शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

वार्तापत्र : बीएचआरने प्रारंभ, आता प्रतीक्षा उर्वरीत पतसंस्थांवर कारवाईची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 09:22 IST

सुशील देवकर ​​​​पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआर पतसंस्थेतील हजारो कोटींच्या भ्रष्टाचार, गैरव्यवहार प्रकरणी जळगावात छापेमारी करीत सहकारी पतसंस्थांवर गेल्या ...

सुशीलदेवकर

​​​​पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआर पतसंस्थेतील हजारो कोटींच्या भ्रष्टाचार, गैरव्यवहार प्रकरणी जळगावात छापेमारी करीत सहकारी पतसंस्थांवर गेल्या अनेक वर्षांपासून खऱ्या अर्थाने अपेक्षित असलेल्या कारवाईला प्रारंभ केला आहे. आता जिल्ह्यातील उर्वरीत बुडीत, अवसायनात गेलेल्या पतसंस्थांमधील घोळही असाच कारवाई करून बाहेर काढावा व गोरगरीब ठेवीदारांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त होत असून ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.पतसंस्थांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करण्यात जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हजारो ठेवीदारांचे हजारो कोटी रूपयांच्या ठेवी या पतसंस्थांमध्ये अडकल्या आहेत. याबाबत शासनाकडे ठेवीदारांनी आंदोलने, निवेदने आदीच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही अल्प प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शासनाने निर्णय घेऊनही अधिकार, ठेवीदार संघटनांचे काही पदाधिकारी, राजकीय पुढारी यांच्या मिलिभगतमुळे प्रत्यक्ष ठेवीदारांना त्याचा फारसा लाभ होऊ शकलेला नाही.

जिल्ह्यातील अडचणीतील पतसंस्थांमधून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी २०१६ मध्ये तत्कालीन सहकार आयुक्त यांनी ठरवून दिलेल्या वर्षभराच्या कालबद्ध कृती कार्यक्रमात सहकार विभागाने कर्जवसुलीसाठी संचालक व कर्जदारांच्या मालमत्ता विक्रीसाठी अपसेट प्राईस (वाजवी किंमत) प्रकरणांना मंजुरी देतांना कोट्यावधी रुपयांची शाळा करत स्वत: मालामाल होत ठेवीदारांना मात्र तसेच ताटकळत ठेवल्याचा आरोप होत होता. मात्र त्याकडेही सोयीस्करपणे दूर्लक्ष झाले. तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी शासनाला स्वतंत्र प्रस्ताव पाठवून ठेवींच्या पावत्यांच्या बदल्यात ठेवीदारांना लिलावात भाग घेता यावा याची मंजुरी मिळवून आणली. मात्र ठेवीदारांनी लिलावाच्या रकमेच्या पोटी ८५ टक्के ठेवपावत्या व १५ टक्के रोख रक्कम भरण्याची यामध्ये टाकण्यात आलेली अट ही ठेवीदारांच्या अहिताची होती. त्याच अटीचा गैरवापर करण्यात आला.

ईडीकडे प्रकरणे पाठविण्यासही टाळाटाळजिल्ह्यातील अडचणीतील पतसंस्था या मनीलाँड्रींगसारखे प्रकार झाल्याने अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे अशा पतसंस्था अडचणीत येण्यास कारणीभूत असलेल्या संबंधीत संस्थेचे तत्कालीन संचालक व अधिकारी तसेच सहकार विभागातील अधिकारी यांच्या प्रकरणांची छाननी करून टॉप २० प्रकरणे, नावांची यादी तातडीने सक्त वसुली संचालनालयाकडे (ईडी) चौकशीसाठी पाठविण्याकरीता देण्याचे आदेश दि.१० जुलै २०१७ रोजी झालेल्या विभागीय लोकशाहीदिनात विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांनी दिले होते. मात्र दीड-पावणे दोन वर्षांचा कालावधी उलटूनही एकाही पतसंस्थेचे प्रकरण सादर केले नाही. त्यामुळे सहविभागीय सहनिबंधकांनी जिल्हा विशेष लेखा परिक्षक यांना कारणे दाखवा नोटीस ही बजावली होती. त्यानंतर सहकार विभागाच्या जिल्हा विशेष लेखा परिक्षक कार्यालयाच्या चौकशीसाठी नाशिक येथून विभागीय सहनिबंधक यांच्या नेतृत्वाखालील पथकही आले होते. मात्र नंतर प्रकरण दडपले गेले. आता ही प्रकरणे शोधून कारवाईची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव