शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

लोडशेडिंगचा ट्रेलर, खरा पिक्चर अजून बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 10:22 IST

वीजपुरवठा बंद करताना प्लान लोड रिलीफ (पीएलआर) आणि इमर्जन्सी लोड रिलीफ (ईएलआर) देण्यात येतो. पण गेल्या काही दिवसांपासून ईएलआरची संख्या वाढली आहे. त्यामुळे वीज केव्हा आणि किती वेळ गायब होईल हे कळेनासे झाले आहे.

जळगाव : उन्हाळ्याच्या तोंडावर लोडशेडिंग सुरू होताच नागरिकांची झोप उडाली आहे. ग्रामीण भागात रात्रीचा त्रास वाढला आहे, तर शहरात सकाळी लवकर किंवा दिवसा वीज गायब होऊ लागली आहे. अनेकांनी या समस्येवर उतारा म्हणून तातडीने इन्व्हर्टर बसवले पण त्यामुळे आता त्यांच्या दर महिन्याच्या वीज बिलात देखील वाढ होणार आहे. जेवढे बिल वाढेल त्या तुलनेत नंतर सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात अघोषित लोडशेडिंग सुरू झाले आहे. जळगाव शहरात महावितरणचे एकूण ३७ फिडर (वीज वाहिन्या) आहेत. त्यापैकी २० फिडरवर ६० टक्क्यांपेक्षा जास्त वीज गळती होत आहे. उरलेल्या १७ फिडरवर गळती आहेच. राज्यात उन्हामुळे विजेची मागणी वाढली आहे. १३ एप्रिल २०२२ रोजी, राज्याची एकूण मागणी २४ हजार ६०८ मेगा वॉटची, तर उपलब्धता २२ हजार ३१५ मेगा वॉट होती. या दोघांतील तूट (शॉर्टफॉल) २ हजार २९३ मेगा वॉट होता. ही तूट भरून काढण्यासाठी अघोषित भारनियमन केले जात आहे.

वीजपुरवठा बंद करताना प्लान लोड रिलीफ (पीएलआर) आणि इमर्जन्सी लोड रिलीफ (ईएलआर) देण्यात येतो. पण गेल्या काही दिवसांपासून ईएलआरची संख्या वाढली आहे. त्यामुळे वीज केव्हा आणि किती वेळ गायब होईल हे कळेनासे झाले आहे. यामध्ये सुरुवातीला एजी फिडर, त्यानंतर गरज भासल्यास ग्रामीण भाग व सर्वात शेवटी शहरी भागातील वीजपुरवठा बंद केला जातो, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, दिवसा व रात्री केव्हाही वीजपुरवठा बंद होत असल्याने नागरिकांनी इन्व्हर्टरचे साहाय्य घेतले आहे. या उपकरणाची खरेदी एकदम वाढली आहे. त्यांचा वापर वाढला आहे पण यामुळे दर महिन्याचे वीज बिल वाढणार आहे. त्यामुळे आणखी एक वाढीव खर्च नागरिकांच्या माथी पडणार आहे.

महावितरणच्या यंत्रणेवर ताण येणारइन्व्हर्टरची बॅटरी चार्ज होताना सुरुवातीच्या अर्ध्या तासात सर्वात जास्त वीज (करंट) खेचली जाते. असे असंख्य इन्व्हर्टर जेव्हा एकाचवेळी अशा पद्धतीने चार्ज व्हायला लागतील, तेव्हा त्याचा ताण हा महावितरणच्या यंत्रणेवर पहिल्या अर्ध्या तासात येईल, अशी माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली.

पॉवर बॅकअपची सुविधा इन्व्हर्टर देतो. त्याचा वापर होताना बॅटरीचे चार्जिंग कमी होत जाते. वीजपुरवठा पुन्हा सुरळीत होताच बॅटरीचे चार्जिंग सुरू होते. पण जेवढी वीज आपण बॅटरीमधून घेतो त्यापेक्षा अधिक वीज चार्जिंगसाठी लागत असते. इन्व्हर्टर मधून २ युनिट वीज घेतली, तर बॅटरी चार्ज होण्यास अडीच युनिट वीज लागते. त्यामुळे इन्व्हर्टरवर घरातील जेवढी वीज उपकरणे चालतील तेवढे वीज बिल वाढत जाईल. हे टाळण्यासाठी इन्व्हर्टरवर कमीत कमी वीज उपकरणे वापरणे हा उपाय आहे.

- डी. एन. पाटील, निवृत्त वीज अभियंता

टॅग्स :Jalgaonजळगाव