शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खान्देशी वांग्यांची विदेशवारी, दररोज २० टन वांग्याचे भरीत फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 12:24 IST

थंडी वाढल्याने मागणी वाढली

ठळक मुद्देनाशिक, पुण्यातही भरीत सेंटरतजेलदार वांग्यांना मागणी

विजयकुमार सैतवालजळगाव : गुलाबी थंडी जाणवू लागताच भरीताच्या वांग्यांनाही मागणी वाढू लागली असून तयार भरीताची विक्री वाढली आहे. जळगावातून दररोज सुमारे २० टन भरीताच्या वांग्यांची विक्री होत असून जिल्ह्यासह राज्यभरात येथून वांगे तसेच तयार भरीत रवाना होत आहे. इतकेच नव्हे येथील प्रसिद्ध वांगे अमेरिकासह इतर देशातही नातेवाईकांकडे पाठविण्यात येत आहेत.जळगाव जिल्ह्यातील केळीसह भरीताचे वांगेही प्रसिद्ध आहेत. त्यात हिवाळ््यामध्ये जास्त मागणी असते ती भरीताच्या वांग्यांना. जळगाव जिल्ह्यातील वातावरण व जमीन वांग्यांसाठी पोषक असल्याने त्यांची जी विशिष्ट चव आहे, ती इतरत्र कोठेही मिळत नाही. त्यामुळे या वांग्यांना जास्त मागणी असते व ते येथेच मोठ्या प्रमाणात पिकविले जातात.गेल्या काही वर्षापासून पावसाळ््यामध्येच भरीताचे वांगे बाजारात येऊ लागले आहेत. मात्र त्यांची खास चव लागते ती हिवाळ््यामध्ये. त्यामुळे थंडी वाढू लागली की या वांग्यांचीही मागणी वाढते.वांग्यांची आवक वाढलीजळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातील बामणोद, भालोद, पाडळसे, जळगाव तालुक्यातील असोदा, भादली, ममुराबाद, इदगाव, कानळदा, रावेर तालुका तसेच वरणगाव, बोदवड तालुक्यांमध्ये भरीताच्या वांग्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यात आता जामनेर तालुक्यातही काही भागांमध्ये भरीताच्या वांग्याची लागवड होऊ लागली आहे. सध्या जळगाव बाजार समितीमध्ये या वांग्यांची आवक वाढली असून दररोज २० टन वांग्यांची विक्री होत आहे.भरीत केंद्रांवर अधिक मागणीघरगुती भरीत करण्यासाठी तसेच हॉटेल चालकांकडून या वाग्यांची खरेदी होते. त्यात आता काही वर्षांपासून खास भरीत सेंटरही सुरू झाल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वांग्यांना मागणी असते. जळगाव शहरात ५० च्यावर भरीत सेंटर आहेत. त्यामुळे या भरीत सेंटरवर वांग्यांना मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या घरी भरीत करण्यासह तयार भरीताला पसंती असल्याने त्याची विक्री वाढली आहे.भरीत पार्ट्यांना प्रारंभजळगाव जिल्ह्यात हिवाळ्यात भरीत पार्ट्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. त्यास सुरुवात झाली असून सध्या घरी आलेल्या पाहुणे मंडळींना भरीताचा पाहुणचार केला जात आहे. या सोबतच लग्न असो अथवा कोणताही समारंभ तेथे इतर पदार्थांसह भरीताचा मेनू हमखास असतोच.तजेलदार वांग्यांना मागणीवांगे भाजल्यानंतर त्यामधून जास्त तेल सुटेल अशा वांग्यांना अधिक मागणी असते. यासाठी जळगाव जिल्ह्यातील बामणोद, असोदा, भादली या भागातील वांगे प्रसिद्ध आहेत. असोदा येथे तर पिढ्यांपिढ्यांपासून भरीताच्या वांग्यांची शेती केली जात आहे.राज्यभर दरवळजळगावसह खान्देशासह नाशिक, पुणे येथेही भरीत सेंटर सुरू झाले आहेत. या सोबतच मुंबई, डोंबविली, कल्याण, गोरेगाव येथेही भरीताचे वांगे पोहचत आहे. पुणे येथे पिंपरी, चिंचवड, सांगवी या भागात खान्देशातील मंडळी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याने तेथे जळगावातून ट्रॅव्हल्सद्वारे वांगे पाठविले जातात व तेथील बाजारातही खान्देशी भरीताचे वांगे दिसू लागले आहेत.भरीताच्या वांग्यांची विदेशवारीजळगाव जिल्ह्यातील अनेक मंडळी अमेरिका तसेच इतर देशांमध्ये वास्तव्यास आहे. ही मंडळी हिवाळ््यामध्ये येथे आली अथवा येथील नातेवाईक त्यांच्याकडे गेले तर सोबत हमखास वांगे अथवा भरीत घेऊन जात असतात.भौगोलिक मानांकन; १५० देशांमध्ये वांग्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळाभरीताचे वांगे दोन रुपये प्र्रति किलोपर्यंत घसरतात. त्यामुळे उत्पादकांना मोठा फटका बसतो. यासाठी या वांग्यांना रास्त भाव मिळावा म्हणून जळगाव तालुक्यातील असोदा येथील नवनिर्मिती शेतकरी मंडळाच्या वतीने यासाठी प्रयत्न केले जात असून या मंडळाने या वांग्यांना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळविले आहे. यामुळे १५० देशांमध्ये वांग्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होणार असून त्यास भाव मिळण्यासही मदत होऊ शकेल.उशिरा आगमनयंदा पाऊस उशिरा झाल्याने भरीताच्या वांग्याचे उत्पादनही लांबणीवर पडले. परिणामी दरवर्षापेक्षा यंदा बाजारात भरीताचे वांगे उशिरा आल्याचे वांगे उत्पादकांनी सांगितले. सध्या या वांग्याचे होलसेलचे भाव १५ रुपये प्रति किलो आहे तर किरकोळ बाजारात ३० रुपये प्रती किलोने वांगे विक्री होत आहेत. भरीत सेंटरवर १२० रुपये प्रती किलो तयार भरीत मिळत आहे.असोदेकरांना रोजगार, मात्र शेंडे आळीने वाढविली चिंताअसोदा येथे तर खास तुरकाठ्यांवर (काड्यांवर) भरीताचे वांगे भाजून मिळत असून तेथून कच्चे भरीत घेऊन जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे असोदेकरांना एक चांगला रोजगार या वांग्यांनी मिळून दिला आहे. मात्र या वांग्यांवर पडणाºया शेंडे आळीच्या प्रादुर्भावाने चिंता वाढविली असून त्याच्याप्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याचीही मागणी नवनिर्मिती शेतकरी मंडळाने केली आहे.जळगाव जिल्ह्यातील पूरक वातावरणामुळे येथील वांग्यांना विशिष्ट चव असते. सध्या त्यांची आवक वाढण्यासह मागणीही वाढली आहे.-किशोर चौधरी, वांगे उत्पादक, असोदा

टॅग्स :vegetableभाज्याJalgaonजळगाव