विकासो., कलाली  

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी