शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

महाराष्ट्रात २३० तर मध्यप्रदेशात १७० वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 22:44 IST

जखमी व मृत्यू झालेल्या प्राण्यांच्या नोंदी सापडेना

जळगाव : महाराष्ट्रात २३० तर मध्यप्रदेशात १७० च्यावर वाघ आढळून येतात, अशी माहिती किशोर रिठे यांनी दिली.विद्यापीठात आयोजित व्याघ्रसंवर्धन कार्यशाळेत त्यांनी विविध उपायही सुचविले.अपघातात असंख्य वन्यप्राण्यांचा मृत्यूकाही वर्षापूवी मेळघाटकडून आलेल्या बाजीराव या वाघाचा नागपूर-अमरावती महामार्गावर वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला़ यासारखे असंख्य प्राण्यांचा दुभाजकावरील घनदाट झुडपांमुळे समोरील बाजू न दिसल्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाला होता़ त्यामुळे महामार्गांवर वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पाईप टाकले जातात़मात्र, पाच मीटर उंचीचे पाईन न टाकता कमी उंचीची टाकल्यामुळे वन्यप्राणी ही रस्त्यावरून संचार करतात त्यामुळे हा अपघात होता़ यासाठी सर्वांची विचारविनिमय करण्यासाठी बैठक घेण्याची आवश्यकता आहे़ आज काही ठिकाणी कालवे बांधलेले दिसतील़ या कालव्यामुळे वाघ किंवा अन्य प्राण्यांना एकीकडून दुसरीकडे जाता येत नाही़ ज्या कालव्यामंध्ये काही अशांमध्ये वाघ पडून त्यांचा मृत्यू होतो़ त्यामुळे कालवा हा खुला नसावा, असे रिठे यांनी सांगून उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले़ यानंतर महाराष्ट्रात २३० तर मध्यप्रदेशात ४०० च्यावर वाघ आढळून येतात, अशी माहिती त्यांनी दिली़दरम्यान, अनेक जखमी व मृत्यू झालेल्या वाघांच्या नोंदी आपल्याकडे सापडत नाही ही खंत आहे़ इमारती, रस्ते तसेच रेल्वे रूळ बांधकामांच्या प्रस्तावांवर आज लक्ष ठेवण्याची गरज आहे़ जेणे करून त्यावर उपाय सुचविता येतील आणि वन्यप्राण्यांना अडथळे निर्माण होणार नाही़ त्यामुळे मानवी जीवनास कुठलाही धोका निर्माण होणार नाही, असे त्यांनी सांगितले़यावेळी परिषदेला विद्यार्थ्यांसह वन्यजीव संरक्षण संस्था, आॅर्किड नेचर फाउंडेशन, सातपुडा फाउंडेशन, सातपुडा बचाव कृती समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती़सूत्रसंचालन बाळकृष्ण देवरे व अर्चना उजागरे यांनी केले तर आभार राहूल सोनवणे यांनी मानले़ यशस्वीतेसाठी अभय उजागरे, राहूल सोनवणे, प्रसाद सोनवणे, एऩसी़वाघ, भूषण चौधरी, विजय रायपुरे, वासुदेव वाढे, सतिश कांबळे, संदीप झोपे आदींनी परिश्रम घेतले़यावल अभयारण्याचे सांगितले महत्वपॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशनद्वारे किशोर रिठे यांनी व्याघ्र संवर्धनामध्ये यावल अभयारण्याचे महत्व सांगितले. त्यानंतर सातपुडा भुप्रदेश व व्याघ्र संवर्धनाचे महत्व, वन्यजीव संचार मार्ग, समुदायाच्या मालकीचे समुदायाद्वारे संचालित निसर्ग संवर्धन, डोलारखेडा व्याघ्र अधिवास आदी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले़ यानंतर पर्यावरण प्रशाळा विभागाचे प्रा़ डॉ़ एस़टी़इंगळे यांनी मार्गदर्शन केले़

टॅग्स :Jalgaonजळगाव