शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

जळगावात बालिकेच्या हत्येप्रकरणी प्रचंड मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 12:42 IST

समतानगरातील घटना

ठळक मुद्देदोषींवर कठोर कारवाईची सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणीजिल्हाधिकारी कार्यालयावरही धडक

जळगाव : समतानगरातील बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अमानवी अत्याचार करून खून केल्याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शुक्रवार १५ रोजी सर्वपक्षीय नागरिकांच्या मोर्चाद्वारे करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदनही सादर केले. दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिले.शिवतीर्थ मैदानावरून सकाळी ११.४५ च्या सुमारास या मूकमोर्चास प्रारंभ झाला. त्यात आमदार सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, शिवचरण ढंढोरे, माजी उपमहापौर करीम सालार, अरूण चांगरे, भाजपा गटनेता सुनील माळी, खाविआचे सदस्य राजेश शिरसाठ, नगरसेवक राजू मोरे, मुफ्ती हारून नदवी, नगरसेविका कंचन सनकत, मंगला बारी, भाजपा उपाध्यक्ष वैशाली पाटील, जयप्रकाश चांगरे, वसंतराव चांगरे, दिलीप चांगरे, चेतन सनकत, आरपीआय युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, राष्टÑवादी प्रदेश सरचिटणीस मंगला पाटील, राष्टÑवादी महानगराध्यक्ष निता चौधरी, राष्टÑवादी प्रदेश सचिव लता मोरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मेहतर वाल्मिकी समाज पंचायतचे सदस्य व समाजबांधव सहभागी झाले होते.पोलीस अधीक्षकांशी चर्चामूकमोर्चा प्रथम पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यात मयत बालिकेच्या वडिलांनी मागणी केली की, ते स्वत: शिक्षा भोगत असताना त्यांच्या मुलीच्या खुनामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे मुलीला न्याय मिळवून द्यावा. पोलीस अधीक्षकांनी शासनाकडून मदत मिळवून देण्याची व मयत बालिकेस न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. समता नगरात नियमित पोलीस गस्त राहील. या आठवड्यात डीवायएसपी सचिन सांगळे समतानगरातील रहिवाशांशी समस्यांबाबत चर्चा करून म्हणणे ऐकून घेतील, असे सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयावरही धडकपोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी मोर्चा अडविला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती कराजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा अडविण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन देऊन मयत बालिका ही मेहतर वाल्मिकी समाजाची असल्याने तिच्या कुटुंबास शासनाकडून संरक्षण व आर्थिक मदत मिळवून द्यावी. या खटल्यात शासनाने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुती करावी. हा गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. तसेच मयत बालिकेचे वडिल जन्मठेपेची शिक्षा भोगत असून १० दिवसांसाठी पे-रोलवर आहेत. त्यांची दीड वर्षांची राहिलेली शिक्षा रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव