शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

निम्म्याहून अधिक तालुक्यांत पावसाने ओलांडली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST

जळगाव : जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस झाला नसला तरी ऑगस्ट महिन्यापासून चांगला पाऊस होऊ लागल्याने व त्यात सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच ...

जळगाव : जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस झाला नसला तरी ऑगस्ट महिन्यापासून चांगला पाऊस होऊ लागल्याने व त्यात सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच पावसाचा वेग चांगलाच वाढल्याने आठ तालुक्यांत पावसाने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा सरासरी पाऊसदेखील १०५.६ टक्क्यांपर्यंत झाला आहे. सर्वाधिक १५८.२ टक्के पाऊस चाळीसगाव तालुक्यात झाला असून, त्याखालोखाल पारोळा तालुक्यात १२८.५ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, दुसरीकडे चोपडा तालुक्यात अजूनही ७२ टक्केच पाऊस झाला आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून दोन महिने सलग व जोरदार पाऊस नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यांसह पिकांची चिंता वाढली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून जोरदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यात सरासरी पाऊसही वाढत असून, जलसाठ्यातही भर पडत आहे.

चोपड्यात यंदाही चिंता ?

जिल्ह्यात सध्या चांगला पाऊस होत असल्याने चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, जामनेर, पाचोरा, रावेर, भडगाव, मुक्ताईनगर या तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. मात्र, चोपडा तालुक्यात अजूनही ७२.८ टक्केच पावसाची नोंद असून, आता पावसाळ्याचा हा शेवटचा महिना असून, या तालुक्यात पावसाची शंभरी होते की नाही, याकडे लक्ष लागले आहे. भूजल सर्वेक्षणातही यंदा चोपडा तालुका वगळता सर्वच तालुक्याच्या जलपातळीत वाढ झाली होती, तर चोपडा तालुक्यात घट झाली होती.

गिरणा धरणसाठा ५५ टक्क्यांवर

गेल्या महिन्यापर्यंत गिरणा धरणातही फारसी वाढ नसल्याने या धरणातही ७ ऑगस्टला केवळ ३९.७० टक्के साठा होता. पावसाळ्याच्या सुरुवातीला या धरणात ३३.३१ टक्के जलसाठा होता, त्यात दोन महिन्यांत केवळ ६.३९ टक्क्यांनी वाढ होऊन तो ३९.७० टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, आता जोरदार पावसामुळे या धरणसाठ्यातही वेगाने वाढ होऊन रविवार, १२ सप्टेंबर रोजी हा साठा ५५.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस

तालुका-पाऊस(टक्क्यांमध्ये)

जळगाव-९४.१

भुसावळ -९५.९

यावल-९४.७

रावेर-१०९.१

मुक्ताईनगर- १०४.७

अमळनेर-९०.६

चोपडा-७२.८

एरंडोल-११२.१

पारोळा-१२८.५

चाळीसगाव-१५८.२

जामनेर-११०.९

पाचोरा-१०७.९

भडगाव-१०१.६

धरणगाव-९१.२

बोदवड-९८.४