दुहेरी खून प्रकरणाचे मारेकरी अखेर जाळ्यात; चार जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:19 IST2021-04-26T05:19:17+5:302021-04-26T05:19:23+5:30
व्याजाच्या पैशाच्या वादातून घडली घटना

दुहेरी खून प्रकरणाचे मारेकरी अखेर जाळ्यात; चार जण ताब्यात
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याच्या खून प्रकरणाचा चार दिवसांत उलगडा झाला आहे. सोमवारी पहाटे चार वाजता चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे.
जळगाव शहरातून तीन तर एकाला पहूर येथून ताब्यात घेण्यात आले. व्याजाच्या पैशाचे तसेच जुन्या वादातून खून केल्याची कबुली चौघांनी दिली आहे. आशाबाई यांच्या अंगावरील दागिनेही हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली होती तर गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती.