शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

हरवली का तुमच्या कुलुपाची चावी; जळगावकर देतात दररोज भलत्याच समस्येला तोंड

By अमित महाबळ | Updated: April 10, 2023 16:10 IST

जळगावमध्ये डुप्लिकेट चावी बनवून देणारे पहिले दुकान ५० वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे सांगितले जाते.

जळगाव : धांदरटपणा, विसरभोळेपणा याची जरादेखील कमी नाही. यातूनच कुलुपाची चावी हरविण्याचे अनेक प्रकार दररोज जळगावमध्ये घडत आहेत. यामुळेच तर डुप्लिकेट चावी बनवून देणाऱ्यांचा व्यवसाय तेजीत आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात अशी सात दुकाने आहेत आणि या प्रत्येकाकडे दररोज किमान १५ ते २० ग्राहक हे चावी विसरून आलेले असतात.

जळगावमध्ये डुप्लिकेट चावी बनवून देणारे पहिले दुकान ५० वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे सांगितले जाते. लुकमान शेख यांचा मूळ व्यवसाय होता छत्र्या दुरुस्त करून देण्याचा. नंतर त्यांनी कुलुपांची डुप्लिकेट चावी बनवून देणे सुरू केले. आता त्यांचा मुलगा इम्रान शेख दुकान सांभाळतो. पूर्वी कानसने घासून चावी तयार केले जाई. आता मशीनवर देखील काम होते. सामान्य घरातील व्यक्ती जसा येतो, तसा चारचाकीवालाही चावी हरविल्यावर दुकान शोधत येतो. दिवसाला ३० चाव्या बनवून दिल्या जातात. त्यापैकी १५ ते २० ग्राहक हे चावी विसरलेले असतात, असे सादिक शेख यांनी सांगितले.

आता तिसरी पिढी...

जावेद व सादिक यांचे वडील शफीर शेख आणि आजोबा वजीर पहलवान याच व्यवसायात होते. हे सगळे जळगावकर आहेत. वजीर पहलवान कुस्तीचा आखाडादेखील गाजवायचे.

अशी बनते चावी!

चावी कुलुपात फिरवून तिच्यावर खुणा घेतल्या जातात. त्या कानसने घासून योग्य चावी बनवली जाते. काही कुलुपांवरील पितळी कव्हर काढून मगच चावी बनू शकते, या पद्धतीने त्यांची घडण केलेली असते. चावी बनविण्यासाठी ओळखीचा पुरावा घेतला जातो.

चावी बनली नाही, असे झालेच नाही...

एखाद्या कुलुपाची चावी बनली नाही, असे आजपर्यंत कधी झालेले नाही. ‘नजर, कानस आणि दिमाग’ या व्यवसायात हवे. ५ ते १० मिनिटांत चावी तयार होते, लोखंड व पितळ या धातू प्रकारात त्या असतात. ७ ते १० लिव्हरपर्यंतची कुलुपे मिळतात, अशी माहिती जावेद शेख यांनी दिली. सेन्सर लॉक लोक बसवतात; पण त्यांच्या चावी बनत नाहीत, असे इम्रान शेख यांनी सांगितले.

असेही प्रसंग..

१) तीन वर्षांपूर्वी एमआयडीसीमधून एकजण धावतपळतच दुकानात आला होता. त्याच्या शेजारी राहणारी महिला स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि नेमका दरवाजा लॉक झाला. आतमध्ये गॅसवर डाळ शिजत होती, तेथेच लहान मुलगाही खेळत होता. पुश बटनचे लॉक होते. प्रयत्न करूनही दरवाजा उघडेना. माउली घाबरली. त्यांच्याकडे जाऊन कुलूप तोडावे लागले होते, अशी आठवण इम्रान शेख यांनी सांगितली.

२) निमखेडी भागात एका घराच्या खोलीत मुलगा अडकला होता आणि किल्लीही आतच राहिली होती. एका ठिकाणी आत गॅस सुरू होता आणि दरवाजा लॉक झाला होता. अशा प्रसंगात तातडीने जाऊन चावी बनवून दिली होती, अशी माहिती जावेद शेख यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव