शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

जीव मुठीत घेऊन शेतात जातो, परतण्याची शाश्वती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 22:43 IST

डोलारखेडा येथील शेतकऱ्यांच्या अनुभव कथनाने उपस्थित थक्क

जळगाव : यापूर्वी प्राण्यांची भिती वाटत नव्हती़ मात्र, मागील वर्षी गावातील एका शेतकºयावर वाघाने हल्ला चढवला आणि त्यात त्या शेतकºयाचा मृत्यू झाला़ या घटनेपासून गावामध्ये प्रचंड भीती पसरली आहे़ जीव मुठीत धरून शेतात कामाला जावे लागते़, रात्री चार-पाच शेतकरी मिळून शेतात रखवालीसाठी जात असतो... पुन्हा घरी परतणार की नाही, याची शाश्वती नसते, असे थक्क करणारे अनुभव डोलारखेडा ता. मुक्ताईनगर येथील शेतकºयांनी सांगितले. त्यावेळी व्याघ्रसंवर्धन परिषदेसाठी उपस्थित असलेले सदस्यही आवक झाले.या दोन दिवसीय व्याघ्रसंवर्धन कार्यशाळेस शनिवारपासून सुरुवात झाली. यात दुपारच्या सत्रात डोलारखेडा येथील शेतकरी विनोद थाटे, पुंडलिक पाटील, बंडू मोरे, महेंद्र पाटील, भागवत इंगळे, पुरूषोत्तम सोनार, वासुदेव कोळी यांनी अनुभव कथन केले़पुंडलिक पाटील म्हणाले की, गावापासून काही अंतरावर शेत आहे, त्यामुळे जंगतातून शेतात जावे लागते़ पूर्वीपासून जंगलात वाघ, अस्वल तसेच हरिण, रान डुकरांचा संचार आहे़ रात्री-अपरात्री शेतात जावे लागते. त्यामुळे वाटेत वन्यप्राणी बघायला मिळतात़ या प्राण्यांची भिती वाटत नव्हती़मात्र, मागील वर्षी गावातील एका शेतकºयावर वाघाने हल्ला चढवला आणि त्यात त्या शेतकºयाचा मृत्यू झाला़ त्या घटनेपासूनच गावामध्ये वाघाची प्रचंड भीती पसरली आहे.गटा- गटाने जातो शेतातरानडुक्कर, सांबर हे पिकांचे नुकसान करत असल्यामुळे रात्री शेतात रखवालीसाठी जावे लागते़ मात्र, आपल्यावर वाघ कधी हल्ला करेल, याची भिती असल्यामुळे आम्ही चार ते पाच शेतकरी मिळून रात्री शेतात रखावालदारीसाठी जातो़ आपण घरी परतणार की नाही ही सुध्दा भिती मनात असते, असे त्यांनी सांगितले़ सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घराबाहेर शौचास जात असतना वन्यप्राणी दिसतात़ शेताला कुपंन करण्याचे संबंधित अधिकाºयांनी दिलेले आश्वासन अद्याप देखील पूर्ण केलेले नाही़पिकांचे नुकसान झाल्यास वर्षातून एकदाच तुटपुंजे नुकसान भरपाई वन्य विभागाकडून मिळत असते़ या संपूर्ण प्रकारामुळे आम्ही त्रस्त झालेलो आहोत, असेही पुंडलिक पाटील यांनी सांगितले.डोलारखेडा-मुक्ताई-भवानी देणार भेटरविवारी परिषदेतील मान्यवर वन्यप्राणी संस्थांच्या सदस्यांसह मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा या गावाला तसेच मुक्ताई- भवानी या भागाला भेटी देणार आहेत़ येथील नागरिकांशी संवाद साधतील व पाहणी करणार आहेत़ ही मान्यवरांची टीम सकाळीच डोलारखेडासाठी रवाना होणार आहे़ सध्यपरिस्थितीची ही टीम पाहणी करणार आहे़जीव मुठीत धरून शेतात कामाल जावे लागते़ मागील वर्षी वाघाच्या हल्ल्यााात झालेल्या शेतकºयाच्या मृत्यूमुळे भितीचे वातावरण निमार्ण झाले़ मात्र, अन्यप्राण्यांच्या वाघाने केलेल्या शिकारीचे सुध्दा घटना घडत आहेत़ कधी-कधी रात्रीच्या सुमारास गावापर्यंत वाघ येत असल्याचेही अनेकांनी बघितले़ अनेक वर्षापासून गावात राहत असून कधीही या घटना घडल्या नाहीत़ मागील वर्षीच्याच घटनेमुळे गावात भिती पसरली आहे़ संबंधित विभागाने शेतांना कुंपण घालून देण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र, वर्ष उलटून सुध्दा अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही़, असे विनोद थाटे व महेंद्र पाटील या शेतकºयांनी सांगितले.पाणवठ्यावरील प्राणीगणना योग्यजंगलातील पाणवट्यावरून केली जाणारी वन्यप्राण्यांची गणना ही बंद केली जात आहे़ मात्र, ही गणना करण्याची पध्दती अत्यंत योग्य आहे़ ही पध्दती बंद पडायला नको, असे मत एस़एस़मिश्रा यांनी व्यक्त केले़ त्यानंतर त्यांनी यावल अभयारण्यावर सविस्तर माहिती दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव