शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

Jayant Patil: राष्ट्रवादीही ‘काँग्रेस’च्याच वाटेवर, पक्षातील कार्यकर्त्यांचीही वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 17:10 IST

राष्ट्रवादीत पक्षासाठी खस्ता खाणारे कमी झाले आहेत. संघटनात्मक बांधणीची कामे करायला कोणी तयार नाही

अमित महाबळ 

जळगाव : देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसची स्थिती वाईट झाली आहे. त्यांच्याकडे नेतेच काय, हाडाचे कार्यकर्तेही राहिले नाहीत. त्याच मार्गावर आता जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीदेखील जात आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत नेमक्या याच गोष्टीची सल नेत्यांनी बोलून दाखविली. कार्यकर्ते नसतील, तर कोणाच्या जिवावर निवडणुका जिंकायच्या, हा प्रश्न त्यांना छळायला लागला आहे. कारण, घोडामैदानही लांब राहिलेले नाही.

राष्ट्रवादीत पक्षासाठी खस्ता खाणारे कमी झाले आहेत. संघटनात्मक बांधणीची कामे करायला कोणी तयार नाही. जे आहेत ते मोजके. बहुतेकांना मिरवून घेण्यात रस अधिक. जळगावपेक्षा मुंबईच्या वाऱ्या करून नेत्यांसोबत फोटो काढून घेण्याची हौस दांडगी आहे. नेतेही अशांना विचारत नाहीत, जिल्ह्यात तुम्ही पक्ष किती उभा केला? कहर म्हणजे कामांपेक्षा प्रसिद्धीचा सोस एवढा वाढला आहे, की स्थानिक पातळीवरील बातम्यांमध्ये नावे येत नाहीत म्हणून प्रदेशाध्यक्षांकडे तक्रारी केल्या जात आहेत. पक्षाचे वर्चस्व कमी होत असल्याचे नाही; पण नावे येत नसल्याचे दु:ख भारी आहे !

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून खासदार शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे; पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी गावागावांत संघटन राहिलेले नाही, हे कोणी नाकारू शकणार नाही. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते व पदाधिकारी यांची कमतरता जाणवली असल्याचे सांगून बोलघेवड्यांना आरसा दाखवला आहे. देशातील सगळ्यांत मोठा पक्ष भाजप. त्यांची बूथरचना मजबूत आहे. राष्ट्रवादीत प्रत्येक बूथला सक्रिय कार्यकर्ते आहेत का ? २० सरचिटणीस, २५ उपाध्यक्ष आहेत. त्यांची जबाबदारी काय ? प्रदेशाध्यक्ष आले, तर त्यांच्या बैठकीला महत्त्वाचे नेते गैरहजर होते. पक्ष या बेशिस्तीची काय दखल घेणार? चेंडू जिल्हाध्यक्षांच्या कोर्टात आहे. त्यांना कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. 

प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीनंतर आंदोलन झाले. त्यावेळी किती महिला हजर होत्या? बैठकीसाठी पक्ष कार्यालयातील सभागृहाची अर्धी बाजू महिलांनी व्यापली होती. आंदोलनाची वेळ आली, तर त्यांतील ५० टक्केही दिसल्या नाहीत. अशाने पक्ष वाढणार आहे का? प्रदेशाध्यक्षांसमोर अनेकांचा तक्रारीचा मोठा सूर होता; पण पक्षासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ प्रत्येकावर आली आहे. नेत्यांच्या पुण्याईवर पक्ष किती दिवस चालणार, हे खडसेंनी विचारणे चुकीचे नाही. अडीच वर्षे सत्ता असताना पक्षाच्या नेत्यांनीच थारा दिला नाही म्हटल्यावर कार्यकर्ता नाराज आहे. दुसरीकडे, भाजपची सत्ता आल्यावर त्यांचेच लोक फोन करून ‘तुमची कामे असतील, तर सुचवा’ असे सांगत असल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणत आहेत. कार्यकर्ता जोडण्याचा दोन पक्षांतील हा फरक आहे.

प्रदेशाध्यक्षांनी गेल्या दौऱ्याच्या वेळी कोणी काय सांगितले होते, याच्या नोंदी काढल्या. त्यामुळे अनेकांची बोलती बंद झाली. भाजपमधून आलेल्या आमदार एकनाथ खडसेंनी संघटन बांधणी कशा पद्धतीने केली पाहिजे, याचे धडे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आचरणात किती जण आणतील ? याचे उत्तर येत्या काही दिवसांत दिसेल. पक्ष टिकवायचा असेल, तर कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे. आजची पिढी उद्या बाजूला झाल्यावर त्यांची जागा घेणारा दुसरा लागेल. संधी मिळते; मात्र ती घेणारा असला पाहिजे. अन्यथा ‘राष्ट्रवादी’ आणि ‘काँग्रेस’ दोघेही एकाच रांगेतील पक्ष होतील. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव