शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

२०० क्षमतेच्या कारागृहात तब्बल ४३४ बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:59 IST

सुनील पाटील । जळगाव : रक्षकाच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून तीन बंद्यांनी पलायन केल्याच्या घटनेनंतर कारागृहाची सुरक्षा व इतर ...

सुनील पाटील ।जळगाव : रक्षकाच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून तीन बंद्यांनी पलायन केल्याच्या घटनेनंतर कारागृहाची सुरक्षा व इतर बाबी ऐरणीवर आल्या आहेत. या कारागृहात नेमकी काय परिस्थिती आहे व उणिवा काय याची माहिती ‘लोकमत’ ने घेतली असता अनेक गंभीर प्रकार समोर आले.२०० बंदीची क्षमता असताना या कारागृहात आजच्या तारखेत ४३४ बंदी आहेत. बंद्यांच्या तुलनेत नियंत्रणासाठी पुरेसे मनुष्यबळही नाही. खरे तर बंदींची संख्या लक्षात घेता १०० च्यावर सुरक्षा रक्षक व दहा अधिकारी असणे अपेक्षित असताना येथे प्रत्यक्षात आज फक्त ३७ जणांचे मनुष्यबळ आहे.इतर कारागृहातून २६ पदे वर्गयेथील कारागृहातील रिक्त पदे व बंद्यांची संख्या पाहता औरंगाबाद उपमहानिरीक्षकांनी पैठण कारागृहातून २० रक्षक, लातूर व धुळे येथून प्रत्येकी १ सुभेदार व ४ रक्षक जळगाव कारागृहात वर्ग केलेले आहेत, मात्र ते अद्यापही रुजू झालेले नाहीत. हे आदेश फक्त कागदोपत्रीच आहेत. या कारागृहातून अनेक वेळा बंद्यांनी पलायन केले आहे, त्याशिवाय गंभीर गुन्ह्यातील बंद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक वेळी उपमहानिरीक्षक व महानिरीक्षकांनी भेटी दिलेल्या आहेत. येथील परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतरही मनुष्यबळाची पूर्तता झालेली नाही.-कारागृहात अधीक्षकासह ४१ पदे मंजूर आहेत. ही पदांची संख्या २०० बंदींसाठी आहे. येथे ४३४ बंदी असल्याने त्यातुलनेत मनुष्यबळ नगण्य आहे. त्यात देखील अनेक कर्मचारी वैद्यकिय तसेच इतर रजेवर असतात. मंगळवारी ५ कर्मचारी गैरहजर होते. बंद्यांची संख्या जास्त असल्याने एका बराकीत दुपटीने बंदींची व्यवस्था करावी लागत आहे. रात्र-अपरात्री काही घटना व अनुचित प्रकार घडल्यास कारागृह व अधिकारी, कर्मचारी निवासस्थान शेजारीच असावे, अशी संकल्पना आहे. मात्र येथे फक्त १० कर्मचाऱ्यांची व्यवस्था होईल, असेच निवासस्थान आहे. ८० टक्के कर्मचारी शहरात वेगवेगळ्या भागात वास्तव्याला आहेत. कारागृहाच्या पाठीमागे गणेश नगर व ग्राहकमंचाच्या दिशेने असलेली जागा ही अतिक्रमीत आहे. या जागेत कर्मचारी निवासस्थान झाल्यास त्यांची सोय होईल व कारागृह तसेच निवासस्थान जवळ असावे या संकल्पनेचा हेतूही साध्य होऊ शकतो. हा विषय जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्त्यारित असल्याने त्यांनीच यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.समितीची बैठकच नाहीकारागृहाच्या देखरेखीसाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली अभिविक्षक समिती कारागृहात गठीत करण्यात आलेली आहे. पोलीस अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा शल्य चिकित्सक व इतर विभागाचे अधिकारी यात सदस्य असतात. दर तीन महिन्यांनी समितीच बैठक होणे अपेक्षित आहे. मात्र येथे २०१९ पासून या समितीची बैठकच झालेली नाही.त्यामुळे कारागृहाच्या समस्याच निकाली निघालेल्या नाहीत.तीन वर्षानंतर मिळाले अधीक्षकतत्कालिन अधीक्षक डी.टी.डाबेराव यांच्यावर ६ मे २०१७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत या कारागृहाला नियमित अधीक्षक नव्हते. तुरुंग अधिकाºयांकडेच प्रभारी पदभार सोपविला जात होता. दर सहा महिन्यांनी येथून अधिकाºयांची उचलबांगडी झाली. आता उस्मानाबदचे अधीक्षक गजानन पाटील यांची नियुक्ती झाली. पाटील हे मुळचे तांदलवाडी, ता.रावेर येथील मुळ रहिवाशी आहेत. याआधी त्यांनी मुंबई, औरंगाबाद, नाशिक,लातूर व उस्मानाबाद येथे काम केले आहे.नवीन कारागृहाचा प्रस्ताव धुळखातजिल्ह्याचा वाढता विस्तार, वाढती गुन्हेगारी व आरोपींची वाढती संख्या लक्षात घेता भुसावळ येथे कुºहा रस्त्यावर १२५ एकर जागेत वर्ग १ चे कारागृह मंजूर झालेले आहे. जागा देखील ताब्यात घेण्यात आलेली आहे. मात्र या प्रकरणाला अद्याप चालना मिळालेली नाही. तत्कालिन अधीक्षक डी.टी.डाबेराव यांच्या काळात या प्रस्तावाला चालना मिळाली होती,आता हा प्रस्ताव धुळखात पडला आहे.कारागृहाच्या भींतीची उंची वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मनुष्यबळाबाबत देखील वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव आधीच पाठविण्यात आला आहे. रुजू होऊन दोन दिवस झाले. येथील माहिती जाणून घेऊन चूक झालेल्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करु. चुकीच्या कामांना अजिबात थारा नाही.अंतर्गत शिस्तही कडक करण्यात आलेली आहे. बंद्यांची नियमित आरोग्य तपासणी करुन प्रत्येकाची माहिती घेतली जात आहे.-गजानन पाटील, अधीक्षक, कारागृह

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव